शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

हायकोर्टाचा दणका : स्टेट बँक ऑफ इंडियावर ५० हजार रुपये दावा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 23:50 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दोन प्रकरणामध्ये योग्य सहकार्य न मिळाल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियावर एकूण ५० हजार रुपये दावा खर्च बसविण्यात आला आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दोन प्रकरणामध्ये योग्य सहकार्य न मिळाल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियावर एकूण ५० हजार रुपये दावा खर्च बसविण्यात आला आहे. ही रक्कम न्यायालयात जमा करण्यासाठी बँकेला १४ नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. तसेच, या तारखेला झोन कार्यालयाच्या मुख्य व्यवस्थापकांना न्यायालयामध्ये व्यक्तीश: हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व मिलिंद जाधव यांच्या न्यायपीठाने बँकेला हा दणका दिला. एका कार विक्रेत्या कंपनीने कर्ज वसुली न्यायाधिकरण व स्टेट बँक ऑफ इंडियाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या प्रकरणात बजावण्यात आलेली नोटीस तामील होऊनही बँके चे जबाबदार अधिकारी किंवा वकील न्यायालयात हजर झाले नाही. त्यामुळे न्यायालयाने संतप्त होऊन बँकेला फटकारले. बँक न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत नाही हे विविध प्रकरणात आढळून आले. बँके च्या या कृतीमुळे न्यायालयाचा किमती वेळ वाया जात आहे. तसेच, प्रकरणे वेगात निकाली काढण्यात अडथळे निर्माण होत आहेत असे ताशेरे न्यायालयाने ओढले.यासंदर्भात वरिष्ठ प्राधिकाऱ्यांनी योग्य कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे या आदेशाची माहिती त्यांना देण्यात यावी. त्यानंतर वरिष्ठ प्राधिकाऱ्यांनी संबंधित शाखा अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना जारी कराव्यात. तसेच, ते आवश्यकता वाटल्यास दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाईही करू शकतात असे न्यायालयाने सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडिया