शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

तंत्रज्ञानाच्या सहाय्यानेच पर्यावरण संवर्धन शक्य : प्रा. स्वपनकुमार दत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 22:42 IST

तंत्रज्ञान व विज्ञान यांचा प्रभावी उपयोग करूनच पर्यावरणाचे संवर्धन होऊ शकते, असे मत कोलकाता विद्यापीठाचे प्रा. स्वपनकुमार दत्ता यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देराष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तंत्रज्ञानविज्ञान यांचा प्रभावी उपयोग करूनच पर्यावरणाचे संवर्धन होऊ शकते, असे मत कोलकाता विद्यापीठाचे प्रा. स्वपनकुमार दत्ता यांनी व्यक्त केले.सीएसआयआर-नीरी येथे सोमवारी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. त्यांनी ‘शाश्वत पर्यावरण व अन्न सुरक्षेवर विज्ञान व तंत्रज्ञानाचा परिणाम’ या विषयावर मार्गदर्शन केले. आज पारंपरिक शेती मागे पडली आहे. सध्या जास्तीतजास्त अन्न उत्पादित करण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. भविष्यात शहरांतर्गतच अन्न उत्पादित केले जाईल. परंतु, आधुनिक शेती ही पर्यावरण प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत आहे. शेतपिकांवरील कीड ही मोठी समस्या आहे. दरवर्षी जगातील एक तृतीयांश पीक किडीमुळे नष्ट होते. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी देशांमध्ये समन्वय स्थापन होणे गरजेचे आहे. तसेच, वाढते तापमान, जमिनीचा अति वापर, रासायनिक खतांचा वापर इत्यादीमुळे मातीमधील ऑर्गनिक कार्बन दिवसेंदिवस कमी होत आहे. हा देखील चिंतेचा विषय आहे. जमिनीतील हा घटक वाढायला हवा, असे दत्ता यांनी पुढे बोलताना सांगितले. वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. हेमंत पुरोहित यांनी प्रास्ताविक केले. मुख्य वैज्ञानिक डॉ. जे. एस. पांडे यांनी दत्ता यांचा परिचय करून दिला तर, वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक प्रकाश कुंभारे यांनी आभार मानले.

 

टॅग्स :environmentवातावरणscienceविज्ञानtechnologyतंत्रज्ञान