शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

देशाच्या हृदयस्थळाचे जतन कसे होणार?

By admin | Updated: April 18, 2016 05:37 IST

देशाचे भौगोलिक मध्यवर्ती ठिकाण म्हणजे नागपूर आणि नागपूर शहरातील झिरो माईलचा स्तंभ म्हणजे देशाचा

नागपूर : देशाचे भौगोलिक मध्यवर्ती ठिकाण म्हणजे नागपूर आणि नागपूर शहरातील झिरो माईलचा स्तंभ म्हणजे देशाचा भौगोलिक मध्यवर्ती बिंदू होय. येथून देशभरातील शहरांचे अंतर मोजले जाते. त्यामुळे हे ठिकाण नागपूर शहराचेच नव्हे तर देशाचे मानचिन्ह व देशाचे हृदयस्थळ म्हणूनही ओळखले जाते. परंतु देखभाल-दुरुस्तीअभावी झिरो माईलच्या स्तंभाला तडे पडले आहेत. परंतु याकडे कुणाचेही लक्ष नाही. त्यामुळे देशातील या हृदयस्थळाचे जतन कसे होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागपूर हे देशातील मध्यवर्ती शहर आहे. याची जाण ठेवून स्वातंत्र्यपूर्व काळात एका इंग्रज अधिकाऱ्याने देशातील या मध्यवर्ती ठिकाणचे भौगोलिक मध्यबिंदू शोधून काढले. देशाचे ते भौगोलिक मध्यबिंदू म्हणजे आपले झिरो माईल होय. या ठिकाणी एक सुंदर असा स्तंभ उभारण्यात आला. हा स्तंभ गोवारी शहीद स्मारक व रिझर्व्ह बँक चौक यादरम्यान उभारण्यात आला आहे. हा स्तंभ कधी उभारण्यात आला, याचा कालावधी दर्शविला नाही. परंतु याच्या बाजूलाच एक दुसरा दगडसुद्धा उभारण्यात आला आहे. त्यावर १९०७ हे वर्ष नोंदविलेले असून, त्यात समुद्रसपाटीपासूनच्या अंतराची नोंद आहे. त्यावरून असे आढळून येते की, झिरो माईलच्या स्तंभाची निर्मिती कदाचित यावर्षी करण्यात आली असावी, असे मानले जाते. या स्तंभाची निर्मिती वालुकाश्मापासून करण्यात आली आहे. त्याचा पायवा गोलाकार असून, त्याचा परीघ ७.९० मीटर इतका आहे. त्याचा पायवा हा षटकोणी आहे. या षटकोणी दगडाचा एक भाग हा एक मीटरचा आहे. या षटकोणी दगडाची उंची ६.५ मीटर एवढी आहे. या षटकोणी दगडावर विविध शहरांचे अंतर दर्शविले आहे. नागपूर शहरातील चारही बाजूंनी असलेल्या शहराचे अंतर मोजण्यात आले. वेकोलिने स्वीकारली होती जबाबदारी यासंदर्भात हेरिटेज कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, झिरो माईलचा विकास करण्याचा मुद्दा समितीच्यापुढे आला होता. तेव्हा वेकोलिने याच्या विकासाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली होती. त्यासंदर्भात नासुप्रची मंजुरी घेऊन तसा प्रस्ताव हेरिटेज कमिटीकडे पाठवावयाचा होता, परंतु पुढे काय झाले, कुणालाच माहीत नाही. तेव्हा याचा विकास करणार तरी कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.