शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

हायकोर्टाचा निर्णय : एसटीएफआर मीटरवर निरर्थक आक्षेप घेणाऱ्यांवर ५० लाखाचा दावा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 00:29 IST

निरर्थक व गुणवत्ताहीन मुद्दे मांडून न्यायालयाचा किमती वेळ वाया घालवल्यामुळे यवतमाळ येथील शेतकरी आनंद एम्बडवार, वर्धा येथील नागार्जुन अ‍ॅग्रो केमिकल कंपनी व नागपूर येथील शेतकरी भगवान कारमेंगे यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ५० लाख रुपये दावा खर्च बसवला.

ठळक मुद्देदोन याचिकाकर्त्यांसह मध्यस्थाला दणका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एसटीएफआर (सॉईल टेस्टिंग अ‍ॅन्ड फर्टिलायझर रेकमन्डेशन) मीटरविरुद्ध निरर्थक व गुणवत्ताहीन मुद्दे मांडून न्यायालयाचा किमती वेळ वाया घालवल्यामुळे यवतमाळ येथील शेतकरी आनंद एम्बडवार, वर्धा येथील नागार्जुन अ‍ॅग्रो केमिकल कंपनी व नागपूर येथील शेतकरी भगवान कारमेंगे यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ५० लाख रुपये दावा खर्च बसवला. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व मिलिंद जाधव यांनी शुक्रवारी हा दणका दिला.न्यायालयाच्या निर्णयानुसार, हा दावा खर्च याचिकाकर्ते व मध्यस्थाने संयुक्तरीत्या किंवा स्वतंत्रपणे नवी दिल्लीतील इंडियन कौन्सिल फॉर अ‍ॅग्रिकल्चर रिसर्च व इंडियन अ‍ॅग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थांना अदा करायचा आहे. त्याकरिता त्यांना चार आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे. ही रक्कम दोन्ही संस्थांना समान (प्रत्येकी २५ लाख) विभागून देण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, दोन्ही रिसर्च संस्थांनी नियमांची पायमल्ली करणाºया नागार्जुन कंपनीवर कायद्यानुसार कारवाई करावी, असे निर्देशदेखील देण्यात आले आहेत. एसटीएफआर मीटरविरुद्ध आनंद एम्बडवार यांनी जनहित याचिका व नागार्जुन कंपनीने रिट याचिका दाखल केली होती तर, कारमेंगे यांनी या प्रकरणात मध्यस्थी अर्ज दाखल करून दोन्ही याचिकाकर्त्यांचे समर्थन केले होते. उच्च न्यायालयाने या प्रकरणावर १२ डिसेंबर रोजी अंतिम सुनावणी पूर्ण झाल्यानंतर राखून ठेवलेला निर्णय शुक्रवारी जाहीर केला.देशातील बहुसंख्य शेतकऱ्यांना मातीचा प्रकार, कोणत्या मातीमध्ये कोणते पीक घेतले पाहिजे आणि मातीची गुणवत्ता कशी वाढविता येते या गोष्टी माहिती नसतात. त्यामुळे ते वर्षानुवर्षे चुकीचे पीक घेत राहतात. त्यातून त्यांना आवश्यक उत्पादन होत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने मृदा चाचणी प्रकल्प आणला. त्या अंतर्गत इंडियन कौन्सिल फॉर अ‍ॅग्रिकल्चर रिसर्च व इंडियन अ‍ॅग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी माती परीक्षणाकरिता एसटीएफआर मीटर विकसित केले. हे मीटर मातीमधील १२ घटकांची तपासणी करते असा संशोधनकर्त्यांचा दावा आहे. एसटीएफआर मीटरच्या उत्पादन व मार्केटिंगकरिता १४ कंपन्यांना लायसन्स देण्यात आले आहेत. या प्रकल्पांतर्गत शेतकºयांना सॉईल हेल्थ कार्ड दिले जाते. त्यामध्ये मातीमधील १२ घटकांच्या प्रमाणाचा अहवाल असतो. तसेच, त्या अहवालाच्या आधारावर मातीमध्ये कोणते खत टाकायचे याची शिफारस केली जाते. न्यायालयात केंद्र सरकारतर्फे अ‍ॅड. प्रवीण स्वरुप व अ‍ॅड. मुग्धा चांदुरकर यांनी कामकाज पाहिले.असे होते आरोपएसटीएफआर मीटरमध्ये २ एप्रिल २०१८ पर्यंत मातीमधील कॉपर व नायट्रोजन या दोन बंधनकारक घटकांसह एकूण १२ घटकांची पूर्ण तपासणी होत नव्हती. असे असताना हे मीटर सर्व १२ घटकांची तपासणी करीत असल्याचा चुकीचा प्रचार करण्यात आला. तसेच, एसटीएफआर मीटरचा व्यावसायिक उपयोगही करण्यात आला. त्यामुळे हजारो शेतकºयांची फसवणूक झाली. शेतजमिनीचे प्रचंड नुकसान झाले असे याचिकाकर्ते व मध्यस्थाचे आरोप होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी व एसटीएफआर मीटरचा व्यावसायिक उपयोग थांबविण्यात यावा अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली होती.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर