शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरातील ५५ हजार लोकांचे पुनर्वसन कसे करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 12:09 IST

Nagpur News नागपुरातील नाग नदीच्या काठावरील २९ झोपडपट्ट्यांतील ५५ हजार लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे. यासाठी कोणतीही योजना नसताना नाग नदीचे पुनरुज्जीवन कसे होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

ठळक मुद्दे पुनर्वसन स्थळाचा ठावठिकाणा नाहीनाग नदी पुनरुज्जीवन

गणेश हूड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नाग नदीचे गतवैभव प्राप्त व्हावे, प्रदूषित झालेली ही नदी स्वच्छ व्हावी, अशी शहरातील सर्वच नागरिकांची इच्छा आहे. केंद्र सरकारने २११७.७९ कोटींच्या नाग नदी पुनरुज्जीवन प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. प्रकल्प राबविताना नाग नदीच्या काठावर १५ मीटरपर्यंत ‘नो डेव्हलपमेंट झोन’ घोषित करावे लागेल. अर्थातच नदीकाठावरील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन केल्याशिवाय हा प्रकल्प राबविता येणार नाही. नाग नदीच्या काठावरील २९ झोपडपट्ट्यांतील ५५ हजार लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे. यासाठी कोणतीही योजना नसताना नाग नदीचे पुनरुज्जीवन कसे होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

नदीकाठावरील २९ झोपडपट्ट्यांत ९७१८ घरे असून, येथील लोकसंख्या ५५ हजार २१० इतकी आहे. पुनरुज्जीवन प्रकल्प राबविताना नदीच्या दोन्ही बाजूचे १५ मीटरपर्यंतचे पात्र मोकळे असणे आवश्यक आहे. झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन झाल्याशिवाय पात्रालगतची जागा मोकळी होणार नाही. यातील २२ झोपडपट्ट्या १९७१ ते १९९२ सालात वसलेल्या आहेत. कायद्याने या झोपडपट्ट्यांना संरक्षण प्राप्त आहे. सात झोपडपट्ट्या १९९२ सालानंतरच्या आहे. त्यामुळे या झोपडपट्ट्यांनाही हटविणे शक्य नाही.

नाग नदीचा गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर विकास प्रस्तावित आहे. परंतु, नदी किनाऱ्यावरील सार्वजनिक वापराच्या जागा, क्रीडांगण व निवासी वापरासाठी आरक्षित असलेल्या जागांवर या झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत तसेच नदीकाठावर मोठ्या प्रमाणात बहुमजली इमारती आहेत. त्यांच्याही पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. पुनरुज्जीवन करताना नदीपात्रात सोडण्यात येणारे सिवरेज, सांडपाणी बंद करणे आवश्यक आहे तसेच नदीपात्रात कचरा टाकण्याचा प्रकार थांबला पाहिजे.

या प्रकल्पाचा एकूण खर्च २११७.७१ कोटी एवढा आहे. प्रकल्पामध्ये केंद्र शासन, राज्य शासन व नागपूर महानगरपालिका यांचा अनुक्रमे ६०:२५:१५ या प्रमाणात हिस्सा आहे. केंद्र शासनाकडून ६० टक्के म्हणजे १३२३.५१ कोटी, राज्य शासनाकडून २५ टक्के म्हणजे ४९६.३८ कोटी व मनपाकडून १५ टक्के म्हणजे २९७.८२ कोटी खर्च केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासन जपानची वित्तीय संस्था जिका (जापान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी) कडून १८६४.३ कोटी रुपये अर्थसाहाय्य घेणार आहे.

.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटी