शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात तीन ठिकाणी हिमॅटोलॉजी सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 01:37 IST

रक्ताच्या विकारावरील उपचारासाठी राज्यात नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह (मेडिकल), पुणे येथील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात हिमॅटोलॉजी सेंटर सुरू होणार आहे. या संदर्भातील सामंजस्य करार (एमओयू) नुकताच झाल्याची घोषणा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सचिव संजय देशमुख यांनी शुक्रवारी नागपुरात केली.

ठळक मुद्देरक्ताच्या विकारावर उपचार व संशोधन : नागपुरात मेडिकलमध्ये होणार सेंटर

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रक्ताच्या विकारावरील उपचारासाठी राज्यात नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह (मेडिकल), पुणे येथील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय व मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात हिमॅटोलॉजी सेंटर सुरू होणार आहे. या संदर्भातील सामंजस्य करार (एमओयू) नुकताच झाल्याची घोषणा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सचिव संजय देशमुख यांनी शुक्रवारी नागपुरात केली.संजय देशमुख यांनी सांगितले, या सेंटरला घेऊन हिमॅटोलॉजिस्ट डॉ. सविता रंगराजन नागपुरात आल्या आहेत. डॉ. रंगराजन या तीनही मेडिकलमध्ये सेंटरसाठी लागणाऱ्या पायाभूत सोयी व मनुष्यबळ उपलब्ध करून देणार आहे. या सेंटरविषयी अधिक माहिती देताना डॉ. रंगराजन म्हणाल्या, या सेंटरला घेऊन वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाशी सामंजस्य करार झालेला आहे. या सेंटरमध्ये हिमोफेलिया, थॅलेसेमिया, सिकलसेलसाठी डे-केअर सेंटरची सोय असणार आहे. शिक्षण, संशोधन, माहिती संकलन व ‘क्लिनिकल ट्रायल’ हे या सेंटरचे मुख्य उद्देश असेल. या सेंटरसाठी लागणारा निधी हा राज्य सरकारसोबतच ‘कॉर्पाेरेट सोशल रिस्पॉन्सीब्लिटी’ (सीएसआर) फंडामधून गोळा केला जाईल. नागपूरमध्ये हे सेंटर सुरू झाल्यास याचा फायदा मध्यभारतातील रुग्णांना होईल. विशेषत: विदर्भातील सिकलसेलबाधित रुग्णांना या सेंटरमधून मोठी मदत मिळेल, असेही त्या म्हणाल्या.शासकीय रुग्णालयांमध्ये अनेक आजारांवर अद्यावत उपचार होत असताना रक्ताच्या विकारावर उपचार होत नसल्याचे वास्तव आहे. रुग्णांना पुणे, मुंबई किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये जावे लागायचे. परंतु आता ‘हिमॅटोलॉजी’ सेंटर सुरू होणार असल्याने याचा सर्वाधिक फायदा गरीब रुग्णांना होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञाच्या मते, हे सेंटर हिमोफिलियाच्या रुग्णांसाठी आशेचे किरण ठरेल. या आजाराच्या रुग्णांच्या शरीरात रक्ताची गुठळी (क्लॉटिंग) तयार होत नाही. यामुळे जखम झाल्यानंतर तेथून सातत्याने रक्तस्राव होत राहतो. उपचार करूनही हा रक्तस्राव थांबत नाही. अखेर शरीरातील रक्ताचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटल्याने त्या रुग्णाचा मृत्यू ओढावतो. जगभरात आज जे काही मोजके आजार आहेत ज्यावर उपचार सापडलेला नाही त्यात हिमोफिलियाचा समावेश होतो. या आजारावर या सेंटरमध्ये संशोधन होऊन औषधोपचार होणार असल्याने रुग्णांना अमरावती किंवा इतर ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही.

टॅग्स :Medicalवैद्यकीयnagpurनागपूर