शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

सेवेचा परमोच्च बिंदू म्हणजे ईश्वरप्राप्ती  : जयवंत बोधले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:39 IST

मातृपितृसेवा, समाजसेवा आणि राष्ट्रसेवा अशा विविध माध्यमातून केली जाणारी सेवा अंतिमत: परमेश्वराच्या चरणीच रुजू होते. सेवाधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. सेवेचा परमोच्च बिंदू म्हणजे ईश्वरप्राप्ती आहे, असे प्रतिपादन वारकरी संप्रदायातील संतश्रेष्ठ मानकुजी महाराज बोधले यांचे वंशज अ‍ॅड. जयवंत बोधले यांनी केले.

ठळक मुद्दे‘सेवाधर्माचा परिणाम’वरील त्रिदिवसीय व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मातृपितृसेवा, समाजसेवा आणि राष्ट्रसेवा अशा विविध माध्यमातून केली जाणारी सेवा अंतिमत: परमेश्वराच्या चरणीच रुजू होते. सेवाधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. सेवेचा परमोच्च बिंदू म्हणजे ईश्वरप्राप्ती आहे, असे प्रतिपादन वारकरी संप्रदायातील संतश्रेष्ठ मानकुजी महाराज बोधले यांचे वंशज अ‍ॅड. जयवंत बोधले यांनी केले. सच्चिदानंद मंडळातर्फे सायंटिफिक सभागृहात आयोजित ‘सेवाधर्माचा परिणाम’ या विषयावरील त्रिदिवसीय व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते.नागपूर जिल्ह्यातील संत श्री भैयाजी महाराज रचित ‘अध्यात्मपर प्रार्थना स्तोत्र’ या ग्रंथातील सेवाधर्माचा परिणाम या विषयावर ही त्रिदिवसीय व्याख्यानमाला आयोजित आहे. सेवेच्या फळप्राप्ती आणि ब्रह्मज्ञानाचा संबंधही अल्पशब्दांत त्यांनी यावेळी विवेचित केला. सेवाधर्म व प्रार्थना आध्यात्मिक स्वरूपात भगवंताकडे केली असता साधकाला त्याचा लाभ होतोच, असे अ‍ॅड.जयवंत बोधले म्हणाले. प्रपंचात राहून सेवा करणे आणि परमार्थात राहून सेवा करणे यातील भिन्नतेचे विश्लेषण त्यांनी केले. विवेचनात त्यांनी श्रीज्ञानेश्वरी आणि प्रार्थनास्तोत्रातील ओळींचा आधार घेत विषयवस्तू मांडले.यावेळी राजे रघुजी भोसले (पंचम), शिवशक्तीपीठ उमरेडचे शिवयोगी दत्तामहाराज जोशी, श्रीरामपंत जोशी महाराज आणि गोंदवलेकर महाराजांचे नामधारक बाबासाहेब कुळकर्णी यांची विशेष उपस्थिती होती. अ‍ॅड.मिलिंद केदार यांनी प्रास्ताविक केले तर अंजली पाठक यांनी संचालन केले. यावेळी जिव्हाळा फाऊंडेशनच्या विद्यार्थिनींनी ‘बेटी बचाओ’चा जागर केला.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर