शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

इथे रावणच आहे उदरनिर्वाहाचे साधन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 12:44 IST

रावणदहन नाही तर रावणाचे पुतळे नाहीत आणि त्यामुळे, त्यापासून होणारे आर्थिक उत्पन्नही नाही, अशी स्थिती आहे.

ठळक मुद्देपोटाची आग कोण विझविणार?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : असत्यावर सत्याचा विजय म्हणून साजरा होणारा विजयादशमी महोत्सव रावणदहनासाठी ओळखला जातो. कोरोनामुळे यंदा हा महोत्सव रद्द करण्यात आला आहे. त्याचा परिणाम रावणावर निर्भर असलेल्या कारागीर वर्गावर होणार आहे. रावणदहन नाही तर रावणाचे पुतळे नाहीत आणि त्यामुळे, त्यापासून होणारे आर्थिक उत्पन्नही नाही, अशी स्थिती आहे.बहुसांस्कृतिक देशात प्रत्येक सणोत्सव सर्वसामान्यांना रोजगाराचे प्रमुख कारण असतात. मात्र, यंदा हे सर्वच रोजगार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. रामनवमी असो, गणेशोत्सव असो, धम्मचक्र प्रवर्तन दिन असो वा अन्य सर्वच धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे, या उत्सवांवर रोजीरोटी कमावणारे कारागीर रिकाम्या हाताने बसले आहेत. रोज कमवू तर रोज खाऊ, अशा स्थितीत हा वर्ग असतो. त्यातच सणोत्सवाच्या काळात मिळणारा रोजगार पुढच्या काही महिन्यांसाठीच्या उदरनिर्वाहाचे साधन असतात. मात्र, यंदा ते सगळे हिरावले गेले आहेत. महालातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेले खेमकरणसिंग बिनवार हे रावण, कुंभकर्ण, मेघनाद यांचे पारंपरिक पुतळे बनविण्यासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या ५०-६० वर्षापासून अखंडितपणे हे कार्य ते करतात. त्यासाठी त्यांच्याकडे १५ ते २० जणांची टीम आहे. जून महिन्यापासून हे कार्य सुरू होते. दरवर्षी ३०च्या वर रावणाचे ऑर्डर्स त्यांच्याकडे असतात. मात्र, यंदा अद्याप एकही ऑर्डर आलेली नाही. २५ ऑक्टोबरला विजयादशमी सोहळा आहे. त्यामुळे, बिनवार आणि इतर कारागीर चिंतेत बसले आहेत.मेळाव्यात होणारी खेळभांड्यांची विक्री रखडलीशहरात कस्तुरचंद पार्क, चिटणीस पार्क, रेशीमबाग, हनुमाननगर, श्रीकृष्णनगर आणि इतर प्रमुख मैदानांमध्ये रावणदहनाचे जाहीर कार्यक्रम होत असतात. त्यानिमित्ताने जमणाऱ्या मेळाव्यात छोटे-मोठे खेळभांड्यांची विक्री करणारे आपला व्यवसाय करतात. त्यात लाकडी तलवार, दशानन मुख, धनुष्य, बाण आदींचा समावेश असतो. यंदा हे सगळे होणार नाही.सांस्कृतिक कार्यक्रमांना ब्रेकमेळावा म्हटला की सांस्कृतिक कार्यक्रम आलेच. त्यात रामलीला, लघुनाट्य, नृत्य, युद्ध प्रात्यक्षिके, गायन यांचा समावेश असतो. यंदा मात्र, मेळावाच भरणार नसल्याने या सगळ्या कार्यक्रमांना ब्रेक लागणार आहे. त्याचा परिणाम या कार्यक्रमांकडून अपेक्षित असलेली आर्थिक गरज पूर्ण होणार नाही.छोटेखानीच का असेना परवानगी द्यावी - विक्की वानखेडेकोरोनाची धास्ती प्रचंड आहे. मात्र, पोटाची खळगी भरणेही आहेच. मोठे पुतळे न बनविता पाच ते १५ फुटांचे पुतळेच बनवण्याची परवानगी दिली तर आमची विवंचना संपेल. फिजिकल डिस्टन्सिंगने सोहळे साजरे करता येतील. मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदन पाठविले आहे, अशी माहिती कारागीर विक्की वानखेडे यांनी दिली.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस