शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कशी परवडणार शेती; बियाणे अन् खताचे भाव दामदुप्पट झाले; शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

By गणेश हुड | Updated: June 19, 2024 20:50 IST

जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्षांनी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निसर्गाचा लहरीपणा, शासनाने घोषीत केलेली मदत मिळत नाही. विमा काढूनही नुकसान भरपाई मिळत नाही. कापूस, सोयाबीनला भाव नाही. दुसरीकडे बि-बियाणे व खतांच्या किमती मात्र दामदुप्पट वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत शेती नाईलाज म्हणून करावी लागते, अशी व्यथा शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे व उपाध्यक्ष कुंदा राऊत यांच्यापुढे मांडली.

शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्षांनी बुधवारी दौऱ्याप्रसंगी कळमेश्वर तालुक्यातील आदासा येथील कापसाची लागवड करणाऱ्या शेतकरी व शेतमजूर मजुराची भेट घेवून त्यांच्याशी संवाद साधला. पेरणीजोगा पाऊस झाला नसतानाही कपाशीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतमाालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली. गेल्या काही वर्षात बियाणाचे व खताचे दुपटीने वाढले आहेत. दुसरीकडे कापसाला भाव नाही. त्यामुळे लागणार खर्चही निघत नाही.

केंद्रशासन व राज्य शासनाने दोन हजाराची मदत न करता आमच्या शेतमालाला भाव द्यावा, अशी शेतकऱ्यांनी यावेळी मागणी केल्याची माहिती मुक्ता कोकड्डे व कुंदा राऊत यांनी दिली. शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेले बि-बियाणे व खो उपलब्ध होत आहे का, याची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांशी संवाद साधल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Farmerशेतकरी