शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

ताडोबातील गावे कशी हटविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 11:54 PM

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील रानतळोदी, पळसगाव व कोळसा या गावांचे स्थलांतरण कसे कराल, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला करून यावर १८ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाची विचारणा : सरकारला मागितले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील रानतळोदी, पळसगाव व कोळसा या गावांचे स्थलांतरण कसे कराल, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला करून यावर १८ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.२००८ मध्ये न्यायालयाने वने व वन्यप्राण्यांच्या संवर्धनाकरिता स्वत:हून जनहित याचिका दाखल केली आहे. त्या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, याचिकेचे कामकाज पाहणारे न्यायालय मित्र वरिष्ठ वकील सी. एस. कप्तान यांनी रानतळोदी, पळसगाव व कोळसा या गावांना वनांच्या बाहेर स्थलांतरित करण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर स्पष्टीकरण देताना सरकारी वकील एन. आर. राव यांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार स्थलांतरासाठी आधी गावकऱ्यांनी त्यांच्या पसंतीचे ठिकाणी सांगणे आवश्यक असल्याची व त्यानंतरच राज्य सरकार आवश्यक कार्यवाही सुरू करू शकत असल्याची माहिती दिली. सरकारच्या या मोघम स्पष्टीकरणाने न्यायालयाचे समाधान झाले नाही. स्थलांतरणासाठी पसंतीचे ठिकाण सांगण्याची संधी मिळणे म्हणजे स्थलांतरण टाळण्याचा पर्याय होत नाही. हे प्रकरण गेल्या १० वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित आहे. ते पाहता गावकरी दुसरीकडे स्थलांतरित होण्याच्या विचारात असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे राज्य सरकारनेच गावे स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करावी व ही गावे चार महिन्यांत कशी स्थलांतरित होतील यावर दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्यात यावे, असे न्यायालयाने सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प