शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

..तर कशी होणार शिक्षक भरती? १५ दिवसांत संच मान्यता अशक्य

By जितेंद्र ढवळे | Updated: July 18, 2023 17:39 IST

हा निर्णय न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारा असून, संस्था चालकांच्या हक्कांवर गदा आणणारा असल्याचा आरोप

नागपूर : राज्य सरकारने ऑगस्ट महिन्यापासून पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, जोवर १०० टक्के विद्यार्थी आधार नोंदणी होत नाही आणि शिक्षकांची सद्य:स्थिती कळत नाही, तोवर शिक्षक भरती कशी करणार, असा सवाल महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने उपस्थित केला आहे. यासंदर्भात महामंडळाचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना पत्र पाठवित पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी अनेक बाबींची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.

पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती सुरू करीत असताना त्याकरिता १५ दिवसात संच मान्यता व रोस्टर पूर्ण करण्यासंबंधीचे प्रतिपादनदेखील शासनाने उच्च न्यायालयात केले आहे. परंतु, आधार नोंदणी अपूर्ण असताना शाळांची संच मान्यता केल्यास मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाशिवाय शिक्षक भरती करणे अशक्य आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती करण्याआधी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देणे आवश्यक असून, स्थानिक सेवायोजन कार्यालयांना कळविणेही आवश्यक आहे. त्यांच्याकडून येणाऱ्या यादीतून पात्र उमेदवारांना मुलाखतीला बोलावण्याचे अधिकार शाळा समितीला असल्याचे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असताना शासनाने प्रथम १:१० व आता १:३ उमेदवार पवित्र पोर्टलमार्फतच्या राज्यस्तरीय यादीतून देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. हा निर्णय न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारा असून, संस्था चालकांच्या हक्कांवर गदा आणणारा असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्रjobनोकरी