शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

हायकोर्ट : हुंकार सभेवर स्थगितीस नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:23 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रदेशच्या हुंकार सभेवर स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच, आयोजकांना सभा घेताना अटी व शर्तींचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिलेत.

ठळक मुद्देअटी व शर्तींचे पालन करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रदेशच्या हुंकार सभेवर स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच, आयोजकांना सभा घेताना अटी व शर्तींचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिलेत.ही सभा येत्या २५ नोव्हेंबर रोजी क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. सक्करदरा पोलिसांनी सभेला परवानगी देताना २३ अटी व शर्ती निश्चित करून दिल्या आहेत. या सभेविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, याचिकाकर्त्यांनी विविध आक्षेप नोंदवून सभेवर स्थगिती देण्याची विनंती केली. त्यानंतर न्यायालयाने सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बाजू ऐकून ही विनंती अमान्य केली व आयोजकांना ही सभा घेताना अटी व शर्तींचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिलेत. आयोजकांनी अटी व शर्तींचे उल्लंघन केल्यास याचिकाकर्ते अवमानना याचिका दाखल करू शकतात असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले. तसेच, गृह विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, महानगर संघचालक राजेश लोया, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू व ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य यांना नोटीस बजावून याचिकेतील मुद्यांवर उत्तर दाखल करण्यास सांगण्यात आले. या प्रकरणावर आता नाताळाच्या सुट्यांनंतर पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अश्विन इंगोले, आरएसएसतर्फे वरिष्ठ अधिवक्ता सुनील मनोहर तर, सरकारतर्फे वरिष्ठ अधिवक्ता आनंद जयस्वाल यांनी कामकाज पाहिले.असे आहे याचिकाकर्त्याचे म्हणणेअयोध्या येथे राम मंदिर बांधण्याचा मुद्दा पुढे रेटण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात अयोध्या वादाचे प्रकरण प्रलंबित असून त्यावर येत्या जानेवारीमध्ये पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत ही सभा आयोजित करणे बेकायदेशीर आहे. आयोजक विशिष्ट समाजापुरते मर्यादित आहेत. त्यामुळे ही सभा आयोजित केल्यास इतर समाजांमध्ये असंतोष निर्माण होईल असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAyodhyaअयोध्या