शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

केंद्राकडून राज्य सरकारच्या अधिकारांवर गदा - दिलीप वळसे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 12:12 IST

केंद्र सरकारकडून काहींना सुरक्षा पुरवली जात आहे. हा केंद्राचा अधिकार आहे. मात्र, राज्यातील नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे, असे गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले.

नागपूर : धार्मिक वादातूर राज्यात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, महाराष्ट्रात कुठेही अशांततेच वातावरण निर्माण होणार नाही, याबाबत आम्ही काळजी घेत आहोत. कुठल्याही कृतीमुळे समाजात तेढ निर्माण होत होत असेल तर ती कारवाईस पात्र ठरते आणि त्यासंबंधी कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. ते आज नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज्यात भोंग्याच राजकारण चांगलच तापलं आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना केंद्राकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा मिळाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्राकडून सुरक्षा पुरवली जाणार असल्याच्या प्रश्नावर वळसे पाटील म्हणाले काही व्यक्तींना केंद्राकडून सुरक्षा पुरवली जात आहे. हे राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण आहे. या राज्यातील सर्व नागरिकांचं रक्षण करण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे. परंतु कोणाला सुरक्षा द्यायची हा केंद्र सरकारचा अधिकार आहे, ते सुरक्षा देऊ शकतात, असे ते म्हणाले. यासोबतच राज ठाकरे यांना मुंबई पोलिसांकडून सुरक्षा द्यायची की नाही, याचा निर्णय कमिटी घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अमरावतीमध्ये झेंड्यावरून झालेल्या हिंसाचारावर वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. अमरावती परतवाडा. अचलपूर या भागात हिंसक घटना घडतात, याचा अर्थ तिथे समाजविघातक शक्ती सक्रिय आहेत. त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. या घटनेतील दोषींवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे, लवकरच या घटनेतील दोषी समोर येतील, असेही वळसे पाटील म्हणाले.

भाजपकडून देशातील वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे. खरेदर केंद्र सरकारने महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यांवर चर्चा करायला हवी. मात्र, या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठीच भाजपकडून धार्मिक मुद्दे उकरून काढले जात आहे, असा आरोपही वळसे पाटील यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलRaj Thackerayराज ठाकरेnavneet kaur ranaनवनीत कौर राणा