शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

पुरामुळे संपर्क तुटलेल्या चार गावांना मूलभूत सुविधा द्या, उच्च न्यायालयाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2022 11:22 IST

गडचिरोली जिल्ह्यातील दाहक परिस्थिती

नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यामधील पुरामुळे संपर्क तुटलेल्या वेंगणूर, सुरगाव, अळंगेपल्ली व पडकाटोला या गावांना चार आठवड्यांमध्ये तात्पुरते रस्ते, पूल व इतर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला. गरज वाटल्यास यासाठी भारतीय सेना व बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनची मदत घ्या, असेही सांगितले. याशिवाय, पक्के रोड, पूल व इतर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सरकारला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व वाल्मिकी एसए मेनेझेस यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या गावांतील आदिवासी नागरिकांनी गेल्या जूनमध्ये उच्च न्यायालयाला पत्र लिहून स्वत:च्या व्यथा सांगितल्या होत्या. त्यावरून न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या प्रकरणात बुधवारी आदिवासी व समाज कल्याण विभागाचे प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव व वन विभागाचे प्रधान सचिव यांनाही प्रतिवादी करण्यात आले व सर्वांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

पावसाळ्यात कन्नमवार जलाशयामध्ये पाणी साचल्यानंतर या गावांचा संपर्क तुटतो. त्यानंतर नागरिकांना आरोग्य व इतर आवश्यक सेवांकरिता नावेने धोकादायक प्रवास करावा लागतो. सध्याचे आरोग्य केंद्र या क्षेत्रापासून २० किलोमीटर लांब आहे. परिणामी, अकस्मात परिस्थितीत नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होत नाही. २०१९ मध्ये जिल्हा परिषदेने वेंगणूर येथे आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव पाठविला होता; पण त्यावर काहीच निर्णय घेण्यात आला नाही, असे पीडित नागरिकांचे म्हणणे आहे. प्रकरणावर आता ६ ऑक्टोबरला पुढील सुनावणी होईल. ॲड. रेणुका सिरपूरकर यांनी याचिकेचे कामकाज पाहिले.

अशा आहेत नागरिकांच्या मागण्या

१ - वेंगणूर येथे विशेष आरोग्य केंद्र स्थापन करण्यात यावे.

२ - आरोग्य केंद्र मंजूर होईपर्यंत एका डॉक्टरांना तात्पुरते नियुक्त करावे.

३ - कन्नमवार जलाशयावर पूल बांधण्यात यावा.

४ - गावकऱ्यांना तातडीने नवीन नाव देण्यात यावी.

५ - पावसाळ्यात वीज खंडित होऊ नये यासाठी आवश्यक उपाय करावेत.

उदासीनता दाखविल्यामुळे सरकारला फटकारले

या चारही गावांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उदासीनता दाखविल्यामुळे राज्य सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले. पावसाळ्यात या चारही गावांमध्ये पाणी शिरते. त्यामुळे वर्षातील सुमारे सहा ते सात महिने ही गावे संपर्काबाहेर जातात. या गावांमध्ये माडिया गोंड जमातीचे नागरिक राहतात. केंद्र सरकारने १७ सप्टेंबर २०१९ रोजी परिपत्रक जारी करून ही जमात नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या जमातीच्या संवर्धनाकरिता विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु, राज्य सरकारने अद्याप ठोस उपाययोजना केल्या नाहीत. या परिस्थितीत या गावातील नागरिकांना किती यातना भोगाव्या लागत असतील याची कल्पना केली जाऊ शकते, असे न्यायालय म्हणाले.

टॅग्स :Courtन्यायालयfloodपूरGadchiroliगडचिरोलीHigh Courtउच्च न्यायालय