शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

नैराश्य व ताणतणावामुळे गृहिणींना जगणे नकोसे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 05:24 IST

वैवाहिक व कौटुंबिक समस्या, एकाकीपणाची भावना त्यातून येणारे नैराश्य व ताणतणाव यामुळे गृहिणींमध्ये आत्महत्येची भावना वाढीला लागली आहे.

- सुमेध वाघमारेनागपूर : वैवाहिक व कौटुंबिक समस्या, एकाकीपणाची भावना त्यातून येणारे नैराश्य व ताणतणाव यामुळे गृहिणींमध्ये आत्महत्येची भावना वाढीला लागली आहे. गेल्या वर्षी आयुष्याला कंटाळून आत्महत्येचा विचार करणाऱ्या व प्रयत्न केलेल्या १२७ महिला आढळून आल्या. याशिवाय गेल्या सहा महिन्यांत २६ नव्या महिलांची नोंद प्रादेशिक मनोरुग्णलायात झाली आहे. यामुळे गृहिणींकडे लक्ष द्या, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञांनी दिला आहे.नैराश्यातून आत्महत्येकडे वळणाºयांची संख्या मोठी आहे. भारतात आठ व्यक्तींमागे एक जण नैराश्यग्रस्त आहे. एका अभ्यासानुसार, भारतात दरवर्षी सुमारे दोन लाख लोक आत्महत्या करतात. त्यामधील ४० टक्के पुरुष व ५९ टक्के महिला आहेत. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ या संस्थेच्या अहवालानुसार दरवर्षी भारतातील आत्महत्यांची संख्या २.५ टक्क्यांनी वाढते आहे. तज्ज्ञाच्या मते, वेळीच उपचाराला सुरुवात केल्यास नैराश्य ते आत्महत्या हा प्रवास टाळता येऊ शकतो.नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाने २०१० पासून ‘आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रम’ हाती घेतला. याच कार्यक्रमाच्या माध्यमातून २०१७-१८ या वर्षात ३३१ तर गेल्या सहा महिन्यांत ७२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.>गृहकलहामुळे आत्महत्येचा विचार, प्रयत्नगृहकलहामुळे ४५ टक्के गृहिणी आत्महत्येचा विचार किंवा प्रयत्न करतात. वित्तीय हानीमुळे ३० टक्के, दुर्धर आजारामुळे २० टक्के, जवळच्या नातेवाईकाच्या मृत्यूमुळे ३ टक्के तर परीक्षेत नापास झाल्याच्या कारणामुळे २ टक्के गृहिणी आत्महत्येस प्रवृत्त होतात.