शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

ज्याच्या जागा जास्त, तोच ठरेल ‘मोठा भाऊ’ : रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 22:03 IST

शिवसेनेकडून भाजपवर प्रहार करण्याची एकही संधी सोडली जात नसताना, भाजपकडून मात्र नरमाईचीच भूमिका घेण्यात आली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेसोबतच युती होईल. जागावाटपासाठी दिवंगत बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन यांनी ठरविलेलाच ‘फॉर्म्युला’ वापरण्यात येईल. तसेच ज्या पक्षाच्या जागा जास्त येईल, तोच ‘मोठा भाऊ’ ठरेल व त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नागपुरात केले. सोमवारी टिळक पत्रकार भवनात आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देशिवसेनेसोबत युती होणार असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिवसेनेकडून भाजपवर प्रहार करण्याची एकही संधी सोडली जात नसताना, भाजपकडून मात्र नरमाईचीच भूमिका घेण्यात आली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेसोबतच युती होईल. जागावाटपासाठी दिवंगत बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन यांनी ठरविलेलाच ‘फॉर्म्युला’ वापरण्यात येईल. तसेच ज्या पक्षाच्या जागा जास्त येईल, तोच ‘मोठा भाऊ’ ठरेल व त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नागपुरात केले. सोमवारी टिळक पत्रकार भवनात आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.शिवसेना व भाजपा यांची युती ही अनेक वर्षांची आहे. २०१४ मध्ये काही कारणांमुळे दोन्ही पक्षांना सोबत राहता आले नव्हते. मात्र दोन्ही पक्षांची विचारधारा एकच असून, पुढील निवडणुकांसाठी आम्ही नक्कीच एकत्र येऊ. शिवसेनेसमोर युतीचा प्रस्ताव ठेवणे ही आमची लाचारी नव्हे तर तो मैत्रीचा एक भाग आहे, असे रावसाहेब दानवे म्हणाले. राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये एकट्या भाजपचेच दोनशेहून उमेदवार निवडून येतील. मात्र मित्रपक्षांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळापासून आहे, असे दानवे यांनी सांगितले. काँग्रेसकडून केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी खालच्या पातळीवर उतरून पंतप्रधानांवर आरोप करण्यात येत असल्याचा चिमटादेखील त्यांनी काढला.राज्यभरात सर्व जागांवर अद्याप ‘बूथप्रमुख’ नाहीचदरम्यान, रावसाहेब दानवे यांनी पत्रपरिषदेदरम्यान भाजपच्या बूथप्रमुख योजनेची आकडेवारी मांडली. राज्यात सुमारे ९२ हजार ‘बूथ’ आहेत. यातील ८५ हजारहून अधिक ‘बूथ’वर पक्षाने प्रमुख नेमले आहेत, असे त्यांनी सांगितले. याचाच अर्थ अद्यापही भाजपला सर्व ठिकाणी ‘बूथप्रमुख’ नेमता आलेले नाहीत.राममंदिर नव्हे विकासाच्या मुद्यावर लढणारदेशातील विविध राज्यांमध्ये झालेल्या मागील काही निवडणुकांपासून ‘नोटा’च्या मतांचा भाजपला फटका बसताना दिसतो आहे. याबाबतीत दानवे यांना विचारणा केली असता पुढील निवडणुकीत ‘नोटा’चे प्रमाण निश्चितपणे कमी असेल, असे ते म्हणाले. पुढील निवडणुका आम्ही राममंदिराच्या मुद्यावर नव्हे तर विकासाच्या मुद्यावर लढू. राममंदिराच्या निर्मितीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेदेखील त्यांनी सांगितले.मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तारराज्याच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार करण्यात येईल. मात्र अद्याप याबाबतची तारीख निश्चित झालेली नाही, अशी माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली. भाजपातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातील चित्र सकारात्मक आहे. पहिल्या परीक्षेत सर्वच आमदार उत्तीर्ण झाले आहेत, असे दानवे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Raosaheb Danweरावसाहेब दानवेBJPभाजपा