नागपूर : असे प्रतिपादन अभिनव भारत संघटनेच्या अध्यक्षा हिमानी सावरकर यांनी केले. संवेदना परिवार संस्थेच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी व्याख्यान व संवेदना गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. महाल येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतीश गुप्ता होते. अतिथी म्हणून निखील गडकरी उपस्थित होते. हिमानी सावरकर पुढे म्हणाल्या, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विज्ञाननिष्ठ व समाज हितकारक दृष्टिकोन होता. त्यांनी सर्वप्रथम वैचारिक क्रांती केली. त्यांनी समाजाला विचार दिला. शिवाय लिखाणातूनही क्रांती कशी घडू शकते, हे सावरकरांनी दाखवून दिले. या क्रांतिकारकांनी ब्रिटिश सम्राज्याला हादरून सोडले होते. तसेच लोकांमध्ये राष्ट्रीय अस्मियता जागविण्याचे त्यांनी काम केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आत्मसात केले होते, असेही त्यांनी सांगितले. डॉ. रामटेके यांना संवेदना गौरव पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून संवेदना गौरव पुरस्कार सोहळाही यावेळी आयोजित करण्यात आला होता. या भरगच्च कार्यक्रमात हिमानी सावरकर यांच्या हस्ते शशिकांत रामटेके यांना संवेदना गौरव पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला.(प्रतिनिधी)
इतिहास क्रांतिकारकांच्या रक्ताने लिहिला जातो!
By admin | Updated: May 26, 2014 01:03 IST