शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हायकोर्ट : नॅशनल इन्शुरन्सचे अपील खारीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 21:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे अपील खारीज केले. १९ ...

ठळक मुद्देअपघातात मृत महिलेच्या वारसांना नुकसान भरपाईचा आदेश कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे अपील खारीज केले.१९ ऑक्टोबर २०११ रोजी मोटर अपघात दावा न्यायाधिकरणाने ट्रक अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या वारसदारांना भरपाईसाठी पात्र ठरवले होते. त्या निर्णयाविरुद्ध हे अपील दाखल करण्यात आले होते. अपीलवर न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष अंतिम सुनावणी झाली. मालवाहू वाहनामध्ये मालासह प्रवास केल्यामुळे विमा पॉलिसी अटींचे उल्लंघन होत नाही असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. मयताचे नाव लक्ष्मीबाई सुदित होते. ती वणी, जि. यवतमाळ येथील रहिवासी होती. तिने १ जून २००३ रोजी जनावरांसाठी चारा खरेदी केला व तो चारा घरी नेण्यासाठी ट्रकमध्ये भरला. तीही त्याच ट्रकमध्ये बसली. दरम्यान, ट्रकचा अपघात झाला. मालवाहू ट्रकमध्ये प्रवास केल्यामुळे विमा पॉलिसी अटींचा भंग झाला असे कारण देऊन कंपनीने लक्ष्मीबाईच्या वारसदार मुली सिंधू, इंदू व शालू यांना भरपाई नाकारली होती. त्यामुळे त्यांनी मोटर अपघात दावा न्यायाधिकरणात धाव घेतली होती.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय