शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

हिंदी विद्यापीठ कुलसचिव कठेरिया यांनी मागितली हायकोर्टाची माफी

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: May 7, 2024 19:05 IST

Nagpur : न्यायालय अवमानाच्या दोषारोपातून मुक्त करण्याची मागणीही केली

नागपूर : वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. धरवेश कठेरिया यांनी मंगळवारी प्रतिज्ञापत्र दाखल करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची बिनशर्त माफी मागितली व न्यायालय अवमानाच्या दोषारोपातून मुक्त करण्याची मागणी केली. त्यानंतर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांनी कठेरिया यांचे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन आवश्यक आदेश देण्यासाठी या प्रकरणावर बुधवारी पुढील सुनावणी निश्चित केली.

गैरवर्तणुकीच्या कारणावरून पीएच.डी. उमेदवारी रद्द करून विद्यापीठ परिसरात प्रवेश नाकारल्या गेल्यामुळे पीडित विद्यार्थी निरंजनकुमार प्रसाद यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने ९ फेब्रुवारी रोजी कुलसचिवांना नोटीस बजावून याचिकेवर १६ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. ती नोटीस कुलसचिवांना तामील झाली होती. असे असतानाही १६ फेब्रुवारी रोजी विद्यापीठातर्फे कोणीच न्यायालयात हजर झाले नाही. परिणामी, न्यायालयाने वादग्रस्त कारवाईला अंतरिम स्थगिती दिली. त्यानंतर प्रसाद यांना विद्यापीठात प्रवेश देऊन संशोधन कार्य करू देणे आवश्यक होते. परंतु, प्रसाद यांना विद्यापीठात प्रवेश देण्यात आला नाही. करिता, न्यायालयाने २३ एप्रिल रोजी कुलसचिव काथेरिया यांना अवमान नोटीस बजावली व २९ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहून स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, काथेरिया २९ एप्रिल रोजी न्यायालयात हजर झाले, पण त्यांच्या स्पष्टीकरणामुळे न्यायालयाचे समाधान झाले नाही. न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध न्यायालय अवमानाचे दोषारोप निश्चित केले व त्यावर योग्य भूमिका मांडण्यास सांगितले. त्यानुसार, कठेरिया यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. न्यायालयाच्या आदेशाचा जाणिवपूर्वक अवमान केला नाही. अनवधानाने चुक झाली आहे. प्रसाद यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली आहे, असेही त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयuniversityविद्यापीठ