शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

आणखी किती विरथ गमावणार ?

By admin | Updated: January 9, 2016 03:22 IST

स्कूल बसमध्ये कंडक्टर नसल्याने विरथ झाडे या चिमुकल्याचा बळी गेला. विरथच्या मृत्यूला शनिवारी चार वर्षे होत आहे.

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरूच : बेलगाम स्कूल बसेसवर ब्रेक कुणाचा ?नागपूर : स्कूल बसमध्ये कंडक्टर नसल्याने विरथ झाडे या चिमुकल्याचा बळी गेला. विरथच्या मृत्यूला शनिवारी चार वर्षे होत आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न अद्यापही कायम आहे. आजही अनेक शाळांच्या बसमध्ये कंडक्टर नसल्याचे वास्तव आहे. पैसा कमविण्यासाठी ठिकठिकाणी उगवलेल्या शाळांच्या पिकांमुळे अवैध विद्यार्थी वाहतुकीचे गाजरगवत गल्लोगल्ली शहरात फोफावल्याचे चित्र आहे.नियम धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. आॅटो, खटारा झालेले सहा सीटर, मारुती व्हॅन, बस आणि आता ई-रिक्षानेही विद्यार्थ्यांना वाहतुकीचा ‘माल’च बनवून टाकले आहे. चांगल्या दर्जाच्या शिक्षणासाठी कित्येक कोवळे जीव साक्षात मृत्यू सोबत घेऊन शाळेत जात आहे. पवित्र शिक्षणाचा बाजार करून गल्लाभरू संस्थाचालकांना या नाजूक उमलणाऱ्या कळ्यांच्या सुरक्षेची खरेच काळजी आहे का, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी खच्चून भरलेल्या वाहनांना पाहून पडतो. बदलला तो केवळ स्कूल बसचा रंगस्कूल बस नियमावली लागू झाल्यानंतर पाच वर्षाच्या या कार्यकाळात केवळ स्कूल बसचा रंग बदलला. काही बसमधील आतील चित्र बदलले. परंतु बहुसंख्य बसचालक स्कूल बसचे नियम धाब्यावर बसवून धावत आहे. तज्ज्ञाच्या मते, आजही ३० टक्के स्कूल बसमध्ये कंडक्टर नाहीत. मुलींच्या बसमध्ये महिला कंडक्टर असणे आवश्यक असताना याकडेही दुर्लक्ष झाले आहे. २० टक्के वाहनांचे वय १५ वर्षांपेक्षा जास्त आहे. चढण्याची खालची पायरी जमिनीपासून ३०० मि.मि. पेक्षा अधिक उंचीच्या आहेत. अनेक बसच्या दोन्ही बाजूस बहिर्गाेल आरसे नाहीत. वाहनात शाळेची दप्तरे ठेवण्याची व्यवस्था नाही. वाहनाच्या दरवाजास चाईल्ड लॉक बसवलेले नाहीत. काहींना तर आपात्कालीन दरवाजाही नाही. नावाचीच प्रथमोपचार पेटी तर अग्निशामक यंत्र वाहनात आरटीओत फिटनेसचे प्रमाणपत्र घेतानाच दिसून येते.