शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

महात्मा गांधी यांच्यामुळे जनतेचा इतिहास लिहिला गेला : सुरेश द्वादशीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 21:36 IST

भारताला केवळ राजांचा इतिहास होता. जनतेचा इतिहास महात्मा गांधी यांच्यामुळे लिहिला गेला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी यांच्या एका शब्दावरून जनतेचा महापूर रस्त्यांवर उतरला होता. तेव्हापासून जनतेच्या शक्तीला महत्त्व प्राप्त झाले असे मत ‘लोकमत’चे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसर्वोदय आश्रमाचे चिंतन शिबिर

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारताला केवळ राजांचा इतिहास होता. जनतेचा इतिहास महात्मा गांधी यांच्यामुळे लिहिला गेला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी यांच्या एका शब्दावरून जनतेचा महापूर रस्त्यांवर उतरला होता. तेव्हापासून जनतेच्या शक्तीला महत्त्व प्राप्त झाले असे मत ‘लोकमत’चे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केले.सर्वोदय आश्रम नागपूरच्या वतीने महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त मंगळवारी एक दिवसीय चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले. त्या शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. व्यासपीठावर आश्रमच्या कार्याध्यक्ष लीलाताई चितळे व ज्येष्ठ अधिवक्ता आशुतोष धर्माधिकारी उपस्थित होते.महात्मा गांधी यांच्या शब्दांमध्ये मंत्रशक्तीचा अंतर्भाव होता. त्यामुळे त्यांच्या एका शब्दावरून विद्यार्थ्यांनी शाळा, वकिलांनी वकिली व नोकरदारांनी नोकऱ्या सोडल्या होत्या. हजारो नागरिक तुरुंगात गेले होते. करा किंवा मरा हा नारा दिल्यानंतर जनता मरण्यासाठी तयार झाली होती. महात्मा गांधी राजा, धर्मगुरू किंवा सेनापती नव्हते. ते एक सामान्य नागरिक होते. परंतु, कष्टातून मिळविलेले आत्मबळ व आत्मबळातून प्राप्त झालेल्या सामर्थ्यामुळे त्यांनी संपूर्ण भारतामध्ये इंग्रजांविरुद्ध लढण्याची ताकद निर्माण केली. कठोर तत्त्ववादीपणा हे त्यांच्या स्वभावाचे मोठे वैशिष्ट्य होते. त्यांनी इंग्रजांविरुद्ध आंदोलन उभे करण्यासाठी जनतेला एक कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर देशभरातून ९७ लाख रुपये जमा झाले होते. परंतु, केवळ तीन लाख रुपये कमी मिळाले म्हणून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली नव्हती. तसेच, निर्धारित वेळेत संपूर्ण रक्कम प्राप्त झाली नाही तर, मिळालेली रक्कमही संबंधितांना परत करण्यात यावी असे त्यांनी सांगितले होते. रक्कम कमी मिळणे याचा अर्थ जनतेचा आपल्यावर विश्वास नाही असा होतो असे ते म्हणाले होते. या तत्त्वामुळे महात्मा गांधी यांनी जनतेच्या मनात घर केले. त्यांच्या शब्दाला वजन प्राप्त झाले असे द्वादशीवार यांनी पुढे बोलताना सांगितले.तत्पूर्वी शिबिरामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू हरीभाऊ केदार यांचे ‘भारतीय धर्मनिरपेक्ष राष्ट्रीयत्वाचे स्वरूप’ विषयावर तर, पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. म. भा. निसळ यांचे ‘खरा विकास कशाला म्हणायचे’ विषयावर मार्गदर्शन झाले. डॉ. कल्पना उपाध्याय यांनी संचालन केले तर, वंदन गडकरी यांनी आभार मानले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीnagpurनागपूर