शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

रामटेकचा गड काँग्रेस कशी करणार सर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 20:22 IST

रामटेक विधानसभेच्या निवडणुकीत रामटेकवर आपला झेंडा रोवण्यासाठी भाजप व शिवसेनेने पुन्हा एकदा आपले अस्त्र ताणले आहेत. तर गड परत काबीज करण्यासाठी काँग्रेसही सज्ज झाली आहे. युतीत तिकीट कुणाच्या कोट्यात जाईल हे स्पष्ट नाही. तर दुसरीकडे काँग्रेसकडूनही उमेदवारीचे चित्र अस्पष्ट आहे.

ठळक मुद्देभाजप-सेनेच्या उमेदवाराचे चित्र अस्पष्ट : चालणारा, लढणारा, व जिंकणारा उमेदवार देण्याचे काँग्रेसपुढे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामटेक विधानसभेच्या निवडणुकीत रामटेकवर आपला झेंडा रोवण्यासाठी भाजप व शिवसेनेने पुन्हा एकदा आपले अस्त्र ताणले आहेत. तर गड परत काबीज करण्यासाठी काँग्रेसही सज्ज झाली आहे. युतीत तिकीट कुणाच्या कोट्यात जाईल हे स्पष्ट नाही. तर दुसरीकडे काँग्रेसकडूनही उमेदवारीचे चित्र अस्पष्ट आहे. लोकसभेत रामटेकमध्ये भगवा फडकला. त्यामुळे यावेळी काँग्रेसपुढे सर्व बाबींचा विचार करून लढणारा व जिंकणाराच उमेदवार देण्याचे आव्हान असणार आहे.गेल्यावेळी भाजप-सेना युती नव्हती. त्यावेळी भाजपाकडून लढलेले आ. डी. मल्लिकार्जुन रेड्डी विजयी झाले. शिवसेनेचे माजी आ. आशिष जैस्वाल यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यावेळीही अद्याप युती होणार की नाही हे स्पष्ट नाही. युती झाली तर रामटेकची जागा भाजपला सुटेल की शिवसेनेला, भाजपला गेली तर रेड्डी यांनाच उमेदवारी मिळेल की नवा चेहरा दिला जाईल, हे स्पष्ट नाही. रामटेकची जागा शिवसेनेच्या स्वाभिमानाशी जोडली गेली आहे. त्यामुळे येथे भाजप लढली तर आशिष जयस्वाल यांच्यासह स्थानिक शिवसैनिक नेमकी काय भूमिका घेतील यावरही बरेच काही अवलंबून आहे.युतीत सर्वकाही आलबेल झाले व एकच उमेदवार रिंगणात उतरविला तर मात्र काँग्रेसची अग्निपरीक्षा होईल. काँग्रेसला खूप परिश्रम तर घ्यावेच लागतील पण सोबतच निवडणूक लढणाराच नव्हे तर निवडणूक काढणारा उमेदवार द्यावा लागेल. काँग्रेसच्या उमेदवारावर बराचसा निकाल अवलंबून असेल, असे मतदार उघडपणे बोलून दाखवित आहेत. रामटेकमध्ये काँग्रेसकडून अनेक दावेदार आहेत. पर्यटक मित्र व काँग्रेसच्या राज्य पर्यटन सेलचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे, गेल्यावेळी राष्ट्रवादीकडून लढलेले डॉ. अमोल देशमुख, जिल्हा सरचिटणीस उदयसिंग यादव, माजी जि.प. सभापती सुरेश कुंभरे, युवक कॉँग्रेसचे सचिन किरपान, हर्षवर्धन निकोसे यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. माजी राज्यमंत्री व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक देखील गेल्या काही वर्षांपासून रामटेकच्या कानाकोपऱ्यातील गावात पोहचून काम करीत आहेत. मात्र, सर्वांनी विश्वास दाखविला तरच निवडणूक लढू, अशी सामंजस्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.रामटेकमध्ये काँग्रेसने भाजप- सेनेला तोडीची टक्कर देणारा, लढण्याची क्षमता असलेला, प्रशसकीय अनुभव असलेला व नावापुढे राजकीय वलय असलेला उमेदवार दिला तर रामटेकची निवडणूक रंगात येऊ शकते. रामटेकमध्ये गटबाजीचा फटका काँग्रेसला बसत आला आहे. त्यामुळे सर्वांना घेऊन चालणारा, आपल्या राजकीय उंचीचा वापर करून सर्वांना न्याय मिळवून देण्याची क्षमता असलेला व जनतेला आश्वासक व आपलासा वाटणारा उमेदवार दिला तर काँग्रेस येथे चांगली लढत देऊ शकते. अन्यथ रामटेकची निवडणूक काँग्रेससाठी फक्त खानापूर्ती ठरेल.

 

टॅग्स :congressकाँग्रेसramtek-acरामटेकElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा