शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

...येथे मिळतो विकतचा आजार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:18 IST

रेल्वे स्थानकासमोरील हॉटेल्समध्ये जेवण करीत असाल तर सतर्क होण्याची वेळ आली आहे. यात ज्यांचे किचन आत आहे ते अस्वच्छ, मळकट व जाळ्यांनी भरलेली आहेत तर ज्यांची बाहेर आहेत ती रस्त्याला खेटून आहेत. यामुळे पोळ्या लाटण्यापासून भाजीला फोडणी देण्याची कामे उघड्यावर होतात. २४ तास वाहत्या रस्त्यांची धूळ, घाण त्यात पडते. यातच दूषित पाणी, भेसळयुक्त सामग्री आणि सडलेल्या भाज्यांचा उपयोग होत असल्याने हे खाद्यपदार्थ आरोग्याला धोकादायक ठरणारी आहेत.

ठळक मुद्देलोकमत स्टिंग आॅपरेशनरस्त्यावर शिजते अन्नदूषित व उघड्यावरील खाद्यपदार्थांमुळे आरोग्य धोक्यातरेल्वे स्थानकासमोरील हॉटेल्सचे धक्कादायक चित्र

लोकमत न्यूज नेटवर्कसुमेध वाघमारे/दयानंद पाईकरावनागपूर : रेल्वे स्थानकासमोरील हॉटेल्समध्ये जेवण करीत असाल तर सतर्क होण्याची वेळ आली आहे. यात ज्यांचे किचन आत आहे ते अस्वच्छ, मळकट व जाळ्यांनी भरलेली आहेत तर ज्यांची बाहेर आहेत ती रस्त्याला खेटून आहेत. यामुळे पोळ्या लाटण्यापासून भाजीला फोडणी देण्याची कामे उघड्यावर होतात. २४ तास वाहत्या रस्त्यांची धूळ, घाण त्यात पडते. यातच दूषित पाणी, भेसळयुक्त सामग्री आणि सडलेल्या भाज्यांचा उपयोग होत असल्याने हे खाद्यपदार्थ आरोग्याला धोकादायक ठरणारी आहेत. आजार देणारे हे हॉटेल्स सर्वांदेखत सुरू असतानाही प्रशासन मात्र मूकदर्शक बनले आहे.सोमवारी ‘लोकमत’ चमूने या गंभीर प्रकाराचे ‘स्टिंग आॅपरेशन’ करून हा धक्कादायक प्रकार उजेडात आणला. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या गंभीर प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासन विभाग दुर्लक्ष करीत असल्यामुळे या हॉटेल्सचालकांचे चांगलेच फावत असल्याचे वास्तव समोर आले.एकाच ठिकाणी ४० वर हॉटेल्समध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या समोरील पुलाखालील साधारण ४० वर छोटी-मोठी हॉटेल्स आहेत. नागपुरात एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येत हॉटेल्स असणारे हे एकमेव ठिकाण आहे. परंतु यातील दोन-चार हॉटेल्स सोडल्यास इतर सर्व हॉटेल्समध्ये अस्वच्छता, घाण, उघड्यावर खाद्यपदार्थ, उघडे किचन असेच दृश्य ‘लोकमत’चमूला दिसून आले. जिथे उभे राहणेही किळसवाणे आहे, तिथे लोक पैसे देऊन जेवत होती.बहुसंख्य हॉटेल्सचे किचन रस्त्यावरचरेल्वे स्थानकासमोरील बहुसंख्य हॉटेल्स चालकांनी खाद्यपदार्थ शिजविण्यासाठी रस्त्यावरच भट्टी लावलेली आहे. त्यामुळे फोडणी देताना सगळे पदार्थ रस्त्याच्या शेजारीच ठेवून सगळी प्रक्रिया पार पाडते. वाहनांमुळे रस्त्यावरील धूळ उडून अन्नात मिसळते. हेच धुळीत शिजविलेले अन्न हॉटेल्समध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या थाळीत येते.भाज्यापासून अन्नही उघड्यावरचरेल्वे स्थानकासमोरील हॉटेल्समध्ये काऊंटरवर दर्शनी भागात फुलकोबी, पत्ताकोबी, वांगे, टमाटर या भाज्यांचे उघड्यावरच प्रदर्शन लावले जाते. दिवसभर रस्त्यावरील धूळ उडून या भाज्यांवर साचते. मग एखादा ग्राहक आला की लगेच त्याच्यासमोर ताजी चिरलेली भाजी करण्याचा आव आणून न धुताच या भाज्या कापून त्यांना फोडणी दिली जाते. शिजलेला भात फूटपाथवरएका हॉटेलमध्ये तर कमालीचा बेजबाबदारपणा पाहावयास मिळाला. या हॉटेलमधील कर्मचारी शिजण्यासाठी टाकलेल्या भातातील पाणी काढून टाकण्यासाठी एका गाळणीत शिजलेला भात टाकला. ही गाळणी तशीच फूटपाथवर ठेवली. पाणी निघून जाईपर्यंत हा भात तसाच फूटपाथवर होता. त्याच्या शेजारून लोकांची ये-जा सुरू होती.मद्यपींसाठी विशेष सोयरेल्वे स्थानकासमोरील काही हॉटेल्समध्ये मद्यपींसाठी विशेष सोय केली आहे. ही माहिती देण्यासाठी हॉटेलसमोरच काही माणसांना उभे केले आहे. यामुळे ही हॉटेल्स मिनी बीअर बार झाली आहेत. काहीमध्ये लपूनछपून तर काहींमधून सर्रास दारू पिणारे दिसून आले.हॉटेलचा आत आणि बाहेरचा परिसरही अस्वच्छहॉटेलमध्ये स्वयंपाक करणारी मंडळी नीटनेटकी तथा स्वच्छतेला प्राधान्य देणारी असावीत. हॉटेल, रेस्टॉरंटमधील स्वयंपाकगृह नियमित चकचकीत असायला हवे. ज्या ताट-वाट्यांमध्ये ग्राहकांना जेवण दिले जाते, त्या स्वच्छ पाण्याने धुतलेली असावीत. पाण्याचे ग्लासही आतून-बाहेरून स्वच्छ असायला हवे. परंतु रेल्वे स्थानकासमोरील हॉटेल्सला पाहून ‘स्वच्छ’ कशाला म्हणतात, हा प्रश्न पडतो. येथे हॉटेलच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणचा परिसर अस्वच्छ आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरfoodअन्न