शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

ज्याच्या जागा जास्त, तोच ठरेल ‘मोठा भाऊ’ : रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 22:03 IST

शिवसेनेकडून भाजपवर प्रहार करण्याची एकही संधी सोडली जात नसताना, भाजपकडून मात्र नरमाईचीच भूमिका घेण्यात आली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेसोबतच युती होईल. जागावाटपासाठी दिवंगत बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन यांनी ठरविलेलाच ‘फॉर्म्युला’ वापरण्यात येईल. तसेच ज्या पक्षाच्या जागा जास्त येईल, तोच ‘मोठा भाऊ’ ठरेल व त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नागपुरात केले. सोमवारी टिळक पत्रकार भवनात आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देशिवसेनेसोबत युती होणार असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिवसेनेकडून भाजपवर प्रहार करण्याची एकही संधी सोडली जात नसताना, भाजपकडून मात्र नरमाईचीच भूमिका घेण्यात आली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेसोबतच युती होईल. जागावाटपासाठी दिवंगत बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन यांनी ठरविलेलाच ‘फॉर्म्युला’ वापरण्यात येईल. तसेच ज्या पक्षाच्या जागा जास्त येईल, तोच ‘मोठा भाऊ’ ठरेल व त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नागपुरात केले. सोमवारी टिळक पत्रकार भवनात आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.शिवसेना व भाजपा यांची युती ही अनेक वर्षांची आहे. २०१४ मध्ये काही कारणांमुळे दोन्ही पक्षांना सोबत राहता आले नव्हते. मात्र दोन्ही पक्षांची विचारधारा एकच असून, पुढील निवडणुकांसाठी आम्ही नक्कीच एकत्र येऊ. शिवसेनेसमोर युतीचा प्रस्ताव ठेवणे ही आमची लाचारी नव्हे तर तो मैत्रीचा एक भाग आहे, असे रावसाहेब दानवे म्हणाले. राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये एकट्या भाजपचेच दोनशेहून उमेदवार निवडून येतील. मात्र मित्रपक्षांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळापासून आहे, असे दानवे यांनी सांगितले. काँग्रेसकडून केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी खालच्या पातळीवर उतरून पंतप्रधानांवर आरोप करण्यात येत असल्याचा चिमटादेखील त्यांनी काढला.राज्यभरात सर्व जागांवर अद्याप ‘बूथप्रमुख’ नाहीचदरम्यान, रावसाहेब दानवे यांनी पत्रपरिषदेदरम्यान भाजपच्या बूथप्रमुख योजनेची आकडेवारी मांडली. राज्यात सुमारे ९२ हजार ‘बूथ’ आहेत. यातील ८५ हजारहून अधिक ‘बूथ’वर पक्षाने प्रमुख नेमले आहेत, असे त्यांनी सांगितले. याचाच अर्थ अद्यापही भाजपला सर्व ठिकाणी ‘बूथप्रमुख’ नेमता आलेले नाहीत.राममंदिर नव्हे विकासाच्या मुद्यावर लढणारदेशातील विविध राज्यांमध्ये झालेल्या मागील काही निवडणुकांपासून ‘नोटा’च्या मतांचा भाजपला फटका बसताना दिसतो आहे. याबाबतीत दानवे यांना विचारणा केली असता पुढील निवडणुकीत ‘नोटा’चे प्रमाण निश्चितपणे कमी असेल, असे ते म्हणाले. पुढील निवडणुका आम्ही राममंदिराच्या मुद्यावर नव्हे तर विकासाच्या मुद्यावर लढू. राममंदिराच्या निर्मितीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेदेखील त्यांनी सांगितले.मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तारराज्याच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार करण्यात येईल. मात्र अद्याप याबाबतची तारीख निश्चित झालेली नाही, अशी माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली. भाजपातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातील चित्र सकारात्मक आहे. पहिल्या परीक्षेत सर्वच आमदार उत्तीर्ण झाले आहेत, असे दानवे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Raosaheb Danweरावसाहेब दानवेBJPभाजपा