शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

१५ हजार रुपयांत कशा होणार स्पर्धा?; आयोजक हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 11:25 IST

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे सुरू असलेल्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे खेळाडूंचे हाल होत आहे.

ठळक मुद्देगेल्यावर्षीचा स्पर्धेचा निधीच मिळाला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे सुरू असलेल्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत सोयीसुविधा उपलब्ध नसल्यामुळे खेळाडूंचे हाल होत आहे. सलग दोन दिवसांपासून लोकमतने हा विषय उचलून धरला आहे. यासंदर्भात स्पर्धेचे इंचार्ज योगेश खोब्रागडे यांना विचारणा केली असता, आम्ही काय करणार? १५ हजार रुपयांत होतात का स्पर्धा? गेल्यावर्षीचा क्रीडा स्पर्धेचा निधी अजूनही मिळालेला नाही? यासाठी आयोजक जबाबदार नसून शासन जबाबदार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.मानकापूर क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय, शहरस्तरीय व विभागीय अशा सहा दिवस शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे. स्पर्धेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पहिल्या दिवशी पिण्याच्या पाण्याचीदेखील सोय नव्हती. आॅक्टोबर हिटचा चटका सहन करीत विद्यार्थी उन्हात दम टाकत बसल्याचे चित्र होते. त्यांच्यासाठी सावलीची सोय करण्यात आली नव्हती. चेंजिंग रुम, शौचालयाची सोय, प्राथमिक उपचार या सुविधासुद्धा उपलब्ध करण्यात आल्या नव्हत्या.यासंदर्भात आयोजन प्रमुखांनी सांगितले की, जवळपास ४५० च्या जवळपास विद्यार्थी या स्पर्धेसाठी येतात. १५ हजार रुपये या स्पर्धेसाठी उपलब्ध करून देण्यात येतात. त्यातही स्टेशनरीचे २५०० रुपये कापून घेतल्या जातात. दररोजचा पाण्याचा खर्च हा चार हजार रुपयांवर येतो. रेफरी आणि कोचचे आठ ते दहा हजार रुपये पेड करावे लागतात. पेंडॉल खुर्च्या याचा खर्च किमान १० हजार रुपये येतो. मिळणाऱ्या निधीपेक्षा खर्चच जास्त असल्याने कुठून करणार विद्यार्थ्यांच्या सोयी असा सवाल त्यांनी केला. निधीअभावी आम्ही कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध करू शकत नाही. साधी वीजसुद्धा उपलब्ध होऊ शकत नाही. २०० रुपयांच्या बॅटरीवर साऊंडचे काम सुरू आहे. आयोजक काहीच करू शकत नाही. जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड व विभागीय क्रीडा अधिकारी सुभाष रेवतकर यांनी निधी वाढवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. गेल्यावर्षी झालेल्या स्पर्धेचा निधी अजूनही मिळाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. - शाळांकडून जमा होणारा पैसा जातो कुठे?शाळांकडून क्रीडा शुल्काच्या नावाने जिल्हा क्रीडा परिषद पैसा गोळा करते. या परिषदेचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असतात. हा निधी वर्षाला किमान १४ ते १५ लाख जमा होत असल्याचे सांगण्यात येते. यातून तुटपुंजी रक्कम स्पर्धेच्या आयोजनासाठी मिळते. तेही अ‍ॅडव्हान्स मिळत नाही. जिल्हा क्रीडा परिषदेकडे जमा होणारा क्रीडा स्पर्धेचा निधी इतर हेडवर खर्च केल्या जात असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Governmentसरकार