शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

आणखी किती विरथ गमावणार ?

By admin | Updated: January 9, 2016 03:22 IST

स्कूल बसमध्ये कंडक्टर नसल्याने विरथ झाडे या चिमुकल्याचा बळी गेला. विरथच्या मृत्यूला शनिवारी चार वर्षे होत आहे.

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरूच : बेलगाम स्कूल बसेसवर ब्रेक कुणाचा ?नागपूर : स्कूल बसमध्ये कंडक्टर नसल्याने विरथ झाडे या चिमुकल्याचा बळी गेला. विरथच्या मृत्यूला शनिवारी चार वर्षे होत आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न अद्यापही कायम आहे. आजही अनेक शाळांच्या बसमध्ये कंडक्टर नसल्याचे वास्तव आहे. पैसा कमविण्यासाठी ठिकठिकाणी उगवलेल्या शाळांच्या पिकांमुळे अवैध विद्यार्थी वाहतुकीचे गाजरगवत गल्लोगल्ली शहरात फोफावल्याचे चित्र आहे.नियम धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. आॅटो, खटारा झालेले सहा सीटर, मारुती व्हॅन, बस आणि आता ई-रिक्षानेही विद्यार्थ्यांना वाहतुकीचा ‘माल’च बनवून टाकले आहे. चांगल्या दर्जाच्या शिक्षणासाठी कित्येक कोवळे जीव साक्षात मृत्यू सोबत घेऊन शाळेत जात आहे. पवित्र शिक्षणाचा बाजार करून गल्लाभरू संस्थाचालकांना या नाजूक उमलणाऱ्या कळ्यांच्या सुरक्षेची खरेच काळजी आहे का, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी खच्चून भरलेल्या वाहनांना पाहून पडतो. बदलला तो केवळ स्कूल बसचा रंगस्कूल बस नियमावली लागू झाल्यानंतर पाच वर्षाच्या या कार्यकाळात केवळ स्कूल बसचा रंग बदलला. काही बसमधील आतील चित्र बदलले. परंतु बहुसंख्य बसचालक स्कूल बसचे नियम धाब्यावर बसवून धावत आहे. तज्ज्ञाच्या मते, आजही ३० टक्के स्कूल बसमध्ये कंडक्टर नाहीत. मुलींच्या बसमध्ये महिला कंडक्टर असणे आवश्यक असताना याकडेही दुर्लक्ष झाले आहे. २० टक्के वाहनांचे वय १५ वर्षांपेक्षा जास्त आहे. चढण्याची खालची पायरी जमिनीपासून ३०० मि.मि. पेक्षा अधिक उंचीच्या आहेत. अनेक बसच्या दोन्ही बाजूस बहिर्गाेल आरसे नाहीत. वाहनात शाळेची दप्तरे ठेवण्याची व्यवस्था नाही. वाहनाच्या दरवाजास चाईल्ड लॉक बसवलेले नाहीत. काहींना तर आपात्कालीन दरवाजाही नाही. नावाचीच प्रथमोपचार पेटी तर अग्निशामक यंत्र वाहनात आरटीओत फिटनेसचे प्रमाणपत्र घेतानाच दिसून येते.