शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

हायकोर्टाचा दणका : चार आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 22:33 IST

Wardha murder case, Four accused sentenced to life imprisonment in High Court मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वर्धा जिल्ह्यातील एका खून प्रकरणामध्ये चार आरोपींना आजन्म कारावास व प्रत्येकी १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देवर्धा सत्र न्यायालयाचा निर्णय पलटवला

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वर्धा जिल्ह्यातील एका खून प्रकरणामध्ये चार आरोपींना आजन्म कारावास व प्रत्येकी १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांनी हा निर्वाळा दिला. नामदेव हरी दयारे (४२), मालू ज्ञानेश्वर उईके (४६), गिरीश उत्तम गदाडे (४२) व श्याम दादू गोंडाणे (४७) अशी आरोपींची नावे असून ते पुलगाव येथील रहिवासी आहेत. ५ सप्टेंबर २००६ रोजी वर्धा सत्र न्यायालयाने सरकार पक्ष गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहचून या चारही आरोपींना निर्दोष सोडले होते. त्यामुळे राज्य सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता सरकारचे अपील मंजूर करून सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला आणि आरोपींना खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. सरकारतर्फे ॲड. मेहरोज खान पठाण यांनी कामकाज पाहिले.

अशी घडली घटना

मयताचे नाव राजकुमार पायेकर होते. २३ फेब्रुवारी २००५ रोजी रात्री ९ च्या सुमारास आरोपी नामदेव घरापुढे खड्डा करीत होता. इतर आरोपी त्याच्यासोबत होते. दरम्यान, राजकुमारने टोकल्यामुळे नामदेवला राग आला. त्याने राजकुमारच्या डोक्यावर सब्बल मारली. परिणामी, राजकुमार खाली कोसळला. त्यानंतर सर्व आरोपींनी त्याच्यावर पुन्हा सब्बल, काठ्या व गोट्यांनी हल्ला केला. त्यामुळे राजकुमार जागीवरच ठार झाला.

दंडाची रक्कम आईला

आरोपींनी दंड जमा केल्यास, ती संपूर्ण रक्कम मयताची आई शोभा पायेकर यांना देण्यात यावी असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. तसेच, आरोपींनी रक्कम जमा केली की नाही, याचा अहवाल तीन महिन्यात सादर करावा, असे पुलगाव पोलीस निरीक्षकांना सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMurderखूनLife Imprisonmentजन्मठेप