शहरं
Join us  
Trending Stories
1
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
2
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
3
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
4
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
5
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
6
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
7
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
8
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
9
SIR च्या कामाचा भार असह्य; वरिष्ठाच्या धमक्यांना कंटाळून शिक्षकाची रेल्वेखाली उडी, एकाच दिवशी दोन कर्मचाऱ्यांचे टोकाचे पाऊल
10
Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?
11
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
12
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
13
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
14
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
15
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
16
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
17
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
18
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
19
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! ९०% कंपन्या 'या' पदावर प्रोफेशनल्सची करणार भरती
20
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशक बाधितांना भरपाई देण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 10:17 IST

कीटकनाशकांमुळे विविध प्रकारची इजा पोहोचलेले शेतकरी व शेतमजुरांना समाधानकारक भरपाई देण्यावर तीन महिन्यांत धोरणात्मक निर्णय घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिला.

ठळक मुद्देउपचारावरील खर्चही परत करण्यास सांगितले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कीटकनाशकांमुळे विविध प्रकारची इजा पोहोचलेले शेतकरी व शेतमजुरांना समाधानकारक भरपाई देण्यावर तीन महिन्यांत धोरणात्मक निर्णय घेण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला दिला. तसेच, सर्वच बाधितांच्या उपचारावर झालेला खर्चही परत करण्यास सांगितले. त्यामुळे हजारो शेतकरी व शेतमजुरांना दिलासा मिळाला आहे.यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते जम्मू आनंद यांनी अर्ज सादर केला होता. सध्या कीटकनाशक बाधितांना सरकारने प्रत्येकी पाच हजार रुपये भरपाई दिली आहे. अर्जदाराने त्यावर असमाधान व्यक्त करून प्रत्येक बाधिताला २५ हजार रुपये भरपाई देण्याची विनंती केली होती. न्यायालयाला अर्जदाराच्या मागणीत तथ्य आढळून आल्यामुळे सरकारला हा आदेश देण्यात आला. राज्यात दीड हजारावर शेतकरी व शेतमजूर कीटकनाशकांमुळे बाधित झाले आहेत. कुणाला अंधत्व आले आहे तर, कुणाला अन्य विविध प्रकारची इजा पोहोचली आहे. आतापर्यंत सरकारने केवळ ८२८ बाधितांना प्रत्येकी पाच हजार रुपये भरपाई दिली आहे असे अर्जदाराने न्यायालयाला सांगितले.याविषयीच्या मूळ प्रकरणात न्यायालयाने आत्महत्या करणाऱ्या व अनैसर्गिक मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना समान भरपाई देण्यावर धोरणात्मक निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे. तसेच, मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई वाढवून दिली आहे. त्यामुळे एकूण भरपाई चार लाख रुपये झाली आहे. सरकारने त्यांना केवळ प्रत्येकी दोन लाख रुपये भरपाई दिली होती. अर्जावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांच्यासमक्ष सुनावणी झाली. अर्जदारातर्फे अ‍ॅड. ए. के. वाघमारे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Farmerशेतकरी