शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

सव्वादोन टक्क्यांच्या रकमेत उदरनिर्वाह करायचा कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 10:36 IST

ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाने ‘रोजगारसेवक’ या पदाची निर्मिती केली. मात्र, अत्यल्प मानधनात गुजराण करायची कशी, असा महत्त्वपूर्ण प्रश्न रोजगारसेवकांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देरोजगारसेवकांना अत्यल्प मानधन किमान तीन हजार मजूर कामावर असणे आवश्यक

राम वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनांद : ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करण्यासाठी शासनाने ‘रोजगारसेवक’ या पदाची निर्मिती केली. रोजगारसेवक मानधनावर कार्यरत आहे. पूर्वी त्यांना दर महिन्याला ठराविक मानधन दिले जायचे. मात्र, शासनाने यात फेरबदल केला असून, मानधनाच्या रकमेचा संबंध कामावर असलेल्या मजुरांच्या संख्येशी जोडला. नवीन नियमानुसार त्यांना सव्वादोन टक्के मानधन मिळणार असून, त्यासाठी किमान तीन हजार मजूर कामावर असणे अनिवार्य आहे. या अत्यल्प मानधनात गुजराण करायची कशी, असा महत्त्वपूर्ण प्रश्न रोजगारसेवकांनी उपस्थित केला आहे.ग्रामीण भागात शासनाच्यावतीने महात्मा गांधी राष्टय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे केली जात असून, ती कामे मजुरांकरवी केली जातात. त्या मजुरांवर देखरेख ठेवणे तसेच त्यांचे हजेरीपत्रक तयार करण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर रोजगार सेवकाची नियुक्ती करण्यात आली. ग्रामीण भागातून शहरांकडे येणारा बेरोजगारांचा लोंढा थांबविण्यासाठी शासनाने हा उपक्रम सुरू केला. त्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम २००५ पारित करून त्याआधारे ग्रामीण भागातील एका कुटुंबाला वर्षभरात किमान १०० दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी दिली.

मानधनाचे स्वरूपया रोजगारसेवकांना त्यांच्या मजुरीच्या हजेरीपत्रकाप्रमाणे मानधन दिले जाते. महिनाभरात तीन हजार मजूर कामावर असल्यास त्यांना सव्वादोन टक्के, दोन हजार मजुरांवर चार टक्के आणि एक हजार मजुरांवर सहा टक्के मानधन दिले जाते. त्याला ग्रामपंचायत प्रशासनाने कामानिमित्त पंचायत समिती कार्यालयात पाठविले तर २२५ रुपये अतिरिक्त दिले जाते. त्यांना महिनाभरात चारदा पंचायत समिती कार्यालयात जावे लागत असून, प्रवासभत्ता हा महिन्याकाठी आठ दौऱ्यांचा ग्राह्य धरला जातो. त्यामुळे दौऱ्याचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंडही त्यांना सोसावा लागतो.

वर्षभरापासून मानधन नाहीभिवापूर तालुक्यातील बहुतांश रोजगारसेवक पदवीधर असून, त्यांना वर्षभरापासून त्यांच्या कामाचे मानधन व प्रवासभत्ता मिळाला नाही. काहींचे तीन महिन्यांपासून मानधन प्रशासनाकडे प्रलंबित आहे. अशा विपरीत परिस्थितीत केवळ गरज म्हणून रोजगारसेवक कामे करीत आहेत. पंचायत समितीच्या रोजगार हमी विभागातील काही नियमित व कंत्राटी कर्मचारी स्वत:ला अधिकारी समजून रोजगारसेवकांना त्रास देत असतात. त्यांना वारंवार परत पाठवीत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. या प्रकारामुळे त्यांचे हाताखालच्या मजुरांवर देखरेख ठेवणे अवघड जाते.

टॅग्स :agricultureशेती