शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

हिंदू हे कट्टर नाही तर सर्वसमावेशक : मनमोहन वैद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:58 IST

पत्रकारिता करताना वापरलेल्या शब्दांचा नेमका अर्थ व त्याचा इतिहास माहिती हवा. संघ स्वयंसेवक किंवा हिंदू कट्टर असतो, असे म्हटले जाते. मात्र कट्टर शब्द विचार न करता वापरल्या जातो. मुळात देशातील हिंदू हा कट्टर नाही तर सर्वसमावेशक आहे. मात्र देश तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांकडून हिंदूंना कट्टर म्हणण्यात येते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी केले. विश्व संवाद केंद्र, नागपूरतर्फे देण्यात येणाऱ्या देवर्षी नारद जयंती पत्रकारिता सन्मान पुरस्कारांचे शनिवारी वितरण झाले. यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देदेवर्षी नारद जयंती पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पत्रकारिता करताना वापरलेल्या शब्दांचा नेमका अर्थ व त्याचा इतिहास माहिती हवा. संघ स्वयंसेवक किंवा हिंदू कट्टर असतो, असे म्हटले जाते. मात्र कट्टर शब्द विचार न करता वापरल्या जातो. मुळात देशातील हिंदू हा कट्टर नाही तर सर्वसमावेशक आहे. मात्र देश तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांकडून हिंदूंना कट्टर म्हणण्यात येते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी केले. विश्व संवाद केंद्र, नागपूरतर्फे देण्यात येणाऱ्या देवर्षी नारद जयंती पत्रकारिता सन्मान पुरस्कारांचे शनिवारी वितरण झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमादरम्यान ‘लोकमत’चे समन्वय संपादक कमलाकर धारप तसेच ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ पोफळी यांचा जीवनव्रती पुरस्काराने सन्मान करण्यात आला.शंकरनगर येथील साई सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीशकुमार शुक्ल यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष सुधीर पाठक, विदर्भ प्रमुख अतुल पिंगळे, संघाचे प्रांत प्रचार प्रमुख अनिल सांबरे हेदेखील उपस्थित होते. हिंदुत्व सर्वसमावेशक आहे व सर्वांना एकत्र घेऊन चालण्याची आपल्या देशाची ती परंपरा राहिली आहे. आज देशात वैचारिक संकुचितता असणारे लोक स्वत:ला ‘लिबरल’ असे म्हणवून घेतात. जे लोक देशाला विविध तुकड्यांमध्ये विभाजित करण्याचे स्वप्न पाहत आहेत ते ‘सेक्युलर’ म्हणून ओळख सांगतात. मात्र या शब्दाचा मराठी, हिंदीत अनुवाद नाही. संविधानाच्या निर्मात्यांनीदेखील संविधानात धर्मनिरपेक्ष असा शब्द टाकला नव्हता; कारण त्यांना त्याची जाण होती, असेदेखील डॉ. मनमोहन वैद्य म्हणाले.पत्रकारितेला ‘मिशन’ मानल्या जात होते. आता यात बदल दिसून येत आहे. मात्र आजदेखील अनेक ध्येयनिष्ठ पत्रकार समाजात आहेत. पत्रकारितेत नैतिकता व मर्यादेचे पालन करणे हे मोठे आव्हान आहे. पत्रकार हे समाजरचनेचे केंद्र झाले पाहिजेत, असे प्रतिपादन डॉ. रजनीशकुमार शुक्ल यांनी केले.नारद जयंतीनिमित्त पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकार तसेच स्तंभलेखकांचा सन्मान करण्यात येतो. यंदा प्रिंट मीडियातून अनंत कोळमकर, इलेक्ट्रॉनिक मीडियातून कुमार टाले व स्तंभलेखकांतून कर्नल अभय पटवर्धन यांचा सन्मान करण्यात आला. हे पुरस्कारांचे दहावे वर्ष होते. महानगर प्रचार प्रमुख समीर गौतम यांनी आभार मानले.पत्रकारांनी सामाजिक दृष्टी जपावीपत्रकार हे समाजाचा अविभाज्य घटक असतात. मात्र अनेकदा त्याचा विसर पडल्याचे दिसून येते. पत्रकारांनी समग्र सामाजिक दृष्टी बाळगण्याची गरज आहे. समाजाचे हित डोळ्यासमोर ठेवून पत्रकारिता केली पाहिजे. व्यावसायिक स्पर्धेमागे न पळता समाजाला दिशा देण्याचे काम केले पाहिजे, असे आवाहन डॉ. मनमोहन वैद्य यांनी केले.

 

टॅग्स :Journalistपत्रकारnagpurनागपूर