शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

नंदनवनमध्ये भीषण हत्या

By admin | Updated: May 31, 2016 02:39 IST

जुन्या वादातून नंदनवनमधील एका तरुणाची दोघांनी भीषण हत्या केली. त्यानंतर या हत्येला अपघाताचे स्वरूप

नागपूर : जुन्या वादातून नंदनवनमधील एका तरुणाची दोघांनी भीषण हत्या केली. त्यानंतर या हत्येला अपघाताचे स्वरूप देण्याचाही प्रयत्न केला. मात्र, वैद्यकीय अहवालाने आरोपीचे पाप उघड झाले. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ९.३० ते १० च्या सुमारास हा थरार घडला. चंद्रशेखर मधुकर मालोदे (वय २७) असे मृताचे नाव आहे. तो विजयालक्ष्मी पंडितनगरात राहत होता.चंद्रशेखरचा भाऊ राजेंद्र मधुकर मालोदे (वय ३५) हे कंत्राटदार असून, आरोपी नीतेश भरतलाल शाहू (वय २५) तसेच अजय भरतलाल शाहू (वय २७) हे सहकारनगरात राहतात. ते पेंटिंगचे काम करतात. या दोघांचा मालोदे बंधूशी वाद होता. त्याची पोलीस ठाण्यात तक्रारही झाली होती. ९ मे रोजी त्याची कोर्टाची तारीख होती. आरोपी शाहू तारखेवर हजर झाले नाही. त्यामुळे पोलिसांकडून पकड वॉरंट निघणार, अशी माहिती मिळाली होती. रविवारी रात्री ९ च्या सुमारास ही माहिती सांगण्यासाठी चंद्रशेखर आणि त्याचा मित्र चेतन सुपारे आरोपीच्या घरी गेले. तू कोर्टात का गेला नाही, तुझा आता पकड वॉरंट निघणार आहे, असे म्हणताच आरोपी नीतेश याने चंद्रशेखरला शिवीगाळ करून कानशिलात लगावली. तू माझ्या घरी आलाच कसा, अशी विचारणा करून आरोपीने त्याला जमिनीवर पाडून डोके रस्त्यावर ठेचले. मित्राच्या मदतीसाठी चेतन धावला असता आरोपी अजय शाहूने त्याला पकडून ठेवले तर, नीतेशने घरातून चाकू आणून चंद्रशेखरवर सपासप वार केले. काही वेळेनंतर चेतन, मनोज आणि आरोपी अजयने चंद्रशेखरला आॅटोत घालून मेडिकलमध्ये नेले. तेथे चंद्रशेखरचा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यामुळे आरोपी शाहू पळून गेला. (प्रतिनिधी)घरच्यांचा आक्रोश घटनेची माहिती चेतनने मालोदे कुटुंबीयांना दिली. त्यांनी रुग्णालयात पोहचून एकच आक्रोश केला. माहिती कळताच पोलिसही मेडिकलमध्ये पोहचले. डॉक्टरांनी त्यांना हा अपघात नसून हत्या असल्याचे सांगितले. त्यामुळे उपनिरीक्षक अंबुरे, एस. कोचोडे, मनोज घोडे, राकेश शिर्के, अतुल पित्तलवार, विश्वनाथ कुथे, आशिष आणि प्रफुल्ल वाघमारे यांनी रात्रभर धावपळ करून आरोपी नीतेश आणि अजयच्या मुसक्या बांधल्या. या घटनेमुळे रात्रीपासून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.