शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

महात्मा गांधी यांच्यामुळे जनतेचा इतिहास लिहिला गेला : सुरेश द्वादशीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 21:36 IST

भारताला केवळ राजांचा इतिहास होता. जनतेचा इतिहास महात्मा गांधी यांच्यामुळे लिहिला गेला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी यांच्या एका शब्दावरून जनतेचा महापूर रस्त्यांवर उतरला होता. तेव्हापासून जनतेच्या शक्तीला महत्त्व प्राप्त झाले असे मत ‘लोकमत’चे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसर्वोदय आश्रमाचे चिंतन शिबिर

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारताला केवळ राजांचा इतिहास होता. जनतेचा इतिहास महात्मा गांधी यांच्यामुळे लिहिला गेला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी यांच्या एका शब्दावरून जनतेचा महापूर रस्त्यांवर उतरला होता. तेव्हापासून जनतेच्या शक्तीला महत्त्व प्राप्त झाले असे मत ‘लोकमत’चे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.सर्वोदय आश्रम नागपूरच्या वतीने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त मंगळवारी एक दिवसीय चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले. त्या शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. व्यासपीठावर आश्रमच्या कार्याध्यक्ष लीलाताई चितळे व ज्येष्ठ अधिवक्ता आशुतोष धर्माधिकारी उपस्थित होते.महात्मा गांधी यांच्या शब्दांमध्ये मंत्रशक्तीचा अंतर्भाव होता. त्यामुळे त्यांच्या एका शब्दावरून विद्यार्थ्यांनी शाळा, वकिलांनी वकिली व नोकरदारांनी नोकऱ्या सोडल्या होत्या. हजारो नागरिक तुरुंगात गेले होते. करा किंवा मरा हा नारा दिल्यानंतर जनता मरण्यासाठी तयार झाली होती. महात्मा गांधी राजा, धर्मगुरू किंवा सेनापती नव्हते. ते एक सामान्य नागरिक होते. परंतु, कष्टातून मिळविलेले आत्मबळ व आत्मबळातून प्राप्त झालेल्या सामर्थ्यामुळे त्यांनी संपूर्ण भारतामध्ये इंग्रजांविरुद्ध लढण्याची ताकद निर्माण केली. कठोर तत्त्ववादीपणा हे त्यांच्या स्वभावाचे मोठे वैशिष्ट्य होते. त्यांनी इंग्रजांविरुद्ध आंदोलन उभे करण्यासाठी जनतेला एक कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर देशभरातून ९७ लाख रुपये जमा झाले होते. परंतु, केवळ तीन लाख रुपये कमी मिळाले म्हणून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली नव्हती. तसेच, निर्धारित वेळेत संपूर्ण रक्कम प्राप्त झाली नाही तर, मिळालेली रक्कमही संबंधितांना परत करण्यात यावी असे त्यांनी सांगितले होते. रक्कम कमी मिळणे याचा अर्थ जनतेचा आपल्यावर विश्वास नाही असा होतो असे ते म्हणाले होते. या तत्त्वामुळे महात्मा गांधी यांनी जनतेच्या मनात घर केले. त्यांच्या शब्दाला वजन प्राप्त झाले असे द्वादशीवार यांनी पुढे बोलताना सांगितले.तत्पूर्वी शिबिरामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू हरीभाऊ केदार यांचे ‘भारतीय धर्मनिरपेक्ष राष्ट्रीयत्वाचे स्वरूप’ विषयावर तर, पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. म. भा. निसळ यांचे ‘खरा विकास कशाला म्हणायचे’ विषयावर मार्गदर्शन झाले. डॉ. कल्पना उपाध्याय यांनी संचालन केले तर, वंदन गडकरी यांनी आभार मानले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीnagpurनागपूर