शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

..तर कशी होणार शिक्षक भरती? १५ दिवसांत संच मान्यता अशक्य

By जितेंद्र ढवळे | Updated: July 18, 2023 17:39 IST

हा निर्णय न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारा असून, संस्था चालकांच्या हक्कांवर गदा आणणारा असल्याचा आरोप

नागपूर : राज्य सरकारने ऑगस्ट महिन्यापासून पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, जोवर १०० टक्के विद्यार्थी आधार नोंदणी होत नाही आणि शिक्षकांची सद्य:स्थिती कळत नाही, तोवर शिक्षक भरती कशी करणार, असा सवाल महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने उपस्थित केला आहे. यासंदर्भात महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना पत्र पाठवित पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी अनेक बाबींची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.

पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती सुरू करीत असताना त्याकरिता १५ दिवसात संच मान्यता व रोस्टर पूर्ण करण्यासंबंधीचे प्रतिपादनदेखील शासनाने उच्च न्यायालयात केले आहे. परंतु, आधार नोंदणी अपूर्ण असताना शाळांची संच मान्यता केल्यास मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाशिवाय शिक्षक भरती करणे अशक्य आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती करण्याआधी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देणे आवश्यक असून, स्थानिक सेवायोजन कार्यालयांना कळविणेही आवश्यक आहे. त्यांच्याकडून येणाऱ्या यादीतून पात्र उमेदवारांना मुलाखतीला बोलावण्याचे अधिकार शाळा समितीला असल्याचे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असताना शासनाने प्रथम १:१० व आता १:३ उमेदवार पवित्र पोर्टलमार्फतच्या राज्यस्तरीय यादीतून देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. हा निर्णय न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारा असून, संस्था चालकांच्या हक्कांवर गदा आणणारा असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्रjobनोकरी