शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

येथे चालताना लागते जीवाची ‘बाजी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 22:17 IST

पावनखिंडीत शत्रूवर विजय प्राप्त करून ‘न भुतो न भविष्यति’ पराक्रम गाजविणारे बाजीप्रभू देशपांडे यांचे नाव इतिहासात अमर झाले आहे. वीरश्रीने संचारलेला त्यांचा पुतळा रामनगर चौकात लावण्यात आला असून चौकाला त्यांचे नावदेखील देण्यात आले आहे. मात्र प्रशासनाला या चौकाचे महत्त्व बहुतेक समजलेलेच नाही. अतिक्रमणामुळे या चौकाची रया तर गेलीच आहे. शिवाय या चौकापासून लक्ष्मीभुवन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर चालणे म्हणजे अनेकदा जीवाची ‘बाजी’ लावण्यासारखे झाले आहे.

ठळक मुद्देनागपुरातील  बाजीप्रभूनगर चौक झाला ‘चोक’लक्ष्मीभुवन चौकाकडे जाणारा रस्ता अतिक्रमणामुळे जामफूटपाथ झाले गायब

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावनखिंडीत शत्रूवर विजय प्राप्त करून ‘न भुतो न भविष्यति’ पराक्रम गाजविणारे बाजीप्रभू देशपांडे यांचे नाव इतिहासात अमर झाले आहे. वीरश्रीने संचारलेला त्यांचा पुतळा रामनगर चौकात लावण्यात आला असून चौकाला त्यांचे नावदेखील देण्यात आले आहे. मात्र प्रशासनाला या चौकाचे महत्त्व बहुतेक समजलेलेच नाही. अतिक्रमणामुळे या चौकाची रया तर गेलीच आहे. शिवाय या चौकापासून लक्ष्मीभुवन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर चालणे म्हणजे अनेकदा जीवाची ‘बाजी’ लावण्यासारखे झाले आहे. जागोजागी अतिक्रमण, गायब झालेले फूटपाथ यामुळे सदासर्वदा येथे वाहतुकीची कोंडी अनुभवयाला मिळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी निवासस्थान आणि आता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांचेदेखील निवासस्थान याच परिसराच्या नजीकच आहे. आता तरी प्रशासनाचे डोळे उघडतील का व हा भाग मोकळा श्वास घेईल का, असा प्रश्न जनमानसाकडून उपस्थित होत आहे.तसे पाहिले तर बाजीप्रभूनगर चौक ते लक्ष्मीभुवन चौकाकडे जाणारा मार्ग हा गोकुळपेठ बाजाराजवळ येतो. त्यामुळे सायंकाळी या मार्गावर तशीच गर्दी दिसून येते. मात्र या मार्गावर इतक्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे की नागरिकांना चालायला फूटपाथदेखील शिल्लक राहिलेले नाहीत. रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणच अतिक्रमण दिसून येत असून सगळीकडे अस्ताव्यस्त गाड्यांचे ‘पार्किंग’देखील होते. त्यामुळे तर पादचाऱ्

यांनादेखील अनेकदा मुख्य रस्त्याच्या मध्यभागाजवळून चालावे लागते. यामुळे येथे मोठा अपघात होण्याचीदेखील शक्यता आहे.बाजीप्रभूनगर चौकाची रयाच हरविलीबाजीप्रभूनगर चौकात शंकरनगर, रविनगर, धरमपेठ, बाजीप्रभूनगर, शिवाजीनगर व एलआयटीकडून येणारे एकूण सहा रस्त्यांचा संगम होतो. साहजिकच येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या चौकातील प्रत्येक कडेला कुठले ना कुठले अतिक्रमण आहे. हनुमान मंदिराजवळील हारफुलांची दुकाने, धरमपेठकडे जाणाऱ्या मार्गावर चौकात असलेल्या चहाच्या टपऱ्या, किराणा दुकाने इत्यादीमुळे पादचाऱ्यांना चालायलादेखील जागा राहिलेली नाही. शिवाय अनेकदा रस्त्यांवरच वाहने लागत असल्यामुळे तर चौकात दिवसभरातून अनेकदा वाहतुकीची कोंडी होते.दुकानदारांकडून अतिक्रमण 
धरमपेठकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत. यातील अनेक दुकानदारांनी फूटपाथवर अतिक्रमण केले आहे. फर्निचरच्या दुकानदारांकडून फूटपाथवरच सामान मांडल्याचे दिसून येते. तर काही मोबाईलच्या दुकानदारांनी फूटपाथवर मोठमोठे जाहिरातीचे फलक लावून चालण्यासाठी काहीच जागा शिल्लक ठेवलेली नाही. एका सलूनच्या समोर तर फूटपाथ आणि समोरील रस्त्यावर चक्क मंडप टाकून फटाके विकण्यात येत आहेत. या रस्त्यावर एक ‘वाईन शॉप’असून इमारतीचा प्रवेश त्याच्या शेजारूनच होतो. येथील फूटपाथच गायब झाला असून दुकानदाराने त्या जागेवरदेखील आपल्या ‘टाईल्स’ लावल्या आहेत. एका पर्यटन कंपनीकडून तर फूटपाथचा उपयोग सर्रासपणे कर्मचाऱ्यांच्या पार्किंगसाठी करण्यात येत आहे. कुणी जर दुकानदारांना हटकले तर त्यांच्यावर अरेरावी करण्यात येते, अशी नागरिकांनी तक्रार केली आहे. या रस्त्यांवर फूटपाथवर अनेक ‘ज्यूस सेंटर’ तसेच नाश्त्याची दुकानेदेखील आहेत. एका खाद्यपदार्थ विक्रेत्याने तर फूटपाथवरच स्टूल वगैरे लावून जागाच बळकावली आहे.लक्ष्मीभुवन चौकाची कोंडी 
लक्ष्मीभुवन चौकाजवळील भागात तर फूटपाथ काय रस्तादेखील शोधावा लागतो, अशी स्थिती आहे. स्थानिक दुकानदारांनी फूटपाथवर अतिक्रमण केले आहे. तर मुख्य रस्त्यावर दुहेरी तिहेरी ‘पार्किंग’ दिसून येते. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला तर फळविक्रेत्यांनी फूटपाथ आपलाच आहे असे समजून त्यावर कब्जाच केला आहे. शिवाय येथील कपड्याच्या दुकानदारांनीदेखील फूटपाथवर आपली मालकी असल्यासारखा उपयोग सुरू केला आहे. एका दुकानदाराने तर चक्क फूटपाथवरच साड्या लावून जाहिरात केली आहे.कारवाईसाठी पुढाकारच नाही 
बाजीप्रभूनगर चौक ते लक्ष्मीभुवन चौक या मार्गावरील दुरवस्थेमुळे येथील नागरिक हैराण आहेत. सायंकाळी तर रस्त्यावर चालायचीदेखील भीती वाटते. प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नाही. मोठमोठे नेते, पक्षांचे पदाधिकारी जवळपास राहतात. अगदी मनपाचे झोन कार्यालयदेखील फारसे दूर नाही. असे असतानादेखील अतिक्रमणावर कारवाई करण्याची कुणीही हिंमत करत नाही, असे म्हणत सामान्यांचा कुणी वाली आहे की नाही, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणnagpurनागपूर