शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कशी ही बनवाबनवी?

By admin | Updated: July 14, 2014 02:47 IST

यंदा मान्सून लांबल्याने महागाईत भाज्यांच्या वाढीव दराची

भाज्यांच्या दरात प्रचंड तफावत : नियंत्रण कुणाचे?नागपूर : यंदा मान्सून लांबल्याने महागाईत भाज्यांच्या वाढीव दराची भर पडली आहे. बहुतांश गृहिणी भाज्यांची खरेदी घरासमोर करीत असल्याचा फायदा किरकोळ विक्रेते घेत आहेत. रविवारी ठोक बाजारात ४० रुपये किलोचा दराची कोथिंबीर किरकोळमध्ये १२० रुपये तर ५० रुपये किलोची मिरची १०० आणि ४० च्या टमाटरची १०० रुपयांत विक्री सुरू आहे. दरांच्या बनवाबनवीने गृहिणींचे महिन्याचे बजेट पूर्णत:च बिघडले आहे.बाजारपेठेत ठोक आणि किरकोळमधील भावात प्रचंड तफावत दिसून येत आहे. ठोक बाजारात खरेदी केलेल्या भाज्या खराब होत असल्याने आम्हाला जास्त भावाने विकाव्या लागतात, शिवाय दिवसभरात १०० रुपयांचे २०० रुपये झाले नाही तर भाज्या विकण्यात मजा नाही, असे किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले. अर्थात किरकोळ विक्रेते १०० ते १५० टक्के नफा कमावून भाज्यांची विक्री करीत आहेत. नियंत्रणासाठी शासकीय यंत्रणा असावी, अशी गृहिणींची मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी तातडीने पाऊल उचलावे, अशी अपेक्षा आहे.मागणी व पुरवठ्याचे प्रमाण योग्य या मोसमात भाज्यांचे भाव कमी असतात, ही बाब खरी आहे. पण यावर्षी मान्सून वेळेवर न आल्याने आवक कमी असली तरीही मागणी आणि पुरवठ्याचे गणित तंतोतंत आहे. किरकोळमध्ये भाव वाढल्याचे काहीही कारण नसल्याचे ठोक विक्रेत्यांचे मत आहे. कळमना बाजारात रविवारी ५० मोठे ट्रक आणि ३ ते ८ टन वजनाच्या १०० गाड्यांची आवक होती. सध्या पाऊस नसल्याने वांगे किडरहित आहे. स्थानिकांसह बाहेरगावातून मोठ्या प्रमाणात आवक आहे. त्यामुळे कळमना ठोक बाजारात वांगे ४ रुपये किलो, पत्ता कोबी १० ते १२ रुपये, फुलकोबी १५ ते २० आणि कोहळे ५ ते ६ रुपये किलो दराने विक्री झाली.फुलकोबी कोल्हापूर येथून येत आहे. नारायणगाव, इंदूर, हवेली येथून टमाटर, पत्ता कोबी बेळगाव व मुलताई, कोथिंबीर लातूर व नांदेड, गवार हैदराबाद, हिरवी मिरची हावेरी (कर्नाटक), सिमला मिरची सांगली व नाशिक, भंडारा व मंडला (मध्य प्रदेश) कारले आणि वांगे नागपूर, दिग्रस, परतवाडा, अंजनगाव, वरुड व आंध्र प्रदेशातून येत आहेत. जुलैच्या अखेरीस भाव कमी होण्याचे संकेत आहेत.(प्रतिनिधी)किरकोळमध्ये कांदे व बटाटे ३० रुपयेकेंद्र सरकारच्या निर्बंधानंतर कांदे आणि बटाट्याचे भाव आटोक्यात आहेत. किरकोळमध्ये ३० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. कळमना ठोक बाजारात लाल कांदे १७ ते २१ रुपये किलो असून आवक दररोज १० ते १२ ट्रक आणि पांढरे कांदे १७ ते १९ रुपये किलो तर आवक १० ते १२ ट्रक असल्याची माहिती कळमन्यातील आलू-कांदा असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी लोकमतशी बोलताना दिली. भाज्याच्या किमती वाढताच बटाट्याला मागणी वाढली. ठोक बाजारात रविवारी दर्जानुसार भाव प्रति किलो १८ ते १९ रुपये होते. किरकोळमध्ये ३० रुपयात विक्री सुरू आहे. कळमन्यात छिंदवाडा, आग्रा, कानपूर, अहमदाबाद येथून आवक आहे.