शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
2
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
3
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
4
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
5
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
6
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
7
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
8
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
9
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
10
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
11
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
12
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
13
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
14
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
15
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
16
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
17
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
18
पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक
19
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
20
चुकूनही अशा फंद्यात पडू नका; मुंबईतील बँक कर्मचाऱ्याने झटक्यात गमावले २.५९ लाख रुपये!

पुनर्वसित गावे तक्रारमुक्त कशी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:12 IST

भिवापूर : गोसेखुर्दच्या खोऱ्यातील बुडीत, पुनर्वसित गावे ३० ते ३५ वर्षांपासून वेदनांचे माहेरघर ठरले आहे. ही गावे आता ‘तक्रारमुक्त’ ...

भिवापूर : गोसेखुर्दच्या खोऱ्यातील बुडीत, पुनर्वसित गावे ३० ते ३५ वर्षांपासून वेदनांचे माहेरघर ठरले आहे. ही गावे आता ‘तक्रारमुक्त’ व्हावी. यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपराजधानीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत आदेश दिलेत. त्यानुसार अधिकाऱ्यांचा फौजफाटा आता पुनर्वसनात पोहोचत आहे. मात्र प्रकल्पग्रस्तांना याची पूर्वकल्पनाच नसल्यामुळे तक्रारी करायला आणि समस्यांचा पाढा वाचायला येणार तरी कोण, हा प्रश्नच आहे. राज्यमंत्र्यांच्या दिशानिर्देशाला अशाप्रकारचा सुरूंग लागत असल्यामुळे पुनर्वसित गावे ‘तक्रारमुक्त’ होणार कशी, असा प्रश्न विचारला जात आहे.

गत १९ जुलै रोजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विभागीय आयुक्त कार्यालय येथे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद नागपूर व भंडारा, विदर्भ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. गोसेखुर्द प्रकल्प व प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. शिवाय पुनर्वसित गावे तक्रारमुक्त होण्याच्या दृष्टीने महसूल, जिल्हा परिषद आणि जलसंपदा या तिन्ही विभागातील अधिकाऱ्यांची समिती स्थापन करावी. या समितीने गोसेखुर्द प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक पुनर्वसित गावात जाऊन प्रकल्पग्रस्तांच्या समस्या व तक्रारी एकूण त्या तत्काळ निकाली काढण्याचे निर्देश राज्यमंत्री कडू यांनी दिले. त्यासाठी संबंधित पुनर्वसनातील चावडीवर पाच ते सहा दिवसांपूर्वी नोटीस लावणे, गावात दवंडी देण्याचे निर्देशीत केले होते. जेणेकरून पुनर्वसनातील तक्रारी एकूण घेण्यासाठी समिती येत असल्याची पूर्वकल्पना प्रकल्पग्रस्तांना असावी. एकंदरीत प्रकल्पग्रस्तांना या समितीपुढे वैयक्तिक व सार्वजनिक तक्रार नोंदविता येईल आणि समिती त्याचे तत्काळ निराकरण करेल, हा त्यामागचा उद्देश होता. मात्र भिवापूर व कुही तालुक्यात राज्यमंत्र्यांच्या दिशानिर्देशाला प्रशासनाने हरताळ फासल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. कारण नोटीस न लावता, दवंडी व देता, प्रकल्पग्रस्तांना पूर्वकल्पना न देता ही समिती अचानक पुनर्वसनात दाखल होत आहे. प्रकल्पग्रस्तांना याची पूर्वकल्पना नसल्यामुळे ते पोटाची खळगी भरण्यासाठी सकाळीच कामावर निघून जातात. अशात समितीच्या अधिकाऱ्यांचा फौजफाटा पुनर्वसनात येतो. मात्र प्रकल्पग्रस्त उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या समस्या व तक्रारी समिती समोर मांडणार कोण? राज्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील ‘तक्रारमुक्त गाव’ अभियानाला प्रशासन थातूरमातूर पद्धतीने आटोपण्याचा प्रयत्न करत आहे. असा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.

मुंडण-मशाल आणि अधिकारी खुशाल-------

प्रकल्पग्रस्तांना पूर्वसूचना न देता संबंधित अधिकारी पुनर्वसनस्थळावर जात ‘तक्रारमुक्त गाव’ अभियान राबवित आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना आपल्या समस्या व तक्रारी मांडता आल्या नाहीत. भिवापूर व कुही तालुक्यात पुन्हा नव्याने सुधारित पद्धतीने हे अभियान राबवावे. अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. अन्यथा २५ ते ३० ऑगस्टदरम्यान प्रशासनाविरुद्ध ‘मुंडण-मशाल आणि अधिकारी खुशाल’ असे आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने दिला आहे. यावेळी बाळकृष्ण जुवार, यशवंत टिचकुले, रोशन गायधने, अनिल कुकुडकर, अजय करूटकर, धर्मपाल डोंगरे, डुबराज गुरपुडे, संदीप गजभिये, शंकर तितरमारे, देवराम कडूकर, तुळशीराम लुचे, उत्तम देशपांडे, उद्धव शिवरकर, सूरज नरुले, विलास चंदनखेडे, एजाजअली नबीअली सय्यद उपस्थित होते.