शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
3
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
4
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
5
IND vs WI : टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
6
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
7
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
8
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
9
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
10
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
11
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
12
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
13
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
14
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
15
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
16
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
19
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
20
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?

पुनर्वसित गावे तक्रारमुक्त कशी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:12 IST

भिवापूर : गोसेखुर्दच्या खोऱ्यातील बुडीत, पुनर्वसित गावे ३० ते ३५ वर्षांपासून वेदनांचे माहेरघर ठरले आहे. ही गावे आता ‘तक्रारमुक्त’ ...

भिवापूर : गोसेखुर्दच्या खोऱ्यातील बुडीत, पुनर्वसित गावे ३० ते ३५ वर्षांपासून वेदनांचे माहेरघर ठरले आहे. ही गावे आता ‘तक्रारमुक्त’ व्हावी. यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उपराजधानीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत आदेश दिलेत. त्यानुसार अधिकाऱ्यांचा फौजफाटा आता पुनर्वसनात पोहोचत आहे. मात्र प्रकल्पग्रस्तांना याची पूर्वकल्पनाच नसल्यामुळे तक्रारी करायला आणि समस्यांचा पाढा वाचायला येणार तरी कोण, हा प्रश्नच आहे. राज्यमंत्र्यांच्या दिशानिर्देशाला अशाप्रकारचा सुरूंग लागत असल्यामुळे पुनर्वसित गावे ‘तक्रारमुक्त’ होणार कशी, असा प्रश्न विचारला जात आहे.

गत १९ जुलै रोजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विभागीय आयुक्त कार्यालय येथे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद नागपूर व भंडारा, विदर्भ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. गोसेखुर्द प्रकल्प व प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. शिवाय पुनर्वसित गावे तक्रारमुक्त होण्याच्या दृष्टीने महसूल, जिल्हा परिषद आणि जलसंपदा या तिन्ही विभागातील अधिकाऱ्यांची समिती स्थापन करावी. या समितीने गोसेखुर्द प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक पुनर्वसित गावात जाऊन प्रकल्पग्रस्तांच्या समस्या व तक्रारी एकूण त्या तत्काळ निकाली काढण्याचे निर्देश राज्यमंत्री कडू यांनी दिले. त्यासाठी संबंधित पुनर्वसनातील चावडीवर पाच ते सहा दिवसांपूर्वी नोटीस लावणे, गावात दवंडी देण्याचे निर्देशीत केले होते. जेणेकरून पुनर्वसनातील तक्रारी एकूण घेण्यासाठी समिती येत असल्याची पूर्वकल्पना प्रकल्पग्रस्तांना असावी. एकंदरीत प्रकल्पग्रस्तांना या समितीपुढे वैयक्तिक व सार्वजनिक तक्रार नोंदविता येईल आणि समिती त्याचे तत्काळ निराकरण करेल, हा त्यामागचा उद्देश होता. मात्र भिवापूर व कुही तालुक्यात राज्यमंत्र्यांच्या दिशानिर्देशाला प्रशासनाने हरताळ फासल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. कारण नोटीस न लावता, दवंडी व देता, प्रकल्पग्रस्तांना पूर्वकल्पना न देता ही समिती अचानक पुनर्वसनात दाखल होत आहे. प्रकल्पग्रस्तांना याची पूर्वकल्पना नसल्यामुळे ते पोटाची खळगी भरण्यासाठी सकाळीच कामावर निघून जातात. अशात समितीच्या अधिकाऱ्यांचा फौजफाटा पुनर्वसनात येतो. मात्र प्रकल्पग्रस्त उपस्थित नसल्यामुळे त्यांच्या समस्या व तक्रारी समिती समोर मांडणार कोण? राज्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील ‘तक्रारमुक्त गाव’ अभियानाला प्रशासन थातूरमातूर पद्धतीने आटोपण्याचा प्रयत्न करत आहे. असा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.

मुंडण-मशाल आणि अधिकारी खुशाल-------

प्रकल्पग्रस्तांना पूर्वसूचना न देता संबंधित अधिकारी पुनर्वसनस्थळावर जात ‘तक्रारमुक्त गाव’ अभियान राबवित आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना आपल्या समस्या व तक्रारी मांडता आल्या नाहीत. भिवापूर व कुही तालुक्यात पुन्हा नव्याने सुधारित पद्धतीने हे अभियान राबवावे. अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. अन्यथा २५ ते ३० ऑगस्टदरम्यान प्रशासनाविरुद्ध ‘मुंडण-मशाल आणि अधिकारी खुशाल’ असे आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने दिला आहे. यावेळी बाळकृष्ण जुवार, यशवंत टिचकुले, रोशन गायधने, अनिल कुकुडकर, अजय करूटकर, धर्मपाल डोंगरे, डुबराज गुरपुडे, संदीप गजभिये, शंकर तितरमारे, देवराम कडूकर, तुळशीराम लुचे, उत्तम देशपांडे, उद्धव शिवरकर, सूरज नरुले, विलास चंदनखेडे, एजाजअली नबीअली सय्यद उपस्थित होते.