शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकनासाठी ‘हायटेक’ पाऊल

By admin | Updated: November 5, 2015 03:31 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यंदाच्या हिवाळी परीक्षांतून एक नवा इतिहास निर्माण होणार आहे.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यंदाच्या हिवाळी परीक्षांतून एक नवा इतिहास निर्माण होणार आहे. ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकनाच्या दृष्टीने विद्यापीठाने ‘हायटेक’ पाऊल उचलले आहे. यासाठी परीक्षा भवनात अद्ययावत ‘स्कॅनिंग मशीन’ व संगणक संच लावण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. लवकरच हे मूल्यांकन केंद्र पूर्णपणे स्थापन होणार असून अशा प्रकारचे केंद्र उभारणारे नागपूर विद्यापीठ राज्यातील पहिले विद्यापीठ ठरणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.राज्य शासनाच्या राजेश अग्रवाल समितीच्या शिफारसींनुसार विद्यापीठात तंत्रज्ञानाच्या मदतीचे मूल्यांकन करण्यावर भर देण्याचे निर्देश राज्यपालांनीच दिले होते. त्यानुसार यंदाच्या सत्रापासून मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन सारे काही ‘आॅनलाईन’ करण्याचा विद्यापीठाने निर्णय घेतला. विद्यापीठ आणि ‘एमकेसीएल’ यांच्यात झालेल्या नव्या करारामुळे नवीन शैक्षणिक सत्रापासून आॅनलाईन पुनर्मूल्यांकनाची जबाबदारी एमकेसीएलकडे सोपविण्यात आली आहे. ‘एमकेसीएल’च्या मदतीने संपूर्ण मूल्यांकन हे आॅनस्क्रीन होणार आहे. यासाठी अद्ययावत मूल्यांकन केंद्र स्थापन करण्याची गरज होती. त्यादृष्टीने प्रशासनाने हालचाली सुरू केल्या.मूल्यांकनासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त असे मूल्यांकन केंद्र स्थापन करण्यात येत आहे. या केंद्रावर उत्तरपत्रिकांचे थेट ‘स्कॅनिंग’ होणार असून मूल्यांकनाचीदेखील सुविधा राहणार आहे. ‘स्कॅनिंग’साठी १२६ मशीनची आवश्यकता भासणार आहे. यापैकी यंदा ६० मशीन लावण्यात येणार असून त्याचे काम युद्धस्तरावर सुरू असून या आठवड्यात हे काम पूर्ण होईल. त्यानंतर व्यावसायिक परीक्षांचे मूल्यांकन सुरू करण्यात येईल. यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘सॉफ्टवेअर’ची चाचणीदेखील झाली असून प्राध्यापकांना याचे प्रशिक्षणदेखील देण्यात आले आहे. पुढील काळात उत्तरपत्रिका तपासण्यासाठी जवळपास ४०० संगणक असणारे मोठे केंद्र उभारण्याचा विद्यापीठाचा मानस आहे, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी दिली.(प्रतिनिधी)एका दिवसात होणार २८ हजार उत्तरपत्रिकांचे ‘स्कॅनिंग’४हे मूल्यांकन केंद्र पूर्णपणे तयार झाल्यानंतर येथे १२६ ‘स्कॅनिंग मशीन’ राहणार आहेत. या मशीनच्या मदतीने एका दिवसात २८ हजार उत्तरत्रिकांचे ‘स्कॅनिंग’ करणे शक्य होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण प्रक्रिया वेगवान पद्धतीने होणार असल्यामुळे निकालदेखील झटपट लागतील. फेरमूल्यांकनाची प्रक्रियादेखील सोयीस्कर होणार असल्याने विद्यार्थ्यांना लवकर निकाल हाती मिळतील, असा दावा प्र-कुलगुरूंनी केला आहे.