शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

इथे रावणच आहे उदरनिर्वाहाचे साधन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 12:44 IST

रावणदहन नाही तर रावणाचे पुतळे नाहीत आणि त्यामुळे, त्यापासून होणारे आर्थिक उत्पन्नही नाही, अशी स्थिती आहे.

ठळक मुद्देपोटाची आग कोण विझविणार?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : असत्यावर सत्याचा विजय म्हणून साजरा होणारा विजयादशमी महोत्सव रावणदहनासाठी ओळखला जातो. कोरोनामुळे यंदा हा महोत्सव रद्द करण्यात आला आहे. त्याचा परिणाम रावणावर निर्भर असलेल्या कारागीर वर्गावर होणार आहे. रावणदहन नाही तर रावणाचे पुतळे नाहीत आणि त्यामुळे, त्यापासून होणारे आर्थिक उत्पन्नही नाही, अशी स्थिती आहे.बहुसांस्कृतिक देशात प्रत्येक सणोत्सव सर्वसामान्यांना रोजगाराचे प्रमुख कारण असतात. मात्र, यंदा हे सर्वच रोजगार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. रामनवमी असो, गणेशोत्सव असो, धम्मचक्र प्रवर्तन दिन असो वा अन्य सर्वच धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे, या उत्सवांवर रोजीरोटी कमावणारे कारागीर रिकाम्या हाताने बसले आहेत. रोज कमवू तर रोज खाऊ, अशा स्थितीत हा वर्ग असतो. त्यातच सणोत्सवाच्या काळात मिळणारा रोजगार पुढच्या काही महिन्यांसाठीच्या उदरनिर्वाहाचे साधन असतात. मात्र, यंदा ते सगळे हिरावले गेले आहेत. महालातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेले खेमकरणसिंग बिनवार हे रावण, कुंभकर्ण, मेघनाद यांचे पारंपरिक पुतळे बनविण्यासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या ५०-६० वर्षापासून अखंडितपणे हे कार्य ते करतात. त्यासाठी त्यांच्याकडे १५ ते २० जणांची टीम आहे. जून महिन्यापासून हे कार्य सुरू होते. दरवर्षी ३०च्या वर रावणाचे ऑर्डर्स त्यांच्याकडे असतात. मात्र, यंदा अद्याप एकही ऑर्डर आलेली नाही. २५ ऑक्टोबरला विजयादशमी सोहळा आहे. त्यामुळे, बिनवार आणि इतर कारागीर चिंतेत बसले आहेत.मेळाव्यात होणारी खेळभांड्यांची विक्री रखडलीशहरात कस्तुरचंद पार्क, चिटणीस पार्क, रेशीमबाग, हनुमाननगर, श्रीकृष्णनगर आणि इतर प्रमुख मैदानांमध्ये रावणदहनाचे जाहीर कार्यक्रम होत असतात. त्यानिमित्ताने जमणाऱ्या मेळाव्यात छोटे-मोठे खेळभांड्यांची विक्री करणारे आपला व्यवसाय करतात. त्यात लाकडी तलवार, दशानन मुख, धनुष्य, बाण आदींचा समावेश असतो. यंदा हे सगळे होणार नाही.सांस्कृतिक कार्यक्रमांना ब्रेकमेळावा म्हटला की सांस्कृतिक कार्यक्रम आलेच. त्यात रामलीला, लघुनाट्य, नृत्य, युद्ध प्रात्यक्षिके, गायन यांचा समावेश असतो. यंदा मात्र, मेळावाच भरणार नसल्याने या सगळ्या कार्यक्रमांना ब्रेक लागणार आहे. त्याचा परिणाम या कार्यक्रमांकडून अपेक्षित असलेली आर्थिक गरज पूर्ण होणार नाही.छोटेखानीच का असेना परवानगी द्यावी - विक्की वानखेडेकोरोनाची धास्ती प्रचंड आहे. मात्र, पोटाची खळगी भरणेही आहेच. मोठे पुतळे न बनविता पाच ते १५ फुटांचे पुतळेच बनवण्याची परवानगी दिली तर आमची विवंचना संपेल. फिजिकल डिस्टन्सिंगने सोहळे साजरे करता येतील. मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदन पाठविले आहे, अशी माहिती कारागीर विक्की वानखेडे यांनी दिली.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस