शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Conflict: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
2
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
3
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
4
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
5
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
6
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
7
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
8
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
9
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
10
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
11
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
12
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
13
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
14
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
15
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
16
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
17
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
18
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
19
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
20
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश

कशी होईल वाहतूक सुरळीत?

By admin | Updated: November 23, 2014 00:37 IST

नागपूरकरांना बहुप्रतिक्षित असलेल्या रामझुल्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अधिवेशन काळात रामझुल्याचा उद्घाटन समारंभही पार पडण्याची अपेक्षा आहे. परंतु हा रामझुला सुरू झाल्यानंतर

जयस्तंभ चौकात वाहतुकीची कोंडी : रामझुल्यासह पाच रस्ते येणार एकाच ठिकाणी नागपूर : नागपूरकरांना बहुप्रतिक्षित असलेल्या रामझुल्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अधिवेशन काळात रामझुल्याचा उद्घाटन समारंभही पार पडण्याची अपेक्षा आहे. परंतु हा रामझुला सुरू झाल्यानंतर जयस्तंभ चौकात वाहतुकीची मोठी कोंडी होण्याची शक्यता असून त्याचा नागरिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.रामझुल्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून सध्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. त्यानंतर हा रामझुला सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. रामझुला जेथे खाली उतरतो त्या परिसरात पाच रस्ते एकत्र येतात. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. रामझुल्यावरून येणारे नागरिक याच चौकात उतरणार आहेत. याशिवाय रामझुल्याच्या शेजारील मेयो हॉस्पिटलकडून येणारे वाहनचालकही येथूनच रेल्वेस्थानकाकडे किंवा गणेश टेकडीच्या उड्डाण पुलावर जातील. याशिवाय कस्तूरचंद पार्ककडून येणारे प्रवासीही रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी याच चौकातून मार्ग काढतील. त्यामुळे या चौकात वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रामझुला पुढील चौकात खाली उतरविला असता तर ही कोंडी झाली नसती असे मतही व्यक्त करण्यात येत आहे. आता प्रशासन याबाबतीत काय निर्णय घेते आणि येथे वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी काय उपाययोजना करते हे महत्त्वाचे आहे. (प्रतिनिधी)रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची गर्दीरामझुला जेथे खाली उतरतो त्या चौकातून रेल्वेस्थानकावर जाणाऱ्या वाहनचालकांची मोठी गर्दी असते. रेल्वेस्थानकावर दिवसभर प्रवाशांची ये-जा सुरू असते. त्यामुळे अनेक वाहने याच चौकातून दिवसभर रेल्वेस्थानकाकडे जातील. या वाहनांमुळे येथे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे.कस्तूरचंद पार्ककडून येणाऱ्या वाहनांचा प्रश्नदुपारी ४ नंतर कस्तूरचंद पार्ककडून मेयो रुग्णालयाकडे जाणाऱ्या वाहनचालकांची गर्दी वाढते. सायंकाळी ५ वाजता तर सर्व शासकीय कार्यालयांचे कामकाज संपल्यामुळे या रस्त्यावर कमालीची गर्दी पाहावयास मिळते. सायंकाळच्या सुमारास या चौकात मोठी गर्दी होणार असल्यामुळे ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.टेकडी उड्डाणपुलावरील वाहतुकीची कोंडीटेकडी उड्डाणपुलावरून अनेकजण रेल्वेस्थानकावर येतात. त्यांना उड्डाणपुलावरून खाली उतरल्यानंतर थेट रेल्वेस्थानकावर प्रवेश देण्यात येईल की त्यांना कस्तूरचंद पार्कजवळील सिग्नलपर्यंत फेरा मारावा लागेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे टेकडी उड्डाणपुलावरील वाहतुकीचीही कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.‘डीआरएम’ कार्यालयातील वाहनांचा प्रश्नरामझुला जेथे खाली उतरतो तेथे बाजूलाच मध्य रेल्वेचे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे ‘डीआरएम’ कार्यालय आहे. या कार्यालयात असंख्य अधिकारी आणि कर्मचारी काम करतात. त्यांनाही याच चौकातून ये-जा करावी लागणार आहे. त्यामुळे त्यांची वाहने कुठल्या बाजूने काढण्यात येतील हा प्रश्न आहे.