शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

संमेलनातील उधळण टाळून गरजू साहित्यिकांना मदत करावी : महेश एलकुंचवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:58 IST

साहित्य संमेलनात कोट्यवधींची उधळण करणे चुकीची बाब आहे. त्याऐवजी गरजू लेखकांना मदत करण्याची जबाबदारी साहित्यिकांनी उचलावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देआधारतर्फे ९२ व्या अ. भा. साहित्य संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरेंचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साहित्य संमेलनात कोट्यवधींची उधळण करणे चुकीची बाब आहे. त्याऐवजी गरजू लेखकांना मदत करण्याची जबाबदारी साहित्यिकांनी उचलावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी आज येथे केले.आधारतर्फे ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळच्या संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे यांचा सायंटिफिक सभागृहात सत्कार करण्यात आला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. गिरीश गांधी होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कादंबरीकार आशा बगे, पोलीस आयुक्त डॉ. भुषणकुमार उपाध्याय, आधारचे डॉ. अविनाश रोडे, हेमंत काळीकर उपस्थित होते. एलकुंचवार म्हणाले, साहित्य संमेलनातील कोट्यवधींची उधळण टाळून आजारी असलेले, गरीब साहित्यिकांना मदत करण्याची गरज आहे. त्यासाठी साहित्यिकांनी काही निधी जमवून शासनाकडून मदत मिळवून निधी उभारण्याचीगरज आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला काही अधिकार देण्याची गरज आहे. अरुणा ढेरेंच्या साहित्यावर बोलताना ते म्हणाले, अण्णांकडून अरुणाला वारसा मिळाला. अरुणा ढेरेंच्या कवितेतील स्त्री जवळ पाच हजार वर्षांच्या संस्काराचे संचित आहे. ती भावना व्यक्त न करणारी स्त्री आहे. अरुणा पुढे काय लिहिणार याचे कुतूहल असल्याचे ते म्हणाले. आशा बगे म्हणाल्या, संमेलनाच्या अध्यक्षाची निवड करण्याचा पायंडा पाडणाऱ्या सर्वांचा निर्णय अभिनंदनीय आहे. मोती सापडणाऱ्या वाटेने अरुणा ढेरेंची वाटचाल सुरु असल्याचा उल्लेख त्यांनी केला. गिरीश गांधी म्हणाले, स्त्रीची भूमिका घेऊन लेखन करणाऱ्यांचा वारसा अरुणा ढेरे यांनी घेतला आहे. स्त्री वर लिखाण केले तरी त्यांनी कधीही स्त्रीवादी हट्टी भूमिका घेतली नाही. सत्काराला उत्तर देताना अरुणा ढेरे म्हणाल्या, मुलीला माहेरी मिळते ते प्रेम, कौतुक येथे मिळाले आहे. अनपेक्षितपणे अध्यक्षपद माझ्यापर्यंत आले. त्याकडे मी जबाबदारी म्हणून पाहत आहे. गरजू लेखकांसाठी काही करता आले तर बरे वाटेल. आपण जे लिहितो त्या मागे आपला स्पष्ट विचार असायला हवा अशी दृष्टी अण्णांकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी साहित्यात मोठी ताकद असल्याचे सांगितले. कार्यक्रमात संघमित्रा खंदारे, शुभदा फडणवीस,, मोहिनी मोडक, मनिषा अतुल, माधवी भट, पवन नालट, पराग घोंगे यांनी अरुणा ढेरे यांच्या कविता सादर केल्या. प्रास्ताविक डॉ. अविनाश रोडे यांनी केले.संचालन आणि आभार प्रदर्शन शुभदा फडणवीस यांनी केले.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनAruna Dhereअरुणा ढेरे