शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
3
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
4
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
5
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
6
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
7
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
8
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
9
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
10
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
11
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
12
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
13
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
14
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
15
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
16
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
17
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
18
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
19
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
20
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल

कसे होणार प्रभावी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 07:00 IST

कोरोनाबाधितांशी मनपातर्फे प्रत्यक्ष किंवा फोनद्वारे संपर्कदेखील झाला नसल्याची बाब समोर आली आहे. अशा स्थितीत प्रभावी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देकाही कोरोनाबाधितांशी मनपाकडून संपर्कच नाहीअधिकाऱ्यांचे दावे हवेतच, वस्तुस्थिती वेगळीच

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत कोरोनाचा प्रकोप वाढतच असल्याचे चित्र असताना प्रशासनाचा गलथानपणादेखील समोर येत आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत असल्याचा दावा मनपाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात तर काही कोरोनाबाधितांशी मनपातर्फे प्रत्यक्ष किंवा फोनद्वारे संपर्कदेखील झाला नसल्याची बाब समोर आली आहे. अशा स्थितीत प्रभावी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर कोरोनाबाधितांशी संपर्क साधला जातो व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी होते, असे मनपाच्या अधिकाºयांकडून सांगितले जाते. मात्र लोकमतसमवेत काही जणांनी संपर्क केला असता मनपाचा हा दावा पूर्णत: खरा नसल्याची बाब समोर आली. गोपालनगर परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर दोन दिवस मनपाकडून कुठलाही फोन आला नाही. त्यानंतर मनपाच्या हेल्पलाईनवर संपर्क केला असता कुणीही प्रतिसाद दिला नाही. तिसऱ्या दिवशी संबंधित व्यक्तीची पत्नी पॉझिटिव्ह आल्यानंतर मनपाचे कर्मचारी घरावर स्टिकर लावायला आले. मात्र पती पॉझिटिव्ह असल्याची कुठलीही मनपाकडे माहितीच नव्हती.

आश्चर्याची बाब म्हणजे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी मनपाच्या कर्मचाऱ्यांनी बाधितांच्या संपर्कात आलेल्या सात ते आठ व्यक्तींची नावे व पत्ता लिहून घेतला. मात्र संबंधितांना ना कुठला फोन केला ना त्यांना कुणी जाऊन भेटले. अशा स्थितीत त्यांची चाचणी करण्याची बाब तर दूरच राहिली. असे प्रकार केवळ एकदाच झाले आहेत असे नाही. तर काही जणांनी आमच्यासोबतदेखील असेच झाले असल्याचे लोकमतला सांगितले.संपर्कात आलेल्यांना १० ते १२ दिवसांनी जाताहेत फोनकोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचे ट्रेसिंग व टेस्टिंग होणे आवश्यक आहे. ज्या बाधितांशी संपर्क साधण्यात येत आहे त्यांच्याकडून संपर्कात आलेल्यांची नावे व माहिती घेतली जाते. मात्र अनेकांना त्यानंतर १० ते १२ दिवसांनी संपर्क साधला जात आहे. इतक्या मोठ्या कालावधीत संबंधित व्यक्ती अनेकांच्या संपर्कात येते. जर ती व्यक्ती बाधित असेल तर मग कोरोनाचा आणखी फैलाव होण्याचा धोका असतो.अचानक का बदलली परिस्थितीसुरुवातीच्या काळात अधिकारी व कर्मचारी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग गंभीरतेने करत होते. मात्र आता या प्रक्रियेत काहीशी शिथिलता आली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे तसे अनुभवदेखील शहरात काही लोकांना आले आहेत. अचानक ही स्थिती का बदलली आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी मनपाचे अप्पर आयुक्त राम जोशी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस