शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

शिक्षक नेमणार तरी कसे ?

By admin | Updated: June 6, 2014 00:58 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २0१४-१५ या शैक्षणिक सत्रात प्रवेशासाठी महाविद्यालयांत मंजूर क्षमतेच्या ५0 टक्के पूर्णकालीन शिक्षक आवश्यक असण्याची अट ठेवली आहे. परंतु विद्यापीठाच्या

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने  २0१४-१५ या शैक्षणिक सत्रात प्रवेशासाठी महाविद्यालयांत मंजूर क्षमतेच्या ५0 टक्के  पूर्णकालीन शिक्षक  आवश्यक असण्याची अट ठेवली आहे. परंतु विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्राला १५ जूनपासून सुरुवात होत आहे. अशा स्थितीत  केवळ १५ दिवसानंतर वर्ग सुरू होणार कसे व ५ ऑगस्टपर्यंंंंत शिक्षकांची नियुक्ती होणार कशी, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.  महाविद्यालयांना दिलासा देण्यासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयाचे पालन करण्याच्या घाईगडबडीत फारशा कुशल नसलेल्या उमेदवारांची निवड  होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.नागपूर विद्यापीठाने शुक्रवारी प्रवेशासंदर्भात अधिसूचना काढली. ही अट २0१४-१५ व पुढील सत्रातील प्रथम वर्षाच्या व सत्राच्या विद्यार्थ्यांच्या  प्रवेशासाठी लागू राहील.पारंपरिक, व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सर्व महाविद्यालयांना ही अट लागू असेल. विद्यापीठातर्फे मान्यता  देण्यात आलेल्या शिक्षकांचा ५0 टक्क्यांत समावेश असावा, असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. अनेक महाविद्यालयांनी अद्यापही शिक्षक  नियुक्त केलेले नाहीत. आता शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला तरीही रिक्त पदांची जाहिरात, त्या जाहिरातीला विद्यापीठाची परवानगी, रोस्टरला मंजुरी, निवड  समित्यांची नियुक्ती आणि प्रत्यक्ष मुलाखत घेऊन निवडलेल्या शिक्षकाला मान्यता प्रदान करण्याच्या कारवाईला किमान सहा महिन्यांचा कालावधी  लागण्याची शक्यता आहे. शैक्षणिक कॅलेंडरनुसार १५ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू होईल तर परिपत्रकात केवळ ५ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात  आली आहे. परंतु नियमित शिक्षक न नेमताच महाविद्यालयांचे वर्ग सुरू होणार का व अशा परिस्थितीत शैक्षणिक गुणवत्तेशी खेळ होणार नाही का,  असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.चार वर्षांंंंचा कालावधी का?विद्यापीठाने जाहीर केलेल्या परिपत्रकात स्थापना होऊन ४ वर्षे पूर्ण झालेल्या महाविद्यालयांना नवीन अटी लागू नसतील, असे स्पष्ट करण्यात आले  आहे. अशा महाविद्यालयांमध्ये प्राचार्य किंवा १ नियमित पूर्णकालीन शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी, असे नमूद करण्यात आले आहे. सुरुवातीला ‘वर्कलोड’ जरी कमी असले तरी महाविद्यालयांनी काही प्रमाणात तरी नियमित शिक्षक नियुक्त करणे अपेक्षित असते. परंतु विद्यापीठाने  दिलेल्या या विशेष सुविधेमुळे यंदाच्या वर्षी प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्याला अंतिम वर्षापर्यंंंंत नियमित शिक्षकविना अभ्यास करावा लागू शकतो. यासंदर्भात  प्र-कुलगुरू डॉ. देशपांडे व बीसीयूडी संचालक डॉ. कोमावार यांना विचारणा केली असता त्यांनी कुठलेही ठोस उत्तर दिले नाही.(प्रतिनिधी)