शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
5
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
6
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
7
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
9
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
10
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
11
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
12
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
13
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
14
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
15
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
16
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
17
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
18
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
19
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
20
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान सगळीकडे कसे लक्ष देणार?; नगमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 10:45 IST

अभिनयाच्या क्षेत्रातून राजकारणाकडे वळलेल्या नगमा यांनी नागपुरात एकीकडे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले, तर दुसरीकडे पंतप्रधानांबाबत सहानभुती दाखविणारे वक्तव्य करून सर्वांना आश्चर्यचकित केले.

ठळक मुद्देराष्ट्रीय विद्यार्थी संसदेला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी काँग्रेस नेत्यांकडून सोडण्यात येत नाही. मात्र अभिनयाच्या क्षेत्रातून राजकारणाकडे वळलेल्या नगमा यांनी नागपुरात एकीकडे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले, तर दुसरीकडे पंतप्रधानांबाबत सहानभुती दाखविणारे वक्तव्य करून सर्वांना आश्चर्यचकित केले. समस्या सोडविण्यासाठी तरुणांनी व समाजाने पुढाकार घेतला पाहिजे. एकटे पंतप्रधान सगळीकडे कसे काय लक्ष देणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीस असलेल्या नगमा यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितदेखील बुचकळ्यात पडले होते. ‘रायसोनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट’तर्फे आयोजित पाचव्या राष्ट्रीय विद्यार्थी संसदेचे शुक्रवारी उद्घाटन झाले, यावेळी त्या बोलत होत्या.जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला योगेश छाबरिया, मौलाना सय्यद कल्बे रशैद रिझवी, संजय उपाध्ये, ज्येष्ठ पत्रकार मनीष अवस्थी, तसेच रायसोनी समूहाचे अध्यक्ष सुनील रायसोनी प्रामुख्याने उपस्थित होते. गेल्या ७२ तासांपासून देशातील वातावरण तापलेले आहे. केंद्र शासनाकडून भगव्याच्या नावाखाली राजकारण करण्यात येत आहे. संसदेत विरोधी पक्षांना बोलण्याची संधी देण्यात येत नाही. त्यामुळे केशरी रंगाच्या संत्र्याचे शहर असलेल्या नागपुरात येताना मनात धाकधूक होती, असे नगमा म्हणाल्या. देशात आजच्या तारखेत महिला सुरक्षित नाहीत. भाजपाशासित हरियाणामध्ये लहान मुलींवर अत्याचार होत आहेत. त्यांना थांबविण्याऐवजी तेथील पोलीस अधिकारी बेजबाबदार वक्तव्य करत आहेत.महिला आरक्षणाची आवश्यकता असून यासंदर्भात विधेयक लवकरात लवकर संमत करण्यासाठी केंद्रावर दबाव टाकणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मौलाना सय्यद कल्बे रशैद रिझवी यांनी विद्यार्थ्यांना स्वत:वर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला. विद्यार्थ्यांनी हुशार होण्याऐवजी बुद्धिमान होण्यावर भर द्यावा, असेदेखील ते म्हणाले. यावेळी योगेश छाबरिया, डॉ.संजय उपाध्ये, मनीष अवस्थी यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. सुनील रायसोनी यांनी प्रास्ताविक केले, तर श्वेता शेलगावकर यांनी संचालन केले.भाजपच्या राज्यांत ‘पद्मावत’वर बंदी का ?अगोदर ‘पद्मावती’ असे नाव असलेल्या चित्रपटाला आता विरोधानंतर ‘पद्मावत’ म्हणून प्रदर्शित करण्यात येत आहे. या चित्रपटाला ‘सेंसॉर बोर्ड’नेदेखील हिरवी झेंडी दाखविली आहे. राजस्थानमध्ये या चित्रपटाला होणारा विरोध समजू शकतो. मात्र भाजपाशासित इतर राज्यांमध्येदेखील या चित्रपटाच्या प्रदर्शनाला तेथील प्रशासनाने बंदी आणली आहे किंवा तशी तयारी सुरू आहे. या चित्रपटावरून केंद्र सरकार व भाजपाकडून दुटप्पी भूमिका घेण्यात येत असल्याचा आरोप नगमा यांनी लावला.

टॅग्स :Studentविद्यार्थी