शहरं
Join us  
Trending Stories
1
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
2
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
3
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
4
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
5
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
6
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
7
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
8
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
9
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
10
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
11
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
12
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली
13
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
14
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
15
Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!
16
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
17
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
18
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
19
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
20
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?

‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकनासाठी ‘हायटेक’ पाऊल

By admin | Updated: November 5, 2015 03:31 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यंदाच्या हिवाळी परीक्षांतून एक नवा इतिहास निर्माण होणार आहे.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यंदाच्या हिवाळी परीक्षांतून एक नवा इतिहास निर्माण होणार आहे. ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकनाच्या दृष्टीने विद्यापीठाने ‘हायटेक’ पाऊल उचलले आहे. यासाठी परीक्षा भवनात अद्ययावत ‘स्कॅनिंग मशीन’ व संगणक संच लावण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. लवकरच हे मूल्यांकन केंद्र पूर्णपणे स्थापन होणार असून अशा प्रकारचे केंद्र उभारणारे नागपूर विद्यापीठ राज्यातील पहिले विद्यापीठ ठरणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.राज्य शासनाच्या राजेश अग्रवाल समितीच्या शिफारसींनुसार विद्यापीठात तंत्रज्ञानाच्या मदतीचे मूल्यांकन करण्यावर भर देण्याचे निर्देश राज्यपालांनीच दिले होते. त्यानुसार यंदाच्या सत्रापासून मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन सारे काही ‘आॅनलाईन’ करण्याचा विद्यापीठाने निर्णय घेतला. विद्यापीठ आणि ‘एमकेसीएल’ यांच्यात झालेल्या नव्या करारामुळे नवीन शैक्षणिक सत्रापासून आॅनलाईन पुनर्मूल्यांकनाची जबाबदारी एमकेसीएलकडे सोपविण्यात आली आहे. ‘एमकेसीएल’च्या मदतीने संपूर्ण मूल्यांकन हे आॅनस्क्रीन होणार आहे. यासाठी अद्ययावत मूल्यांकन केंद्र स्थापन करण्याची गरज होती. त्यादृष्टीने प्रशासनाने हालचाली सुरू केल्या.मूल्यांकनासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त असे मूल्यांकन केंद्र स्थापन करण्यात येत आहे. या केंद्रावर उत्तरपत्रिकांचे थेट ‘स्कॅनिंग’ होणार असून मूल्यांकनाचीदेखील सुविधा राहणार आहे. ‘स्कॅनिंग’साठी १२६ मशीनची आवश्यकता भासणार आहे. यापैकी यंदा ६० मशीन लावण्यात येणार असून त्याचे काम युद्धस्तरावर सुरू असून या आठवड्यात हे काम पूर्ण होईल. त्यानंतर व्यावसायिक परीक्षांचे मूल्यांकन सुरू करण्यात येईल. यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘सॉफ्टवेअर’ची चाचणीदेखील झाली असून प्राध्यापकांना याचे प्रशिक्षणदेखील देण्यात आले आहे. पुढील काळात उत्तरपत्रिका तपासण्यासाठी जवळपास ४०० संगणक असणारे मोठे केंद्र उभारण्याचा विद्यापीठाचा मानस आहे, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी दिली.(प्रतिनिधी)एका दिवसात होणार २८ हजार उत्तरपत्रिकांचे ‘स्कॅनिंग’४हे मूल्यांकन केंद्र पूर्णपणे तयार झाल्यानंतर येथे १२६ ‘स्कॅनिंग मशीन’ राहणार आहेत. या मशीनच्या मदतीने एका दिवसात २८ हजार उत्तरत्रिकांचे ‘स्कॅनिंग’ करणे शक्य होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण प्रक्रिया वेगवान पद्धतीने होणार असल्यामुळे निकालदेखील झटपट लागतील. फेरमूल्यांकनाची प्रक्रियादेखील सोयीस्कर होणार असल्याने विद्यार्थ्यांना लवकर निकाल हाती मिळतील, असा दावा प्र-कुलगुरूंनी केला आहे.