शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आतापर्यंत किती कोरोनाबाधित व्यक्ती रुग्णालयामध्ये भरती झाले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 22:28 IST

गेल्या मार्चपासून आतापर्यंत किती कोरोनाबाधित व्यक्ती रुग्णालयामध्ये भरती झाले, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला केली व यावर २ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देहायकोर्टाची विचारणा : २ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे सरकारला निर्देश

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गेल्या मार्चपासून आतापर्यंत किती कोरोनाबाधित व्यक्ती रुग्णालयामध्ये भरती झाले, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला केली व यावर २ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.सामाजिक कार्यकर्ते सत्यव्रत दत्ता व धर्मदास बागडे यांनी कोरोनाशी संबंधित विविध मागण्यांसह जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने हे निर्देश दिले. नागपूरमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या वारसदारांना प्रत्येकी पाच लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी, कोरोना पॉझिटिव्ह व क्वारंटाईनमधील रुग्णांना रोज ५०० रुपये देण्यात यावे, नागपूरमध्ये प्रत्येकी ५०० खाटा व आधुनिक आरोग्य सुविधांसह दोन रुग्णालये बांधण्यात यावी, जिल्ह्यामध्ये तालुकास्तरावर आवश्यक रुग्णालये बांधण्यात यावीत, हे काम तीन वर्षात पूर्ण करण्यात यावे आणि तोपर्यंत नागरिकांकडून कर वसूल करण्यात येऊ नये, अशा याचिकाकर्त्यांच्या मागण्या आहेत. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. सी. पी. चांदूरकर यांनी कामकाज पाहिले.खाटा अनुपलब्धतेवर जनहित याचिकाउच्च न्यायालयाने कोरोनाबाधित व्यक्तींना रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध केल्या जात नसल्याच्या बातमीची गंभीर दखल घेऊन यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. तसेच, याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली. सदर याचिकेवर २ सप्टेंबर रोजी दत्ता व बागडे यांच्या याचिकेसोबत सुनावणी होईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHigh Courtउच्च न्यायालय