शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राकडून राज्य सरकारच्या अधिकारांवर गदा - दिलीप वळसे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 12:12 IST

केंद्र सरकारकडून काहींना सुरक्षा पुरवली जात आहे. हा केंद्राचा अधिकार आहे. मात्र, राज्यातील नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे, असे गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले.

नागपूर : धार्मिक वादातूर राज्यात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, महाराष्ट्रात कुठेही अशांततेच वातावरण निर्माण होणार नाही, याबाबत आम्ही काळजी घेत आहोत. कुठल्याही कृतीमुळे समाजात तेढ निर्माण होत होत असेल तर ती कारवाईस पात्र ठरते आणि त्यासंबंधी कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. ते आज नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज्यात भोंग्याच राजकारण चांगलच तापलं आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना केंद्राकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा मिळाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्राकडून सुरक्षा पुरवली जाणार असल्याच्या प्रश्नावर वळसे पाटील म्हणाले काही व्यक्तींना केंद्राकडून सुरक्षा पुरवली जात आहे. हे राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण आहे. या राज्यातील सर्व नागरिकांचं रक्षण करण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे. परंतु कोणाला सुरक्षा द्यायची हा केंद्र सरकारचा अधिकार आहे, ते सुरक्षा देऊ शकतात, असे ते म्हणाले. यासोबतच राज ठाकरे यांना मुंबई पोलिसांकडून सुरक्षा द्यायची की नाही, याचा निर्णय कमिटी घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अमरावतीमध्ये झेंड्यावरून झालेल्या हिंसाचारावर वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. अमरावती परतवाडा. अचलपूर या भागात हिंसक घटना घडतात, याचा अर्थ तिथे समाजविघातक शक्ती सक्रिय आहेत. त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. या घटनेतील दोषींवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे, लवकरच या घटनेतील दोषी समोर येतील, असेही वळसे पाटील म्हणाले.

भाजपकडून देशातील वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे. खरेदर केंद्र सरकारने महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यांवर चर्चा करायला हवी. मात्र, या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठीच भाजपकडून धार्मिक मुद्दे उकरून काढले जात आहे, असा आरोपही वळसे पाटील यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलRaj Thackerayराज ठाकरेnavneet kaur ranaनवनीत कौर राणा