शहरं
Join us  
Trending Stories
1
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
“या अधिवेशनात...”; विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी
3
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
4
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
5
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
6
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बंगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
7
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
8
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
9
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
10
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
11
John Cena Last Match: अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
12
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
13
T20 Cricket: टी-२० क्रिकेटमध्ये भारताने कोणत्या संघाविरुद्ध गमावले सर्वाधिक सामने? वाचा
14
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
15
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
16
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
17
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
18
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
19
व्हिडीओ कॉल केला आणि तिने कपडे काढून फेकले, मुंबईतील ५० वर्षाचा उद्योजक अडकला 
20
तंबाखू आणि सिगारेट महागणार! केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात ५ पट वाढ; नवीन किंमत काय असेल?
Daily Top 2Weekly Top 5

केरळ पीडितांना विद्यापीठाची मदत पोहोचलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 13:12 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे केरळ येथील पूरपीडितांसाठी पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षक-कर्मचाऱ्यांकडून मदतनिधी गोळा करण्यात आला होता. मात्र हा निधी अद्यापही विद्यापीठाच्याच खात्यात पडून आहे.

ठळक मुद्देशिक्षक, कर्मचाऱ्यांकडून गोळा करण्यात आला मदतनिधीअद्यापही विद्यापीठाच्या खात्यातच पैसे

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे केरळ येथील पूरपीडितांसाठी पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षक-कर्मचाऱ्यांकडून मदतनिधी गोळा करण्यात आला होता. मात्र हा निधी अद्यापही विद्यापीठाच्याच खात्यात पडून आहे. पूरपीडितांपर्यंत हे पैसे पोहोचलेच नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.नागपूर विद्यापीठाने केरळ येथील नैसर्गिक संकटाच्या स्थितीत मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेतला होता. इतर सरकारी विभागांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापलेली एका दिवसाच्या वेतनाची रक्कम मुख्यमंत्री मदत निधीत जमादेखील केली. मात्र नागपूर विद्यापीठाने अद्याप यासाठी पाऊलच उचललेले नाही. राज्य शासनाचे निर्देश आल्यानंतर विद्यापीठाचे विभाग व संलग्नित महाविद्यालयांना पत्र लिहून एका दिवसाचे वेतन कापण्यात आले होते. यादरम्यान विद्यापीठाने महाविद्यालयांना पत्र लिहून रक्कम थेट मुख्यमंत्री मदत निधीत न पाठविण्याचे निर्देश दिले होते. कापण्यात आलेल्या वेतनाचा धनादेश बनवून विद्यापीठाच्या वित्त व लेखा अधिकारी कार्यालयात जमा करण्यास सांगण्यात आले होते. याआधारावर विद्यापीठाशी संलग्नित ५८९ महाविद्यालयांनी वित्त व लेखा अधिकाºयांच्या नावे धनादेश बनवून विद्यापीठात जमा केला. मात्र विद्यापीठाने यामागील कारण अद्यापही स्पष्ट केलेले नाही.असे करणे विद्यापीठाला महागात पडू शकते. अशी प्रक्रिया राबविल्यास गरजूंपर्यंत मदत पोहोचण्यास उशीर होईल, याचा विचारच करण्यात आला नाही.महाविद्यालयांकडून मिळणाऱ्या धनादेशांसाठी वेगळे बँक खाते उघडावे लागेल, सर्व महाविद्यालयांनी रक्कम पाठविली आहे की नाही याची चाचपणी करण्यासाठी वेगळी यंत्रणा बनवावी लागेल, शिवाय यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी द्यावी लागेल, याचा विचारदेखील प्रशासनाने केला नाही. कर्मचाऱ्यांची प्रचंड कमतरता असताना धनादेश प्राप्त झाल्यानंतर या बाबी प्रशासनाच्या लक्षात आल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली. याबाबत प्रतिक्रियेसाठी प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

आता निर्णय बदलणार ?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २७ आॅगस्ट रोजी घेण्यात आलेला विद्यापीठाचा हा निर्णय प्रशासनाच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता मूळ निर्णयात बदल करण्याचे प्रयत्न होत आहेत. महाविद्यालयांचा निधी थेट मुख्यमंत्री मदत निधीत जमा करण्याच्या सूचना देण्यात येऊ शकतात.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठKerala Floodsकेरळ पूर