शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

हायटेक पोलिसांच्या १०० नंबरवरून मिळाली नाही मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 00:39 IST

शहर पोलिसांचे हायटेक कंट्रोल रुम हे संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी असते. परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. एका गर्ल्स होस्टेलमधील विद्यार्थिनीला कडू अनुभव आला. त्यांनी मदतीसाठी जेव्हा १०० नंबर डायल केला तेव्हा त्यांना मदत तर मिळाली नाही, उलट समज देण्यात आली.

ठळक मुद्देमदतीऐवजी मिळाला सल्ला : गर्ल्स होस्टेलच्या विद्यार्थिनींना आला कडू अनुभव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर पोलिसांचे हायटेक कंट्रोल रुम हे संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी असते. परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. एका गर्ल्स होस्टेलमधील विद्यार्थिनीला कडू अनुभव आला. त्यांनी मदतीसाठी जेव्हा १०० नंबर डायल केला तेव्हा त्यांना मदत तर मिळाली नाही, उलट समज देण्यात आली.धरमपेठ परिसरात गर्ल्स होस्टेल आहे. दिवसभर वाहनांची ये-जा असल्याने होस्टेलमधील मुली त्यांची वाहने होस्टेलजवळील फुटपाथवर पार्क करतात. ३ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजता संशयास्पद युवक होस्टेलजवळ आले. ते नशेत होते. त्यातील एका युवकाने दुचाकीचे लॉक तोडले आणि तो बाईक नेण्याचा प्रयत्न करू लागला. होस्टेलच्या मुलींच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी त्याला अडवले. तेव्हा तो विद्यार्थिनींसोबत धक्काबुक्की करू लागला. इतर मुली घाबरल्या. त्यांनी मदतीसाठी लगेच पोलिसांच्या आपत्कालीन १०० नंबरवर फोन केला. तेव्हा कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अर्धा तास त्यांनी प्रयत्न केला. चौकीदारही बाहेर गेला असल्याने त्यांना मदत मिळाली नाही. दरम्यान सीताबर्डीचे ठाणेदार हेमंत खराबे यांना घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान बरीच आरडाओरड झाल्याने नागरिक जमा होत होते. हे पाहून आरोपी युवक पळून गेले. यानंतर सीताबर्डीचे तीन पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांना विद्यार्थिनींनी घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा एका पोलिसाने मुलींनाच समज दिली. ‘हे गर्ल्स होस्टेल आहे, अशा घटना तर होऊ शकतात, तुम्हीही समजू शकता, असा सल्ला देऊ लागला. त्यामुळे विद्यार्थिनींना मोठा धक्का बसला. चौकीदाराचीही तक्रार केली. त्यानंतर उद्या येतो असे सांगून निघून गेले. दोन दिवस झाले पोलिसांनी होस्टेलमध्ये आलेले ते युवक कोण होते, याची साधी चौकशीही केली नाही.पोलिसांच्या सामाजिक शाखेने मोबाईल अ‍ॅप सुरू केले होते. गर्ल्स होस्टेलच्या संचालक आणि त्यात राहणाऱ्या विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या समस्या व तक्रारी ऐकून घेण्यात आल्या. तसेच त्या दूर करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला होता. परंतु या घटनेनंतर पोलिसांचा दावा फोल ठरला आहे.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसnagpurनागपूर