शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

चार महिन्यांत 'समृद्धी'चे २० टक्के काम पूर्ण होणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 11:18 IST

Nagpur News नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामाला कोरोनामुळे विलंब झाला. मात्र, शिर्डीपर्यंतच्या मार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी नागपुरात केला. मात्र, आतापर्यंत या मार्गावर ८० टक्केच काम पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्देनागपूर-शिर्डी मार्ग डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचा एकनाथ शिंदेंचा दावा बुलेट ट्रेनबाबत अद्याप कुठलाही विचार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामाला कोरोनामुळे विलंब झाला. मात्र, शिर्डीपर्यंतच्या मार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी नागपुरात केला. मात्र, आतापर्यंत या मार्गावर ८० टक्केच काम पूर्ण झाले आहे. नागपूरकडील भागात अनेक किलोमीटरचे काम योग्य पद्धतीने सुरूच झालेले नाही. अशा स्थितीत चार महिन्यांच शिर्डीपर्यंतचे २० टक्के प्रलंबित काम पूर्ण कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (How will 20% of the work of 'Samrudhi' be completed in four months?)

एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दुपारी समृद्धी महामार्गाच्या बांधकामाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. समृद्धी महामार्गाच्या कामाने आता गती घेतली आहे. २०२२ पर्यंत ठाण्यापर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. या मार्गावर २० ठिकाणी इंडस्ट्रिअल नोडस् राहणार आहेत. शिवाय ११ लाख झाडे लावण्यात येतील व २५० मेगावॅट सौरऊर्जेचीदेखील निर्मिती होईल. या महामार्गावर वाहने १५० किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने धावतील. त्यामुळे सर्वच साहित्य आवश्यक दर्जाचे असावे, याची सूचना देण्यात आली आहे. दर्जासोबतच कुठलीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले. कोरोनामुळे कामाला विलंब झाला असला तरी महामार्ग बांधणीचा खर्च वाढलेला नाही, असा दावादेखील त्यांनी केला. समृद्धी महामार्गाशेजारीच नागपूर- मुंबई बुलेट ट्रेन सुरू होणार असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत त्यांना विचारणा केली असता सध्या आमचे लक्ष केवळ महामार्गावरच आहे. बुलेट ट्रेनबाबत विचार केलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

अडथळे आणणाऱ्या राजकीय नेत्यांवर कारवाई

राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पात शिवसेना नेत्यांमुळे अडथळे येत असल्याचा लेटरबॉम्ब केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी टाकला होता. यासंदर्भात विचारणा केली असता समृद्धीमध्ये कुणीही अडथळे आणलेले नाही व भूमी अधिग्रहण योग्य प्रक्रियेनुसार सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले. विकासकामांना सर्वांनी साथ द्यायला हवी. राज्य किंवा राष्ट्रीय प्रकल्पांत कुणी अडथळे आणत असेल, तर संबंधित राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, असे प्रतिपादन त्यांनी केले.

टॅग्स :highwayमहामार्गSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग