शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

केंद्राकडून राज्य सरकारच्या अधिकारांवर गदा - दिलीप वळसे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 12:12 IST

केंद्र सरकारकडून काहींना सुरक्षा पुरवली जात आहे. हा केंद्राचा अधिकार आहे. मात्र, राज्यातील नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे, असे गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले.

नागपूर : धार्मिक वादातूर राज्यात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, महाराष्ट्रात कुठेही अशांततेच वातावरण निर्माण होणार नाही, याबाबत आम्ही काळजी घेत आहोत. कुठल्याही कृतीमुळे समाजात तेढ निर्माण होत होत असेल तर ती कारवाईस पात्र ठरते आणि त्यासंबंधी कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. ते आज नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज्यात भोंग्याच राजकारण चांगलच तापलं आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना केंद्राकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा मिळाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्राकडून सुरक्षा पुरवली जाणार असल्याच्या प्रश्नावर वळसे पाटील म्हणाले काही व्यक्तींना केंद्राकडून सुरक्षा पुरवली जात आहे. हे राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण आहे. या राज्यातील सर्व नागरिकांचं रक्षण करण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे. परंतु कोणाला सुरक्षा द्यायची हा केंद्र सरकारचा अधिकार आहे, ते सुरक्षा देऊ शकतात, असे ते म्हणाले. यासोबतच राज ठाकरे यांना मुंबई पोलिसांकडून सुरक्षा द्यायची की नाही, याचा निर्णय कमिटी घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अमरावतीमध्ये झेंड्यावरून झालेल्या हिंसाचारावर वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. अमरावती परतवाडा. अचलपूर या भागात हिंसक घटना घडतात, याचा अर्थ तिथे समाजविघातक शक्ती सक्रिय आहेत. त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. या घटनेतील दोषींवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे, लवकरच या घटनेतील दोषी समोर येतील, असेही वळसे पाटील म्हणाले.

भाजपकडून देशातील वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे. खरेदर केंद्र सरकारने महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यांवर चर्चा करायला हवी. मात्र, या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठीच भाजपकडून धार्मिक मुद्दे उकरून काढले जात आहे, असा आरोपही वळसे पाटील यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलRaj Thackerayराज ठाकरेnavneet kaur ranaनवनीत कौर राणा