शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
3
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
4
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
7
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
8
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
9
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
10
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
11
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
12
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
13
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
14
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
15
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
16
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
17
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
18
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
19
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

गॅस अनुदान बंद करून  अच्छे दिन कसे येणार ? - अनिल देशमुख  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 22:56 IST

घरघुती गॅस सिलिंडवर मिळणारे अनुदान टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच घरघुती सिलिंडरचे भाव 7 रुपयांनी वाढविले आहे. हेच अच्छे दिन आहेत का, असा सवाल करीत अमुदान बंद केले व दरवाढ रद्द केली नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

नागपूर, दि. 2-  अच्छे दिनचे स्वप्न दाखवून केंद्रात व राज्यात भाजपाने सत्ता मिळविली. मात्र, सरकारचे लोकहितविरोधी निर्णय घेणे सुरू आहे. केंद्र सरकारने पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यत घरघुती गॅस सिलिंडवर मिळणारे अनुदान टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच घरघुती सिलिंडरचे भाव 7 रुपयांनी वाढविले आहे. हेच अच्छे दिन आहेत का, असा सवाल करीत अमुदान बंद केले व दरवाढ रद्द केली नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. देशमुख म्हणाले, सध्स्थितीत  एका घरघुती सिंलेडर मागे १५० रुपये अनुदान देण्यात येते. राज्यात राष्ट्रवादी कॉग्रेस व काँग्रेसरचे सरकार असतांना मी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचा मंत्री असतांना घरघुती गॅसस सिलिंडवर मिळणारे अनुदान  थेट ग्राहकाच्या बँक खात्यात जमा करणारी योजना सुरु केली होती.  परंतु आता भाजपा सरकार सामान्य नागरीकांना आर्थिक अडचणीत टाकण्याचे काम करीत आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  नागरिकांना आवाहन करून अनुदान  सोडण्याचे आवाहन केले. गरीब कुटुंबाना उज्वला योजनेच्या माध्यमातातून मोफत गॅस कॅनेक्शन देण्यासाठी त्यांनी हे आवाहन केले होते. परंतु याही योजनेच्या माध्यमातून गरीब जनतेला फसविण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. जोपर्यत कनेक्शनचे १६०० रुपये पूर्ण जमा होणार नाही तो पर्यत सिलिंडरची सबसीडी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  गॅस सिलिंडर सारखेच केरोसनीनची सुद्धा सबसिडी बंद करण्याचे सरकारचे धोरण आहे. २०१६ पासुन दर १५ दिवसाला २५ पैसे भाव वाढ करण्यात येत आहे. शिवाय देशातील अनेक भाग केरोसीन मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे देशातील कोट्यवधी गरिब कुटुंबास याचा फटका बसणार आहे. एकीकडे मोठमोठ्या उद्योगपत्यांचे हजारो करोड रुपयाचे कर्ज माफ करायचे आणि दुसरीकडे गरीब जनतेला देण्यात येणारे अनुदान  बंद करायचे  हे कसले धोरण आहे. भाजपाने सर्व सामान्य नागरीकांना वेठीस धरण्याचे काम सुरु केले असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.