शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
3
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
5
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
6
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
7
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
8
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
9
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
10
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
11
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
12
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
13
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
14
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
15
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
16
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
17
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
18
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
19
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
20
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?

कसे होणार प्रभावी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 07:00 IST

कोरोनाबाधितांशी मनपातर्फे प्रत्यक्ष किंवा फोनद्वारे संपर्कदेखील झाला नसल्याची बाब समोर आली आहे. अशा स्थितीत प्रभावी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देकाही कोरोनाबाधितांशी मनपाकडून संपर्कच नाहीअधिकाऱ्यांचे दावे हवेतच, वस्तुस्थिती वेगळीच

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत कोरोनाचा प्रकोप वाढतच असल्याचे चित्र असताना प्रशासनाचा गलथानपणादेखील समोर येत आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत असल्याचा दावा मनपाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात तर काही कोरोनाबाधितांशी मनपातर्फे प्रत्यक्ष किंवा फोनद्वारे संपर्कदेखील झाला नसल्याची बाब समोर आली आहे. अशा स्थितीत प्रभावी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर कोरोनाबाधितांशी संपर्क साधला जातो व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी होते, असे मनपाच्या अधिकाºयांकडून सांगितले जाते. मात्र लोकमतसमवेत काही जणांनी संपर्क केला असता मनपाचा हा दावा पूर्णत: खरा नसल्याची बाब समोर आली. गोपालनगर परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर दोन दिवस मनपाकडून कुठलाही फोन आला नाही. त्यानंतर मनपाच्या हेल्पलाईनवर संपर्क केला असता कुणीही प्रतिसाद दिला नाही. तिसऱ्या दिवशी संबंधित व्यक्तीची पत्नी पॉझिटिव्ह आल्यानंतर मनपाचे कर्मचारी घरावर स्टिकर लावायला आले. मात्र पती पॉझिटिव्ह असल्याची कुठलीही मनपाकडे माहितीच नव्हती.

आश्चर्याची बाब म्हणजे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी मनपाच्या कर्मचाऱ्यांनी बाधितांच्या संपर्कात आलेल्या सात ते आठ व्यक्तींची नावे व पत्ता लिहून घेतला. मात्र संबंधितांना ना कुठला फोन केला ना त्यांना कुणी जाऊन भेटले. अशा स्थितीत त्यांची चाचणी करण्याची बाब तर दूरच राहिली. असे प्रकार केवळ एकदाच झाले आहेत असे नाही. तर काही जणांनी आमच्यासोबतदेखील असेच झाले असल्याचे लोकमतला सांगितले.संपर्कात आलेल्यांना १० ते १२ दिवसांनी जाताहेत फोनकोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचे ट्रेसिंग व टेस्टिंग होणे आवश्यक आहे. ज्या बाधितांशी संपर्क साधण्यात येत आहे त्यांच्याकडून संपर्कात आलेल्यांची नावे व माहिती घेतली जाते. मात्र अनेकांना त्यानंतर १० ते १२ दिवसांनी संपर्क साधला जात आहे. इतक्या मोठ्या कालावधीत संबंधित व्यक्ती अनेकांच्या संपर्कात येते. जर ती व्यक्ती बाधित असेल तर मग कोरोनाचा आणखी फैलाव होण्याचा धोका असतो.अचानक का बदलली परिस्थितीसुरुवातीच्या काळात अधिकारी व कर्मचारी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग गंभीरतेने करत होते. मात्र आता या प्रक्रियेत काहीशी शिथिलता आली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे तसे अनुभवदेखील शहरात काही लोकांना आले आहेत. अचानक ही स्थिती का बदलली आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी मनपाचे अप्पर आयुक्त राम जोशी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस