शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

..तर कशी होणार शिक्षक भरती? १५ दिवसांत संच मान्यता अशक्य

By जितेंद्र ढवळे | Updated: July 18, 2023 17:39 IST

हा निर्णय न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारा असून, संस्था चालकांच्या हक्कांवर गदा आणणारा असल्याचा आरोप

नागपूर : राज्य सरकारने ऑगस्ट महिन्यापासून पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, जोवर १०० टक्के विद्यार्थी आधार नोंदणी होत नाही आणि शिक्षकांची सद्य:स्थिती कळत नाही, तोवर शिक्षक भरती कशी करणार, असा सवाल महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने उपस्थित केला आहे. यासंदर्भात महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना पत्र पाठवित पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी अनेक बाबींची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.

पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती सुरू करीत असताना त्याकरिता १५ दिवसात संच मान्यता व रोस्टर पूर्ण करण्यासंबंधीचे प्रतिपादनदेखील शासनाने उच्च न्यायालयात केले आहे. परंतु, आधार नोंदणी अपूर्ण असताना शाळांची संच मान्यता केल्यास मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाशिवाय शिक्षक भरती करणे अशक्य आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती करण्याआधी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देणे आवश्यक असून, स्थानिक सेवायोजन कार्यालयांना कळविणेही आवश्यक आहे. त्यांच्याकडून येणाऱ्या यादीतून पात्र उमेदवारांना मुलाखतीला बोलावण्याचे अधिकार शाळा समितीला असल्याचे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असताना शासनाने प्रथम १:१० व आता १:३ उमेदवार पवित्र पोर्टलमार्फतच्या राज्यस्तरीय यादीतून देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. हा निर्णय न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारा असून, संस्था चालकांच्या हक्कांवर गदा आणणारा असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्रjobनोकरी