शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

हिंदू हे कट्टर नाही तर सर्वसमावेशक : मनमोहन वैद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:58 IST

पत्रकारिता करताना वापरलेल्या शब्दांचा नेमका अर्थ व त्याचा इतिहास माहिती हवा. संघ स्वयंसेवक किंवा हिंदू कट्टर असतो, असे म्हटले जाते. मात्र कट्टर शब्द विचार न करता वापरल्या जातो. मुळात देशातील हिंदू हा कट्टर नाही तर सर्वसमावेशक आहे. मात्र देश तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांकडून हिंदूंना कट्टर म्हणण्यात येते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी केले. विश्व संवाद केंद्र, नागपूरतर्फे देण्यात येणाऱ्या देवर्षी नारद जयंती पत्रकारिता सन्मान पुरस्कारांचे शनिवारी वितरण झाले. यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देदेवर्षी नारद जयंती पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पत्रकारिता करताना वापरलेल्या शब्दांचा नेमका अर्थ व त्याचा इतिहास माहिती हवा. संघ स्वयंसेवक किंवा हिंदू कट्टर असतो, असे म्हटले जाते. मात्र कट्टर शब्द विचार न करता वापरल्या जातो. मुळात देशातील हिंदू हा कट्टर नाही तर सर्वसमावेशक आहे. मात्र देश तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांकडून हिंदूंना कट्टर म्हणण्यात येते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी केले. विश्व संवाद केंद्र, नागपूरतर्फे देण्यात येणाऱ्या देवर्षी नारद जयंती पत्रकारिता सन्मान पुरस्कारांचे शनिवारी वितरण झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमादरम्यान ‘लोकमत’चे समन्वय संपादक कमलाकर धारप तसेच ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ पोफळी यांचा जीवनव्रती पुरस्काराने सन्मान करण्यात आला.शंकरनगर येथील साई सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीशकुमार शुक्ल यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष सुधीर पाठक, विदर्भ प्रमुख अतुल पिंगळे, संघाचे प्रांत प्रचार प्रमुख अनिल सांबरे हेदेखील उपस्थित होते. हिंदुत्व सर्वसमावेशक आहे व सर्वांना एकत्र घेऊन चालण्याची आपल्या देशाची ती परंपरा राहिली आहे. आज देशात वैचारिक संकुचितता असणारे लोक स्वत:ला ‘लिबरल’ असे म्हणवून घेतात. जे लोक देशाला विविध तुकड्यांमध्ये विभाजित करण्याचे स्वप्न पाहत आहेत ते ‘सेक्युलर’ म्हणून ओळख सांगतात. मात्र या शब्दाचा मराठी, हिंदीत अनुवाद नाही. संविधानाच्या निर्मात्यांनीदेखील संविधानात धर्मनिरपेक्ष असा शब्द टाकला नव्हता; कारण त्यांना त्याची जाण होती, असेदेखील डॉ. मनमोहन वैद्य म्हणाले.पत्रकारितेला ‘मिशन’ मानल्या जात होते. आता यात बदल दिसून येत आहे. मात्र आजदेखील अनेक ध्येयनिष्ठ पत्रकार समाजात आहेत. पत्रकारितेत नैतिकता व मर्यादेचे पालन करणे हे मोठे आव्हान आहे. पत्रकार हे समाजरचनेचे केंद्र झाले पाहिजेत, असे प्रतिपादन डॉ. रजनीशकुमार शुक्ल यांनी केले.नारद जयंतीनिमित्त पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकार तसेच स्तंभलेखकांचा सन्मान करण्यात येतो. यंदा प्रिंट मीडियातून अनंत कोळमकर, इलेक्ट्रॉनिक मीडियातून कुमार टाले व स्तंभलेखकांतून कर्नल अभय पटवर्धन यांचा सन्मान करण्यात आला. हे पुरस्कारांचे दहावे वर्ष होते. महानगर प्रचार प्रमुख समीर गौतम यांनी आभार मानले.पत्रकारांनी सामाजिक दृष्टी जपावीपत्रकार हे समाजाचा अविभाज्य घटक असतात. मात्र अनेकदा त्याचा विसर पडल्याचे दिसून येते. पत्रकारांनी समग्र सामाजिक दृष्टी बाळगण्याची गरज आहे. समाजाचे हित डोळ्यासमोर ठेवून पत्रकारिता केली पाहिजे. व्यावसायिक स्पर्धेमागे न पळता समाजाला दिशा देण्याचे काम केले पाहिजे, असे आवाहन डॉ. मनमोहन वैद्य यांनी केले.

 

टॅग्स :Journalistपत्रकारnagpurनागपूर