शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

पुरामुळे संपर्क तुटलेल्या चार गावांना मूलभूत सुविधा द्या, उच्च न्यायालयाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2022 11:22 IST

गडचिरोली जिल्ह्यातील दाहक परिस्थिती

नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यामधील पुरामुळे संपर्क तुटलेल्या वेंगणूर, सुरगाव, अळंगेपल्ली व पडकाटोला या गावांना चार आठवड्यांमध्ये तात्पुरते रस्ते, पूल व इतर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला. गरज वाटल्यास यासाठी भारतीय सेना व बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनची मदत घ्या, असेही सांगितले. याशिवाय, पक्के रोड, पूल व इतर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सरकारला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व वाल्मिकी एसए मेनेझेस यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या गावांतील आदिवासी नागरिकांनी गेल्या जूनमध्ये उच्च न्यायालयाला पत्र लिहून स्वत:च्या व्यथा सांगितल्या होत्या. त्यावरून न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या प्रकरणात बुधवारी आदिवासी व समाज कल्याण विभागाचे प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव व वन विभागाचे प्रधान सचिव यांनाही प्रतिवादी करण्यात आले व सर्वांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

पावसाळ्यात कन्नमवार जलाशयामध्ये पाणी साचल्यानंतर या गावांचा संपर्क तुटतो. त्यानंतर नागरिकांना आरोग्य व इतर आवश्यक सेवांकरिता नावेने धोकादायक प्रवास करावा लागतो. सध्याचे आरोग्य केंद्र या क्षेत्रापासून २० किलोमीटर लांब आहे. परिणामी, अकस्मात परिस्थितीत नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होत नाही. २०१९ मध्ये जिल्हा परिषदेने वेंगणूर येथे आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव पाठविला होता; पण त्यावर काहीच निर्णय घेण्यात आला नाही, असे पीडित नागरिकांचे म्हणणे आहे. प्रकरणावर आता ६ ऑक्टोबरला पुढील सुनावणी होईल. ॲड. रेणुका सिरपूरकर यांनी याचिकेचे कामकाज पाहिले.

अशा आहेत नागरिकांच्या मागण्या

१ - वेंगणूर येथे विशेष आरोग्य केंद्र स्थापन करण्यात यावे.

२ - आरोग्य केंद्र मंजूर होईपर्यंत एका डॉक्टरांना तात्पुरते नियुक्त करावे.

३ - कन्नमवार जलाशयावर पूल बांधण्यात यावा.

४ - गावकऱ्यांना तातडीने नवीन नाव देण्यात यावी.

५ - पावसाळ्यात वीज खंडित होऊ नये यासाठी आवश्यक उपाय करावेत.

उदासीनता दाखविल्यामुळे सरकारला फटकारले

या चारही गावांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उदासीनता दाखविल्यामुळे राज्य सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले. पावसाळ्यात या चारही गावांमध्ये पाणी शिरते. त्यामुळे वर्षातील सुमारे सहा ते सात महिने ही गावे संपर्काबाहेर जातात. या गावांमध्ये माडिया गोंड जमातीचे नागरिक राहतात. केंद्र सरकारने १७ सप्टेंबर २०१९ रोजी परिपत्रक जारी करून ही जमात नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या जमातीच्या संवर्धनाकरिता विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु, राज्य सरकारने अद्याप ठोस उपाययोजना केल्या नाहीत. या परिस्थितीत या गावातील नागरिकांना किती यातना भोगाव्या लागत असतील याची कल्पना केली जाऊ शकते, असे न्यायालय म्हणाले.

टॅग्स :Courtन्यायालयfloodपूरGadchiroliगडचिरोलीHigh Courtउच्च न्यायालय