शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नागपुरात हायटेन्शन लाईनमुळे एसएनडीएल, नासुप्र, मनपाला येणार टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 22:42 IST

नागपूर सुधार प्रन्यास, महापालिका व एसएनडीएल यांना हायटेन्शन वीज लाईनमुळे टेंशन येण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील विशेष समितीने पहिला अहवाल तयार केला असून त्यात या तिन्ही संस्थांनी ३३ केव्हीच्या नारा फिडरवरील अनेक धोकादायक रहिवासी बांधकामांकडे दुर्लक्ष केल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. हा अहवाल बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष सादर केला जाणार आहे.

ठळक मुद्देविशेष समितीचा पहिला अहवाल : अनेक धोकादायक बांधकामे लपविल्याचे निरीक्षण

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर सुधार प्रन्यास, महापालिका व एसएनडीएल यांना हायटेन्शन वीज लाईनमुळे टेंशन येण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील विशेष समितीने पहिला अहवाल तयार केला असून त्यात या तिन्ही संस्थांनी ३३ केव्हीच्या नारा फिडरवरील अनेक धोकादायक रहिवासी बांधकामांकडे दुर्लक्ष केल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. हा अहवाल बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष सादर केला जाणार आहे.समितीमध्ये सात तज्ज्ञांचा समावेश आहे. समितीने नारा फिडरच्या मार्गावरील बांधकामांची पाहणी केली आहे. मे-२०१८ पर्यंतच्या पाहणीचा प्रथम अहवाल तयार करण्यात आला आहे. नासुप्र, मनपा व एसएनडीएल यांनी एकत्रितपणे नारा फिडरच्या मार्गावर केवळ ७० धोकादायक रहिवासी बांधकामे असल्याची माहिती न्यायालयाला दिली आहे. समितीच्या अहवालानुसार या मार्गावर १२२ धोकादायक रहिवासी बांधकामे आहेत. नासुप्र, मनपा व एसएनडीएल यांनी अन्य धोकादायक बांधकामे का लपवली याची करणे स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय समितीने अन्य विविध महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवून त्यासंदर्भात प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्याची विनंती न्यायालयास केली आहे.आरमर्स बिल्डर्सने नारी येथील सुगतनगरात अवैधरीत्या बांधलेल्या एका इमारतीमध्ये प्रियांश व पीयूष धर या जुळ्या भावंडांचा हायटेन्शन लाईनमुळे गेल्यावर्षी मृत्यू झाला. न्यायालयाने त्या घटनेची गंभीर दखल घेऊन यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. याप्रकरणात अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालय मित्र असून मध्यस्थातर्फे अ‍ॅड. शशिभूषण वाहणे कामकाज पाहत आहेत. 

समितीची निरीक्षणे

  1. नासुप्र, मनपा व एसएनडीएल यांनी हायटेन्शन वीज लाईनखालील झोपडपट्ट्यांकडे दुर्लक्ष केले. हायटेन्शन वीज लाईन झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांकरिताही धोकादायक आहे. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे.
  2.  अनेक घरमालकांनी लो-टेन्शन लाईन(४४० व्होल्टस्)पासून हातभर अंतरापर्यंत बांधकामे केली आहेत. त्याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. लो-टेन्शन लाईनदेखील प्राणघातक आहे. या लाईनमुळे अनेक प्राणघातक दुर्घटना घडल्या आहेत.
  3.  वीज सुरक्षा नियमांची पायमल्ली करून करण्यात आलेली बांधकामे तातडीने तोडणे आवश्यक आहे.
  4.  दाट लोकवस्तीच्या परिसरात एअर बंच केबलची व्यवस्था करण्यात यावी. त्यामुळे वीजचोरी व वीज गळतीवर नियंत्रण मिळविता येईल. तसेच, विजेच्या धक्यामुळे होणारे मृत्यू थांबविता येतील.
टॅग्स :High Courtउच्च न्यायालयelectricityवीज