शहरं
Join us  
Trending Stories
1
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
2
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
3
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
6
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
7
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
8
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
9
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
10
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
11
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
12
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
13
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
14
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
15
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
16
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
17
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
18
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
19
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
20
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?

कशी परवडणार शेती; बियाणे अन् खताचे भाव दामदुप्पट झाले; शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

By गणेश हुड | Updated: June 19, 2024 20:50 IST

जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्षांनी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निसर्गाचा लहरीपणा, शासनाने घोषीत केलेली मदत मिळत नाही. विमा काढूनही नुकसान भरपाई मिळत नाही. कापूस, सोयाबीनला भाव नाही. दुसरीकडे बि-बियाणे व खतांच्या किमती मात्र दामदुप्पट वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत शेती नाईलाज म्हणून करावी लागते, अशी व्यथा शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे व उपाध्यक्ष कुंदा राऊत यांच्यापुढे मांडली.

शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्षांनी बुधवारी दौऱ्याप्रसंगी कळमेश्वर तालुक्यातील आदासा येथील कापसाची लागवड करणाऱ्या शेतकरी व शेतमजूर मजुराची भेट घेवून त्यांच्याशी संवाद साधला. पेरणीजोगा पाऊस झाला नसतानाही कपाशीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतमाालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली. गेल्या काही वर्षात बियाणाचे व खताचे दुपटीने वाढले आहेत. दुसरीकडे कापसाला भाव नाही. त्यामुळे लागणार खर्चही निघत नाही.

केंद्रशासन व राज्य शासनाने दोन हजाराची मदत न करता आमच्या शेतमालाला भाव द्यावा, अशी शेतकऱ्यांनी यावेळी मागणी केल्याची माहिती मुक्ता कोकड्डे व कुंदा राऊत यांनी दिली. शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेले बि-बियाणे व खो उपलब्ध होत आहे का, याची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांशी संवाद साधल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Farmerशेतकरी