शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

कशी ही बनवाबनवी?

By admin | Updated: July 14, 2014 02:47 IST

यंदा मान्सून लांबल्याने महागाईत भाज्यांच्या वाढीव दराची

भाज्यांच्या दरात प्रचंड तफावत : नियंत्रण कुणाचे?नागपूर : यंदा मान्सून लांबल्याने महागाईत भाज्यांच्या वाढीव दराची भर पडली आहे. बहुतांश गृहिणी भाज्यांची खरेदी घरासमोर करीत असल्याचा फायदा किरकोळ विक्रेते घेत आहेत. रविवारी ठोक बाजारात ४० रुपये किलोचा दराची कोथिंबीर किरकोळमध्ये १२० रुपये तर ५० रुपये किलोची मिरची १०० आणि ४० च्या टमाटरची १०० रुपयांत विक्री सुरू आहे. दरांच्या बनवाबनवीने गृहिणींचे महिन्याचे बजेट पूर्णत:च बिघडले आहे.बाजारपेठेत ठोक आणि किरकोळमधील भावात प्रचंड तफावत दिसून येत आहे. ठोक बाजारात खरेदी केलेल्या भाज्या खराब होत असल्याने आम्हाला जास्त भावाने विकाव्या लागतात, शिवाय दिवसभरात १०० रुपयांचे २०० रुपये झाले नाही तर भाज्या विकण्यात मजा नाही, असे किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले. अर्थात किरकोळ विक्रेते १०० ते १५० टक्के नफा कमावून भाज्यांची विक्री करीत आहेत. नियंत्रणासाठी शासकीय यंत्रणा असावी, अशी गृहिणींची मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी तातडीने पाऊल उचलावे, अशी अपेक्षा आहे.मागणी व पुरवठ्याचे प्रमाण योग्य या मोसमात भाज्यांचे भाव कमी असतात, ही बाब खरी आहे. पण यावर्षी मान्सून वेळेवर न आल्याने आवक कमी असली तरीही मागणी आणि पुरवठ्याचे गणित तंतोतंत आहे. किरकोळमध्ये भाव वाढल्याचे काहीही कारण नसल्याचे ठोक विक्रेत्यांचे मत आहे. कळमना बाजारात रविवारी ५० मोठे ट्रक आणि ३ ते ८ टन वजनाच्या १०० गाड्यांची आवक होती. सध्या पाऊस नसल्याने वांगे किडरहित आहे. स्थानिकांसह बाहेरगावातून मोठ्या प्रमाणात आवक आहे. त्यामुळे कळमना ठोक बाजारात वांगे ४ रुपये किलो, पत्ता कोबी १० ते १२ रुपये, फुलकोबी १५ ते २० आणि कोहळे ५ ते ६ रुपये किलो दराने विक्री झाली.फुलकोबी कोल्हापूर येथून येत आहे. नारायणगाव, इंदूर, हवेली येथून टमाटर, पत्ता कोबी बेळगाव व मुलताई, कोथिंबीर लातूर व नांदेड, गवार हैदराबाद, हिरवी मिरची हावेरी (कर्नाटक), सिमला मिरची सांगली व नाशिक, भंडारा व मंडला (मध्य प्रदेश) कारले आणि वांगे नागपूर, दिग्रस, परतवाडा, अंजनगाव, वरुड व आंध्र प्रदेशातून येत आहेत. जुलैच्या अखेरीस भाव कमी होण्याचे संकेत आहेत.(प्रतिनिधी)किरकोळमध्ये कांदे व बटाटे ३० रुपयेकेंद्र सरकारच्या निर्बंधानंतर कांदे आणि बटाट्याचे भाव आटोक्यात आहेत. किरकोळमध्ये ३० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. कळमना ठोक बाजारात लाल कांदे १७ ते २१ रुपये किलो असून आवक दररोज १० ते १२ ट्रक आणि पांढरे कांदे १७ ते १९ रुपये किलो तर आवक १० ते १२ ट्रक असल्याची माहिती कळमन्यातील आलू-कांदा असोसिएशनचे अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी लोकमतशी बोलताना दिली. भाज्याच्या किमती वाढताच बटाट्याला मागणी वाढली. ठोक बाजारात रविवारी दर्जानुसार भाव प्रति किलो १८ ते १९ रुपये होते. किरकोळमध्ये ३० रुपयात विक्री सुरू आहे. कळमन्यात छिंदवाडा, आग्रा, कानपूर, अहमदाबाद येथून आवक आहे.