शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
5
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
6
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
7
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
8
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
9
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
10
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
11
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
12
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
13
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
14
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
15
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
16
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
17
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
18
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
19
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
20
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!

महावितरण कंपनीला दणका : शेतकऱ्याला १.२० लाख रुपये भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 20:07 IST

Hit MSEDCL, Consumer forum तक्रारकर्त्या शेतकऱ्याला ऊस पिकासह इतर वस्तूच्या नुकसानीसाठी १ लाख रुपये तर, शारीरिक-मानसिक त्रास व तक्रार खर्चापोटी प्रत्येकी १० हजार अशी एकूण १ लाख २० हजार रुपये भरपाई अदा करा, असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने महावितरण कंपनीला दिला.

ठळक मुद्दे ग्राहक मंचचा आदेश

 लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : तक्रारकर्त्या शेतकऱ्याला ऊस पिकासह इतर वस्तूच्या नुकसानीसाठी १ लाख रुपये तर, शारीरिक-मानसिक त्रास व तक्रार खर्चापोटी प्रत्येकी १० हजार अशी एकूण १ लाख २० हजार रुपये भरपाई अदा करा, असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने महावितरण कंपनीला दिला.

नत्थू चौधरी असे तक्रारकर्त्या शेतकऱ्याचे नाव असून ते भागेबोरी, ता. भिवापूर येथील रहिवासी आहेत. त्यांची तक्रार मंचच्या पीठासीन सदस्य स्मिता चांदेकर व सदस्य अविनाश प्रभुणे यांनी नुकतीच निकाली काढली. सदर आदेशाच्या अंमलबजावणीसाठी महावितरणला एक महिन्याची मुदत देण्यात आली. तसेच या प्रकरणाची चौकशी करून भरपाईची रक्कम दोषी कर्मचाऱ्यांकडून वसूल करण्याचे आणि त्याचा अहवाल सहा महिन्यात सादर करण्याचे निर्देशही मंचने महावितरणला दिले.

चौधरी यांनी शेत सिंचनासाठी महावितरण कंपनीकडून वीज जोडणी घेतली आहे. त्यांच्या शेतातून वीज लाईन गेली आहे. त्या वीज लाईनच्या तारा लोंबकळत होत्या आणि त्यावर पक्षी बसल्यानंतर विजेच्या ठिणग्या उडत होत्या. त्यामुळे चौधरी यांनी ७ मे २०१७ रोजी महावितरणला तक्रार करून वीज लाईन दुरुस्त करण्याची मागणी केली होती. परंतु महावितरणने त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, १६ डिसेंबर २०१८ रोजी वीजतारा एकमेकांना घासून मोठी ठिणगी उडाली. त्यामुळे शेतात आग लागून उसाचे पीक, पाईप, मोटर इत्यादी वस्तू जळाल्याने १५ ते २० लाख रुपयाचे नुकसान झाले. त्यानंतर चौधरी यांनी यासंदर्भात महावितरणला माहिती देऊन भरपाई मागितली, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. करिता, त्यांनी मंचमध्ये तक्रार दाखल केली होती. मंचने रेकॉर्डवरील पुरावे व महावितरणची बाजू लक्षात घेता, तक्रार अंशत: मंजूर करून वरीलप्रमाणे आदेश दिला.

...तर नुकसान टळले असते

चौधरी त्यांनी तक्रार दिल्यानंतर महावितरण अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करून आवश्यक निर्देश दिले असते तर नुकसान टळले असते, परंतु तसे करण्यात आले नाही. महावितरण अधिकाऱ्यांची ग्राहकाप्रति असलेली उदासीनता, बेजबाबदारपणा व कायदेशीर तरतुदींकडे केलेले दुर्लक्ष यामुळे सदर तक्रार उद्भवली, असे मत मंचने व्यक्त केले.

टॅग्स :Nagpur District Additional Consumer Forumनागपूर जिल्हा अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंचFarmerशेतकरी