शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

इथे रावणच आहे उदरनिर्वाहाचे साधन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 12:44 IST

रावणदहन नाही तर रावणाचे पुतळे नाहीत आणि त्यामुळे, त्यापासून होणारे आर्थिक उत्पन्नही नाही, अशी स्थिती आहे.

ठळक मुद्देपोटाची आग कोण विझविणार?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : असत्यावर सत्याचा विजय म्हणून साजरा होणारा विजयादशमी महोत्सव रावणदहनासाठी ओळखला जातो. कोरोनामुळे यंदा हा महोत्सव रद्द करण्यात आला आहे. त्याचा परिणाम रावणावर निर्भर असलेल्या कारागीर वर्गावर होणार आहे. रावणदहन नाही तर रावणाचे पुतळे नाहीत आणि त्यामुळे, त्यापासून होणारे आर्थिक उत्पन्नही नाही, अशी स्थिती आहे.बहुसांस्कृतिक देशात प्रत्येक सणोत्सव सर्वसामान्यांना रोजगाराचे प्रमुख कारण असतात. मात्र, यंदा हे सर्वच रोजगार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. रामनवमी असो, गणेशोत्सव असो, धम्मचक्र प्रवर्तन दिन असो वा अन्य सर्वच धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. त्यामुळे, या उत्सवांवर रोजीरोटी कमावणारे कारागीर रिकाम्या हाताने बसले आहेत. रोज कमवू तर रोज खाऊ, अशा स्थितीत हा वर्ग असतो. त्यातच सणोत्सवाच्या काळात मिळणारा रोजगार पुढच्या काही महिन्यांसाठीच्या उदरनिर्वाहाचे साधन असतात. मात्र, यंदा ते सगळे हिरावले गेले आहेत. महालातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेले खेमकरणसिंग बिनवार हे रावण, कुंभकर्ण, मेघनाद यांचे पारंपरिक पुतळे बनविण्यासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या ५०-६० वर्षापासून अखंडितपणे हे कार्य ते करतात. त्यासाठी त्यांच्याकडे १५ ते २० जणांची टीम आहे. जून महिन्यापासून हे कार्य सुरू होते. दरवर्षी ३०च्या वर रावणाचे ऑर्डर्स त्यांच्याकडे असतात. मात्र, यंदा अद्याप एकही ऑर्डर आलेली नाही. २५ ऑक्टोबरला विजयादशमी सोहळा आहे. त्यामुळे, बिनवार आणि इतर कारागीर चिंतेत बसले आहेत.मेळाव्यात होणारी खेळभांड्यांची विक्री रखडलीशहरात कस्तुरचंद पार्क, चिटणीस पार्क, रेशीमबाग, हनुमाननगर, श्रीकृष्णनगर आणि इतर प्रमुख मैदानांमध्ये रावणदहनाचे जाहीर कार्यक्रम होत असतात. त्यानिमित्ताने जमणाऱ्या मेळाव्यात छोटे-मोठे खेळभांड्यांची विक्री करणारे आपला व्यवसाय करतात. त्यात लाकडी तलवार, दशानन मुख, धनुष्य, बाण आदींचा समावेश असतो. यंदा हे सगळे होणार नाही.सांस्कृतिक कार्यक्रमांना ब्रेकमेळावा म्हटला की सांस्कृतिक कार्यक्रम आलेच. त्यात रामलीला, लघुनाट्य, नृत्य, युद्ध प्रात्यक्षिके, गायन यांचा समावेश असतो. यंदा मात्र, मेळावाच भरणार नसल्याने या सगळ्या कार्यक्रमांना ब्रेक लागणार आहे. त्याचा परिणाम या कार्यक्रमांकडून अपेक्षित असलेली आर्थिक गरज पूर्ण होणार नाही.छोटेखानीच का असेना परवानगी द्यावी - विक्की वानखेडेकोरोनाची धास्ती प्रचंड आहे. मात्र, पोटाची खळगी भरणेही आहेच. मोठे पुतळे न बनविता पाच ते १५ फुटांचे पुतळेच बनवण्याची परवानगी दिली तर आमची विवंचना संपेल. फिजिकल डिस्टन्सिंगने सोहळे साजरे करता येतील. मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदन पाठविले आहे, अशी माहिती कारागीर विक्की वानखेडे यांनी दिली.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस