शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

पुरामुळे संपर्क तुटलेल्या चार गावांना मूलभूत सुविधा द्या, उच्च न्यायालयाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2022 11:22 IST

गडचिरोली जिल्ह्यातील दाहक परिस्थिती

नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यामधील पुरामुळे संपर्क तुटलेल्या वेंगणूर, सुरगाव, अळंगेपल्ली व पडकाटोला या गावांना चार आठवड्यांमध्ये तात्पुरते रस्ते, पूल व इतर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला. गरज वाटल्यास यासाठी भारतीय सेना व बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनची मदत घ्या, असेही सांगितले. याशिवाय, पक्के रोड, पूल व इतर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सरकारला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व वाल्मिकी एसए मेनेझेस यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या गावांतील आदिवासी नागरिकांनी गेल्या जूनमध्ये उच्च न्यायालयाला पत्र लिहून स्वत:च्या व्यथा सांगितल्या होत्या. त्यावरून न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या प्रकरणात बुधवारी आदिवासी व समाज कल्याण विभागाचे प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव व वन विभागाचे प्रधान सचिव यांनाही प्रतिवादी करण्यात आले व सर्वांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

पावसाळ्यात कन्नमवार जलाशयामध्ये पाणी साचल्यानंतर या गावांचा संपर्क तुटतो. त्यानंतर नागरिकांना आरोग्य व इतर आवश्यक सेवांकरिता नावेने धोकादायक प्रवास करावा लागतो. सध्याचे आरोग्य केंद्र या क्षेत्रापासून २० किलोमीटर लांब आहे. परिणामी, अकस्मात परिस्थितीत नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होत नाही. २०१९ मध्ये जिल्हा परिषदेने वेंगणूर येथे आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव पाठविला होता; पण त्यावर काहीच निर्णय घेण्यात आला नाही, असे पीडित नागरिकांचे म्हणणे आहे. प्रकरणावर आता ६ ऑक्टोबरला पुढील सुनावणी होईल. ॲड. रेणुका सिरपूरकर यांनी याचिकेचे कामकाज पाहिले.

अशा आहेत नागरिकांच्या मागण्या

१ - वेंगणूर येथे विशेष आरोग्य केंद्र स्थापन करण्यात यावे.

२ - आरोग्य केंद्र मंजूर होईपर्यंत एका डॉक्टरांना तात्पुरते नियुक्त करावे.

३ - कन्नमवार जलाशयावर पूल बांधण्यात यावा.

४ - गावकऱ्यांना तातडीने नवीन नाव देण्यात यावी.

५ - पावसाळ्यात वीज खंडित होऊ नये यासाठी आवश्यक उपाय करावेत.

उदासीनता दाखविल्यामुळे सरकारला फटकारले

या चारही गावांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उदासीनता दाखविल्यामुळे राज्य सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले. पावसाळ्यात या चारही गावांमध्ये पाणी शिरते. त्यामुळे वर्षातील सुमारे सहा ते सात महिने ही गावे संपर्काबाहेर जातात. या गावांमध्ये माडिया गोंड जमातीचे नागरिक राहतात. केंद्र सरकारने १७ सप्टेंबर २०१९ रोजी परिपत्रक जारी करून ही जमात नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या जमातीच्या संवर्धनाकरिता विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु, राज्य सरकारने अद्याप ठोस उपाययोजना केल्या नाहीत. या परिस्थितीत या गावातील नागरिकांना किती यातना भोगाव्या लागत असतील याची कल्पना केली जाऊ शकते, असे न्यायालय म्हणाले.

टॅग्स :Courtन्यायालयfloodपूरGadchiroliगडचिरोलीHigh Courtउच्च न्यायालय