शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
7
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
8
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
9
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
10
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
11
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
12
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
13
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
14
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
15
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
16
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
17
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
18
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
19
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
20
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क

महात्मा गांधी यांच्यामुळे जनतेचा इतिहास लिहिला गेला : सुरेश द्वादशीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 21:36 IST

भारताला केवळ राजांचा इतिहास होता. जनतेचा इतिहास महात्मा गांधी यांच्यामुळे लिहिला गेला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी यांच्या एका शब्दावरून जनतेचा महापूर रस्त्यांवर उतरला होता. तेव्हापासून जनतेच्या शक्तीला महत्त्व प्राप्त झाले असे मत ‘लोकमत’चे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसर्वोदय आश्रमाचे चिंतन शिबिर

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारताला केवळ राजांचा इतिहास होता. जनतेचा इतिहास महात्मा गांधी यांच्यामुळे लिहिला गेला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी यांच्या एका शब्दावरून जनतेचा महापूर रस्त्यांवर उतरला होता. तेव्हापासून जनतेच्या शक्तीला महत्त्व प्राप्त झाले असे मत ‘लोकमत’चे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.सर्वोदय आश्रम नागपूरच्या वतीने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त मंगळवारी एक दिवसीय चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले. त्या शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. व्यासपीठावर आश्रमच्या कार्याध्यक्ष लीलाताई चितळे व ज्येष्ठ अधिवक्ता आशुतोष धर्माधिकारी उपस्थित होते.महात्मा गांधी यांच्या शब्दांमध्ये मंत्रशक्तीचा अंतर्भाव होता. त्यामुळे त्यांच्या एका शब्दावरून विद्यार्थ्यांनी शाळा, वकिलांनी वकिली व नोकरदारांनी नोकऱ्या सोडल्या होत्या. हजारो नागरिक तुरुंगात गेले होते. करा किंवा मरा हा नारा दिल्यानंतर जनता मरण्यासाठी तयार झाली होती. महात्मा गांधी राजा, धर्मगुरू किंवा सेनापती नव्हते. ते एक सामान्य नागरिक होते. परंतु, कष्टातून मिळविलेले आत्मबळ व आत्मबळातून प्राप्त झालेल्या सामर्थ्यामुळे त्यांनी संपूर्ण भारतामध्ये इंग्रजांविरुद्ध लढण्याची ताकद निर्माण केली. कठोर तत्त्ववादीपणा हे त्यांच्या स्वभावाचे मोठे वैशिष्ट्य होते. त्यांनी इंग्रजांविरुद्ध आंदोलन उभे करण्यासाठी जनतेला एक कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर देशभरातून ९७ लाख रुपये जमा झाले होते. परंतु, केवळ तीन लाख रुपये कमी मिळाले म्हणून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली नव्हती. तसेच, निर्धारित वेळेत संपूर्ण रक्कम प्राप्त झाली नाही तर, मिळालेली रक्कमही संबंधितांना परत करण्यात यावी असे त्यांनी सांगितले होते. रक्कम कमी मिळणे याचा अर्थ जनतेचा आपल्यावर विश्वास नाही असा होतो असे ते म्हणाले होते. या तत्त्वामुळे महात्मा गांधी यांनी जनतेच्या मनात घर केले. त्यांच्या शब्दाला वजन प्राप्त झाले असे द्वादशीवार यांनी पुढे बोलताना सांगितले.तत्पूर्वी शिबिरामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू हरीभाऊ केदार यांचे ‘भारतीय धर्मनिरपेक्ष राष्ट्रीयत्वाचे स्वरूप’ विषयावर तर, पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. म. भा. निसळ यांचे ‘खरा विकास कशाला म्हणायचे’ विषयावर मार्गदर्शन झाले. डॉ. कल्पना उपाध्याय यांनी संचालन केले तर, वंदन गडकरी यांनी आभार मानले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीnagpurनागपूर