शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

‘डेंग्यू’ कसा रोखणार ?

By admin | Updated: November 20, 2014 01:06 IST

शहरावर डेंग्यू या जीवघेण्या आजाराने ‘अटॅक’ केला आहे. आजाराची गंभीरता व भीषणता पाहता प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्या यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात

हायकोर्टात पुन्हा एक याचिका : उपाययोजनेचे निर्देश देण्याची विनंतीनागपूर : शहरावर डेंग्यू या जीवघेण्या आजाराने ‘अटॅक’ केला आहे. आजाराची गंभीरता व भीषणता पाहता प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्या यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दुसरी जनहित याचिका दाखल झाली आहे. न्यायालयाने आज, बुधवारी दोन्ही याचिका एकत्र सुनावणीसाठी ठेवण्याचे निर्देश प्रबंधक कार्यालयाला दिलेत.अनिल आग्रे असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते समाजसेवक आहेत. शहरात यावर्षी २० डेंग्यू रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. महानगरपालिकेचे स्वच्छता व नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष असल्यामुळे डेंग्यूचा प्रसार झपाट्याने होत आहे. शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाख असताना मनपाच्या आरोग्य विभागात केवळ १२ अधिकारी कार्यरत आहेत. मेयो व मेडिकल या दोन महत्त्वाच्या शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत. मनपा रुग्णालयांची अवस्थाही अत्यंत दयनीय आहे. शहरातील रस्त्यारस्त्यांवर जनावरांची कत्तल केली जाते. जनावरांच्या निरुपयोगी अवयवांची योग्य विल्हेवाट लावल्या जात नाही. यावर कुणाचेही नियंत्रण नाही. स्वच्छता कर्मचारी स्वत:चे कर्तव्य योग्य पद्धतीने बजावत नाहीत. विभागीय आयुक्तांनी ११ नोव्हेंबर २०१३ रोजी नाग नदीच्या शुद्धीकरणासाठी समिती स्थापन केली होती. समितीने मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली. परंतु, यातून काहीही साध्य झालेले नाही. नियमित साफसफाई होत नसल्यामुळे शहरात असंख्य ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे जमा होतात. यात डेंग्यू डासांची पैदास होते. शहर डेंग्यूच्या विळख्यात जाण्यासाठी प्रशासन जबाबदार असून त्यांना योग्य कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावेत, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकेत राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे सचिव, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मेडिकलचे अधिष्ठाता, पोलीस आयुक्त व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. श्रीकांत खंडाळकर यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)