शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

सव्वादोन टक्क्यांच्या रकमेत उदरनिर्वाह करायचा कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 10:36 IST

ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाने ‘रोजगारसेवक’ या पदाची निर्मिती केली. मात्र, अत्यल्प मानधनात गुजराण करायची कशी, असा महत्त्वपूर्ण प्रश्न रोजगारसेवकांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देरोजगारसेवकांना अत्यल्प मानधन किमान तीन हजार मजूर कामावर असणे आवश्यक

राम वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनांद : ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाने ‘रोजगारसेवक’ या पदाची निर्मिती केली. रोजगारसेवक मानधनावर कार्यरत आहे. पूर्वी त्यांना दर महिन्याला ठराविक मानधन दिले जायचे. मात्र, शासनाने यात फेरबदल केला असून, मानधनाच्या रकमेचा संबंध कामावर असलेल्या मजुरांच्या संख्येशी जोडला. नवीन नियमानुसार त्यांना सव्वादोन टक्के मानधन मिळणार असून, त्यासाठी किमान तीन हजार मजूर कामावर असणे अनिवार्य आहे. या अत्यल्प मानधनात गुजराण करायची कशी, असा महत्त्वपूर्ण प्रश्न रोजगारसेवकांनी उपस्थित केला आहे.ग्रामीण भागात शासनाच्यावतीने महात्मा गांधी राष्टय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे केली जात असून, ती कामे मजुरांकरवी केली जातात. त्या मजुरांवर देखरेख ठेवणे तसेच त्यांचे हजेरीपत्रक तयार करण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर रोजगार सेवकाची नियुक्ती करण्यात आली. ग्रामीण भागातून शहरांकडे येणारा बेरोजगारांचा लोंढा थांबविण्यासाठी शासनाने हा उपक्रम सुरू केला. त्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम २००५ पारित करून त्याआधारे ग्रामीण भागातील एका कुटुंबाला वर्षभरात किमान १०० दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी दिली.

मानधनाचे स्वरूपया रोजगारसेवकांना त्यांच्या मजुरीच्या हजेरीपत्रकाप्रमाणे मानधन दिले जाते. महिनाभरात तीन हजार मजूर कामावर असल्यास त्यांना सव्वादोन टक्के, दोन हजार मजुरांवर चार टक्के आणि एक हजार मजुरांवर सहा टक्के मानधन दिले जाते. त्याला ग्रामपंचायत प्रशासनाने कामानिमित्त पंचायत समिती कार्यालयात पाठविले तर २२५ रुपये अतिरिक्त दिले जाते. त्यांना महिनाभरात चारदा पंचायत समिती कार्यालयात जावे लागत असून, प्रवासभत्ता हा महिन्याकाठी आठ दौऱ्यांचा ग्राह्य धरला जातो. त्यामुळे दौऱ्याचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंडही त्यांना सोसावा लागतो.

वर्षभरापासून मानधन नाहीभिवापूर तालुक्यातील बहुतांश रोजगारसेवक पदवीधर असून, त्यांना वर्षभरापासून त्यांच्या कामाचे मानधन व प्रवासभत्ता मिळाला नाही. काहींचे तीन महिन्यांपासून मानधन प्रशासनाकडे प्रलंबित आहे. अशा विपरीत परिस्थितीत केवळ गरज म्हणून रोजगारसेवक कामे करीत आहेत. पंचायत समितीच्या रोजगार हमी विभागातील काही नियमित व कंत्राटी कर्मचारी स्वत:ला अधिकारी समजून रोजगारसेवकांना त्रास देत असतात. त्यांना वारंवार परत पाठवीत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. या प्रकारामुळे त्यांचे हाताखालच्या मजुरांवर देखरेख ठेवणे अवघड जाते.

टॅग्स :agricultureशेती