शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू हे कट्टर नाही तर सर्वसमावेशक : मनमोहन वैद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:58 IST

पत्रकारिता करताना वापरलेल्या शब्दांचा नेमका अर्थ व त्याचा इतिहास माहिती हवा. संघ स्वयंसेवक किंवा हिंदू कट्टर असतो, असे म्हटले जाते. मात्र कट्टर शब्द विचार न करता वापरल्या जातो. मुळात देशातील हिंदू हा कट्टर नाही तर सर्वसमावेशक आहे. मात्र देश तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांकडून हिंदूंना कट्टर म्हणण्यात येते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी केले. विश्व संवाद केंद्र, नागपूरतर्फे देण्यात येणाऱ्या देवर्षी नारद जयंती पत्रकारिता सन्मान पुरस्कारांचे शनिवारी वितरण झाले. यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देदेवर्षी नारद जयंती पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पत्रकारिता करताना वापरलेल्या शब्दांचा नेमका अर्थ व त्याचा इतिहास माहिती हवा. संघ स्वयंसेवक किंवा हिंदू कट्टर असतो, असे म्हटले जाते. मात्र कट्टर शब्द विचार न करता वापरल्या जातो. मुळात देशातील हिंदू हा कट्टर नाही तर सर्वसमावेशक आहे. मात्र देश तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांकडून हिंदूंना कट्टर म्हणण्यात येते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी केले. विश्व संवाद केंद्र, नागपूरतर्फे देण्यात येणाऱ्या देवर्षी नारद जयंती पत्रकारिता सन्मान पुरस्कारांचे शनिवारी वितरण झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमादरम्यान ‘लोकमत’चे समन्वय संपादक कमलाकर धारप तसेच ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ पोफळी यांचा जीवनव्रती पुरस्काराने सन्मान करण्यात आला.शंकरनगर येथील साई सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीशकुमार शुक्ल यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष सुधीर पाठक, विदर्भ प्रमुख अतुल पिंगळे, संघाचे प्रांत प्रचार प्रमुख अनिल सांबरे हेदेखील उपस्थित होते. हिंदुत्व सर्वसमावेशक आहे व सर्वांना एकत्र घेऊन चालण्याची आपल्या देशाची ती परंपरा राहिली आहे. आज देशात वैचारिक संकुचितता असणारे लोक स्वत:ला ‘लिबरल’ असे म्हणवून घेतात. जे लोक देशाला विविध तुकड्यांमध्ये विभाजित करण्याचे स्वप्न पाहत आहेत ते ‘सेक्युलर’ म्हणून ओळख सांगतात. मात्र या शब्दाचा मराठी, हिंदीत अनुवाद नाही. संविधानाच्या निर्मात्यांनीदेखील संविधानात धर्मनिरपेक्ष असा शब्द टाकला नव्हता; कारण त्यांना त्याची जाण होती, असेदेखील डॉ. मनमोहन वैद्य म्हणाले.पत्रकारितेला ‘मिशन’ मानल्या जात होते. आता यात बदल दिसून येत आहे. मात्र आजदेखील अनेक ध्येयनिष्ठ पत्रकार समाजात आहेत. पत्रकारितेत नैतिकता व मर्यादेचे पालन करणे हे मोठे आव्हान आहे. पत्रकार हे समाजरचनेचे केंद्र झाले पाहिजेत, असे प्रतिपादन डॉ. रजनीशकुमार शुक्ल यांनी केले.नारद जयंतीनिमित्त पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकार तसेच स्तंभलेखकांचा सन्मान करण्यात येतो. यंदा प्रिंट मीडियातून अनंत कोळमकर, इलेक्ट्रॉनिक मीडियातून कुमार टाले व स्तंभलेखकांतून कर्नल अभय पटवर्धन यांचा सन्मान करण्यात आला. हे पुरस्कारांचे दहावे वर्ष होते. महानगर प्रचार प्रमुख समीर गौतम यांनी आभार मानले.पत्रकारांनी सामाजिक दृष्टी जपावीपत्रकार हे समाजाचा अविभाज्य घटक असतात. मात्र अनेकदा त्याचा विसर पडल्याचे दिसून येते. पत्रकारांनी समग्र सामाजिक दृष्टी बाळगण्याची गरज आहे. समाजाचे हित डोळ्यासमोर ठेवून पत्रकारिता केली पाहिजे. व्यावसायिक स्पर्धेमागे न पळता समाजाला दिशा देण्याचे काम केले पाहिजे, असे आवाहन डॉ. मनमोहन वैद्य यांनी केले.

 

टॅग्स :Journalistपत्रकारnagpurनागपूर