शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

नैराश्य व ताणतणावामुळे गृहिणींना जगणे नकोसे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 05:24 IST

वैवाहिक व कौटुंबिक समस्या, एकाकीपणाची भावना त्यातून येणारे नैराश्य व ताणतणाव यामुळे गृहिणींमध्ये आत्महत्येची भावना वाढीला लागली आहे.

- सुमेध वाघमारेनागपूर : वैवाहिक व कौटुंबिक समस्या, एकाकीपणाची भावना त्यातून येणारे नैराश्य व ताणतणाव यामुळे गृहिणींमध्ये आत्महत्येची भावना वाढीला लागली आहे. गेल्या वर्षी आयुष्याला कंटाळून आत्महत्येचा विचार करणाऱ्या व प्रयत्न केलेल्या १२७ महिला आढळून आल्या. याशिवाय गेल्या सहा महिन्यांत २६ नव्या महिलांची नोंद प्रादेशिक मनोरुग्णलायात झाली आहे. यामुळे गृहिणींकडे लक्ष द्या, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञांनी दिला आहे.नैराश्यातून आत्महत्येकडे वळणाºयांची संख्या मोठी आहे. भारतात आठ व्यक्तींमागे एक जण नैराश्यग्रस्त आहे. एका अभ्यासानुसार, भारतात दरवर्षी सुमारे दोन लाख लोक आत्महत्या करतात. त्यामधील ४० टक्के पुरुष व ५९ टक्के महिला आहेत. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ या संस्थेच्या अहवालानुसार दरवर्षी भारतातील आत्महत्यांची संख्या २.५ टक्क्यांनी वाढते आहे. तज्ज्ञाच्या मते, वेळीच उपचाराला सुरुवात केल्यास नैराश्य ते आत्महत्या हा प्रवास टाळता येऊ शकतो.नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाने २०१० पासून ‘आत्महत्या प्रतिबंधक कार्यक्रम’ हाती घेतला. याच कार्यक्रमाच्या माध्यमातून २०१७-१८ या वर्षात ३३१ तर गेल्या सहा महिन्यांत ७२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.>गृहकलहामुळे आत्महत्येचा विचार, प्रयत्नगृहकलहामुळे ४५ टक्के गृहिणी आत्महत्येचा विचार किंवा प्रयत्न करतात. वित्तीय हानीमुळे ३० टक्के, दुर्धर आजारामुळे २० टक्के, जवळच्या नातेवाईकाच्या मृत्यूमुळे ३ टक्के तर परीक्षेत नापास झाल्याच्या कारणामुळे २ टक्के गृहिणी आत्महत्येस प्रवृत्त होतात.