शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

आलापल्ली-सिरोंचा रोडच्या दूरवस्थेवर उत्तर सादर करा

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: April 24, 2024 17:27 IST

Nagpur : हायकोर्टाचा सरकारला आदेश; सुमारे ६०० गावांतील नागरिक त्रस्त

नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली ते सिरोंचा या १०० किलोमीटर रोडच्या दूरवस्थेवर दोन आठवड्यात उत्तर सादर करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने बुधवारी रस्ते, परिवहन व महामार्ग विभागाचे सचिव, वन महासंचालक आणि प्रधान मुख्य वन संवर्धक यांना दिले.

या रोडचा तातडीने विकास व्हावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते मोहन कारेमोरे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. महाराष्ट्र व तेलंगना राज्याला जोडणाऱ्या या रोडची जड वाहतुकीमुळे दूरवस्था झाली आहे. हा रोड जागोेजागी उखरला आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी, रोडवर अपघात होतात. धुळीमुळे वायू प्रदूषण होते व वाहनेही खराब होत आहेत. हे १०० किलोमीटर अंतर कापण्यासाठी तब्बल १० ते १२ तास लागतात. या रोडमुळे सुमारे ६०० गावांतील नागरिक त्रस्त आहेत. त्यांना वैद्यकीय गरजेच्या वेळी तत्काळ रुग्णालयात पोहोचता येत नाही. अहेरी व भामरागड परिसरातील रोड खूपच खराब झाला आहे. पावसाळ्यात या रोडने जाणे-येणे करणे अशक्य होते. रोडची दुरुस्ती करण्यासाठी जानेवारी-२०२३ मध्ये टेंडर जारी करण्यात आले होते. परंतु, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. मनोजकुमार मिश्रा यांनी बाजू मांडली.

टॅग्स :nagpurनागपूरroad transportरस्ते वाहतूकHigh Courtउच्च न्यायालय