शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

हिंदी विद्यापीठ कुलसचिव कठेरिया यांनी मागितली हायकोर्टाची माफी

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: May 7, 2024 19:05 IST

Nagpur : न्यायालय अवमानाच्या दोषारोपातून मुक्त करण्याची मागणीही केली

नागपूर : वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. धरवेश कठेरिया यांनी मंगळवारी प्रतिज्ञापत्र दाखल करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची बिनशर्त माफी मागितली व न्यायालय अवमानाच्या दोषारोपातून मुक्त करण्याची मागणी केली. त्यानंतर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांनी कठेरिया यांचे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन आवश्यक आदेश देण्यासाठी या प्रकरणावर बुधवारी पुढील सुनावणी निश्चित केली.

गैरवर्तणुकीच्या कारणावरून पीएच.डी. उमेदवारी रद्द करून विद्यापीठ परिसरात प्रवेश नाकारल्या गेल्यामुळे पीडित विद्यार्थी निरंजनकुमार प्रसाद यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने ९ फेब्रुवारी रोजी कुलसचिवांना नोटीस बजावून याचिकेवर १६ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. ती नोटीस कुलसचिवांना तामील झाली होती. असे असतानाही १६ फेब्रुवारी रोजी विद्यापीठातर्फे कोणीच न्यायालयात हजर झाले नाही. परिणामी, न्यायालयाने वादग्रस्त कारवाईला अंतरिम स्थगिती दिली. त्यानंतर प्रसाद यांना विद्यापीठात प्रवेश देऊन संशोधन कार्य करू देणे आवश्यक होते. परंतु, प्रसाद यांना विद्यापीठात प्रवेश देण्यात आला नाही. करिता, न्यायालयाने २३ एप्रिल रोजी कुलसचिव काथेरिया यांना अवमान नोटीस बजावली व २९ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहून स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, काथेरिया २९ एप्रिल रोजी न्यायालयात हजर झाले, पण त्यांच्या स्पष्टीकरणामुळे न्यायालयाचे समाधान झाले नाही. न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध न्यायालय अवमानाचे दोषारोप निश्चित केले व त्यावर योग्य भूमिका मांडण्यास सांगितले. त्यानुसार, कठेरिया यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. न्यायालयाच्या आदेशाचा जाणिवपूर्वक अवमान केला नाही. अनवधानाने चुक झाली आहे. प्रसाद यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली आहे, असेही त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयuniversityविद्यापीठ