शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
13
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
14
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
15
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
16
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
17
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
18
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
19
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
20
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा

‘ते सारे’ मराठा नेतृत्वाचे अपयश लपविण्यासाठीच

By admin | Updated: October 6, 2016 02:46 IST

मराठा व दलित-आंबेडकरी समाजाची वैचारिक दैवते सारखी आहेत. त्यांच्यात जातीच्या विषयावरून संघर्ष शक्यच नाही.

प्रज्ञा दया पवार : विशेष मुलाखतीत साहित्य ते समाजाचे रोखठोक विश्लेषणशफी पठाण  नागपूरमराठा व दलित-आंबेडकरी समाजाची वैचारिक दैवते सारखी आहेत. त्यांच्यात जातीच्या विषयावरून संघर्ष शक्यच नाही. व्यभिचार ही वृत्ती आहे नि ती कुठल्याच विशिष्ट जातीची नसते. स्वातंत्र्या नंतरची अनेक वर्षे सलग सत्तेत राहिलेल्या मराठा समाजाच्या नेत्यांनी आपल्या समाजाच्या हितासाठी काहीच केले नाही. आता या समाजातील तरुण आपल्याला जाब विचारतील ही भीती त्यांना सतावत आहे. आपले अपयश लपविण्यासाठीच कोपर्डीसारख्या विषयांना हवा देऊन तरुणाईची माथी भडकवली जात आहेत, असे प्रखर मत प्रसिद्ध कवयित्री प्रज्ञा दया पवार यांनी व्यक्त केले. लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत साहित्य ते समाजाचे रोखठोक विश्लेषण करताना त्यांनी अनेक विषयावर आपले बेधडक विचार मांडले. कोपर्डीच्या प्रकरणावरून आज रान माजले आहे. दलित विरुद्ध मराठा असे चित्र रंगवले जात आहे. पण, ते खरे नाही. या दोन्ही समाजामध्ये कुठलाही संघर्ष नाही. जी घटना घडली ती निश्चितच निंदनीय आहे. पण, त्यासाठी कुठल्याही एका समाजाला दोषी धरता येणार नाही. मराठा समाजाची अनेक मंडळी सत्तेत असताना त्यांनी भांडवलदारांना सोयीचे होईल असे धोरण राबविले. बक्कळ पैसा कमावला.पण, समाजाच्या हितासाठी काहीच केले नाही. आता दलितांच्या आरक्षणाकडे बोट दाखवले जात आहे. त्यांच्या आरक्षणाचे प्रमाण जास्त आहे म्हणून तुम्हाला आरक्षण मिळत नाही, असे विचार पेरले जात आहेत, असा आरोप प्रज्ञा पवार यांनी केला. पुरस्कार वापसीचा निर्णय योग्यचदेशात व राज्यात नवीन सरकार आल्यापासून धर्मांध शक्तींना बळ मिळत आहे. यातूनच दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीविरुद्ध कुणी बोलले तर त्याला राष्ट्रद्रोही ठरवले जात आहे. मी या वृत्तीचा निषेध करण्यासाठी राज्य शासनाचे पुरस्कार परत केले तेव्हा मलाही सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागला. पण, मला त्याची पर्वा नाही. नामदेव ढसाळांचे विचार माझ्या धमन्यांमध्ये वाहत असतात. या विचारांनीच मला पुरस्कार परत करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यावर आता काहीही चर्चा होत असली तरी माझा तो निर्णय योग्यच होता. साहित्य संमेलनाच्या निवडणुकीचाही राजकीय आखाडाअखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या मंचाला माझा विरोध नाही. मी आधी अशा दोन संमेलनांवर बहिष्कार घातला असला तरी त्याला काही तत्कालीन कारणे होती. खरं म्हणजे भाषा आणि संस्कृतीच्या विकासाच्या दृष्टीने संमेलन हा चांगला पर्याय आहे. पण, या संमेलनासाठी जी निवडणूक होते ती आता राजकीय स्टाईलने लढली जाते. राजकीय पक्षांच्या घोषणापत्राप्रमाणे आपला परिचय व कार्य रंगीत कागदावर छापून मतदारांना पाठवले जाते. निवडून येण्यासाठी मतदारांना विनवण्या कराव्या लागतात. कुठल्याही विचाराधिष्ठित लेखकाला अशी विवशता मान्य नसते. म्हणून चांगले साहित्यिक या निवडणुकीच्या आखाड्यात उतरत नाहीत, याकडेही प्रज्ञा पवार यांनी लक्ष वेधले.