शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गॅस अनुदान बंद करून  अच्छे दिन कसे येणार ? - अनिल देशमुख  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 22:56 IST

घरघुती गॅस सिलिंडवर मिळणारे अनुदान टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच घरघुती सिलिंडरचे भाव 7 रुपयांनी वाढविले आहे. हेच अच्छे दिन आहेत का, असा सवाल करीत अमुदान बंद केले व दरवाढ रद्द केली नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

नागपूर, दि. 2-  अच्छे दिनचे स्वप्न दाखवून केंद्रात व राज्यात भाजपाने सत्ता मिळविली. मात्र, सरकारचे लोकहितविरोधी निर्णय घेणे सुरू आहे. केंद्र सरकारने पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यत घरघुती गॅस सिलिंडवर मिळणारे अनुदान टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच घरघुती सिलिंडरचे भाव 7 रुपयांनी वाढविले आहे. हेच अच्छे दिन आहेत का, असा सवाल करीत अमुदान बंद केले व दरवाढ रद्द केली नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. देशमुख म्हणाले, सध्स्थितीत  एका घरघुती सिंलेडर मागे १५० रुपये अनुदान देण्यात येते. राज्यात राष्ट्रवादी कॉग्रेस व काँग्रेसरचे सरकार असतांना मी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचा मंत्री असतांना घरघुती गॅसस सिलिंडवर मिळणारे अनुदान  थेट ग्राहकाच्या बँक खात्यात जमा करणारी योजना सुरु केली होती.  परंतु आता भाजपा सरकार सामान्य नागरीकांना आर्थिक अडचणीत टाकण्याचे काम करीत आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  नागरिकांना आवाहन करून अनुदान  सोडण्याचे आवाहन केले. गरीब कुटुंबाना उज्वला योजनेच्या माध्यमातातून मोफत गॅस कॅनेक्शन देण्यासाठी त्यांनी हे आवाहन केले होते. परंतु याही योजनेच्या माध्यमातून गरीब जनतेला फसविण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. जोपर्यत कनेक्शनचे १६०० रुपये पूर्ण जमा होणार नाही तो पर्यत सिलिंडरची सबसीडी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  गॅस सिलिंडर सारखेच केरोसनीनची सुद्धा सबसिडी बंद करण्याचे सरकारचे धोरण आहे. २०१६ पासुन दर १५ दिवसाला २५ पैसे भाव वाढ करण्यात येत आहे. शिवाय देशातील अनेक भाग केरोसीन मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे देशातील कोट्यवधी गरिब कुटुंबास याचा फटका बसणार आहे. एकीकडे मोठमोठ्या उद्योगपत्यांचे हजारो करोड रुपयाचे कर्ज माफ करायचे आणि दुसरीकडे गरीब जनतेला देण्यात येणारे अनुदान  बंद करायचे  हे कसले धोरण आहे. भाजपाने सर्व सामान्य नागरीकांना वेठीस धरण्याचे काम सुरु केले असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.