शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

चार महिन्यांत 'समृद्धी'चे २० टक्के काम पूर्ण होणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 11:18 IST

Nagpur News नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामाला कोरोनामुळे विलंब झाला. मात्र, शिर्डीपर्यंतच्या मार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी नागपुरात केला. मात्र, आतापर्यंत या मार्गावर ८० टक्केच काम पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्देनागपूर-शिर्डी मार्ग डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचा एकनाथ शिंदेंचा दावा बुलेट ट्रेनबाबत अद्याप कुठलाही विचार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामाला कोरोनामुळे विलंब झाला. मात्र, शिर्डीपर्यंतच्या मार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी नागपुरात केला. मात्र, आतापर्यंत या मार्गावर ८० टक्केच काम पूर्ण झाले आहे. नागपूरकडील भागात अनेक किलोमीटरचे काम योग्य पद्धतीने सुरूच झालेले नाही. अशा स्थितीत चार महिन्यांच शिर्डीपर्यंतचे २० टक्के प्रलंबित काम पूर्ण कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (How will 20% of the work of 'Samrudhi' be completed in four months?)

एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दुपारी समृद्धी महामार्गाच्या बांधकामाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. समृद्धी महामार्गाच्या कामाने आता गती घेतली आहे. २०२२ पर्यंत ठाण्यापर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. या मार्गावर २० ठिकाणी इंडस्ट्रिअल नोडस् राहणार आहेत. शिवाय ११ लाख झाडे लावण्यात येतील व २५० मेगावॅट सौरऊर्जेचीदेखील निर्मिती होईल. या महामार्गावर वाहने १५० किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धावतील. त्यामुळे सर्वच साहित्य आवश्यक दर्जाचे असावे, याची सूचना देण्यात आली आहे. दर्जासोबतच कुठलीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले. कोरोनामुळे कामाला विलंब झाला असला तरी महामार्ग बांधणीचा खर्च वाढलेला नाही, असा दावादेखील त्यांनी केला. समृद्धी महामार्गाशेजारीच नागपूर- मुंबई बुलेट ट्रेन सुरू होणार असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत त्यांना विचारणा केली असता सध्या आमचे लक्ष केवळ महामार्गावरच आहे. बुलेट ट्रेनबाबत विचार केलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

अडथळे आणणाऱ्या राजकीय नेत्यांवर कारवाई

राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पात शिवसेना नेत्यांमुळे अडथळे येत असल्याचा लेटरबॉम्ब केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी टाकला होता. यासंदर्भात विचारणा केली असता समृद्धीमध्ये कुणीही अडथळे आणलेले नाही व भूमी अधिग्रहण योग्य प्रक्रियेनुसार सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले. विकासकामांना सर्वांनी साथ द्यायला हवी. राज्य किंवा राष्ट्रीय प्रकल्पांत कुणी अडथळे आणत असेल, तर संबंधित राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, असे प्रतिपादन त्यांनी केले.

टॅग्स :highwayमहामार्गSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग