शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

नागपुरातील ८७ ट्रॅव्हल्स कंपन्यांची प्रवासी वाहतूक बंद करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 20:00 IST

शहरातील ८७ खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांची प्रवासी वाहतूक येत्या १५ जानेवारीपासून बंद करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी प्रादेशिक परिवहन विभागाला दिला.

ठळक मुद्दे१५ जानेवारीपासून कारवाई करण्याची मुभा

आॅनलाईन लोकमतनागपूर : शहरातील ८७ खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांची प्रवासी वाहतूक येत्या १५ जानेवारीपासून बंद करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी प्रादेशिक परिवहन विभागाला दिला. या आदेशामुळे मुजोरीने वागत असलेल्या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना जोरदार दणका बसला आहे. परिणामी, त्यांना १५ जानेवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत न्यायालयात उपस्थित राहून ते प्रवाशांची अवैधपणे वाहतूक करीत नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे. अन्यथा, त्यांच्याविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू केली जाईल.प्रवाशांच्या अवैध वाहतुकीसंदर्भात न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, शासनाने शहरातील ८७ खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना २४ नोव्हेंबर रोजी वर्तमानपत्राद्वारे नोटीस तामील केली होती. कंपन्यांना २९ नोव्हेंबर रोजी न्यायालयात उपस्थित होऊन स्वत:ची बाजू स्पष्ट करायची होती. परंतु, त्या तारखेला कोणीच न्यायालयात उपस्थित झाले नाही. परिणामी, न्यायालयाने सर्व कंपन्यांना २० डिसेंबर ही तारीख दिली होती. या तारखेलाही कंपन्या हजर झाल्या नाहीत. त्यामुळे न्यायालयाने ही बाब गंभिरतेने घेऊन वरीलप्रमाणे आदेश दिला. या आदेशाने कंपन्यांमध्ये खळबळ माजली असून त्यांच्या पुढील कृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याप्रकरणात अ‍ॅड. हरनीश गढिया न्यायालय मित्र आहेत.२०० मीटरच्या बंधनाची पायमल्लीशासकीय बसस्थानकापासून २०० मीटरच्या आत खासगी वाहनांद्वारे प्रवासी वाहतूक करता येत नाही. तसेच, या परिसरात खासगी वाहनांची पार्किंग करण्यास प्रतिबंध आहे. शहरातील गणेशपेठ बसस्थानकाच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांनी १५ फेब्रुवारी १९९६ रोजी तर, पोलिसांनी ३ एप्रिल १९९६ रोजी अधिसूचना जारी करून खासगी वाहनांना प्रतिबंध केला आहे. असे असतानाही खासगी वाहन चालकांनी बसस्थानकांपासून २०० मीटरच्या आत कार्यालये उघडली आहेत. त्यामुळे शासनाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय