शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनातील उधळण टाळून गरजू साहित्यिकांना मदत करावी : महेश एलकुंचवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:58 IST

साहित्य संमेलनात कोट्यवधींची उधळण करणे चुकीची बाब आहे. त्याऐवजी गरजू लेखकांना मदत करण्याची जबाबदारी साहित्यिकांनी उचलावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देआधारतर्फे ९२ व्या अ. भा. साहित्य संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरेंचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साहित्य संमेलनात कोट्यवधींची उधळण करणे चुकीची बाब आहे. त्याऐवजी गरजू लेखकांना मदत करण्याची जबाबदारी साहित्यिकांनी उचलावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी आज येथे केले.आधारतर्फे ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळच्या संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे यांचा सायंटिफिक सभागृहात सत्कार करण्यात आला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. गिरीश गांधी होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कादंबरीकार आशा बगे, पोलीस आयुक्त डॉ. भुषणकुमार उपाध्याय, आधारचे डॉ. अविनाश रोडे, हेमंत काळीकर उपस्थित होते. एलकुंचवार म्हणाले, साहित्य संमेलनातील कोट्यवधींची उधळण टाळून आजारी असलेले, गरीब साहित्यिकांना मदत करण्याची गरज आहे. त्यासाठी साहित्यिकांनी काही निधी जमवून शासनाकडून मदत मिळवून निधी उभारण्याचीगरज आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला काही अधिकार देण्याची गरज आहे. अरुणा ढेरेंच्या साहित्यावर बोलताना ते म्हणाले, अण्णांकडून अरुणाला वारसा मिळाला. अरुणा ढेरेंच्या कवितेतील स्त्री जवळ पाच हजार वर्षांच्या संस्काराचे संचित आहे. ती भावना व्यक्त न करणारी स्त्री आहे. अरुणा पुढे काय लिहिणार याचे कुतूहल असल्याचे ते म्हणाले. आशा बगे म्हणाल्या, संमेलनाच्या अध्यक्षाची निवड करण्याचा पायंडा पाडणाऱ्या सर्वांचा निर्णय अभिनंदनीय आहे. मोती सापडणाऱ्या वाटेने अरुणा ढेरेंची वाटचाल सुरु असल्याचा उल्लेख त्यांनी केला. गिरीश गांधी म्हणाले, स्त्रीची भूमिका घेऊन लेखन करणाऱ्यांचा वारसा अरुणा ढेरे यांनी घेतला आहे. स्त्री वर लिखाण केले तरी त्यांनी कधीही स्त्रीवादी हट्टी भूमिका घेतली नाही. सत्काराला उत्तर देताना अरुणा ढेरे म्हणाल्या, मुलीला माहेरी मिळते ते प्रेम, कौतुक येथे मिळाले आहे. अनपेक्षितपणे अध्यक्षपद माझ्यापर्यंत आले. त्याकडे मी जबाबदारी म्हणून पाहत आहे. गरजू लेखकांसाठी काही करता आले तर बरे वाटेल. आपण जे लिहितो त्या मागे आपला स्पष्ट विचार असायला हवा अशी दृष्टी अण्णांकडून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी साहित्यात मोठी ताकद असल्याचे सांगितले. कार्यक्रमात संघमित्रा खंदारे, शुभदा फडणवीस,, मोहिनी मोडक, मनिषा अतुल, माधवी भट, पवन नालट, पराग घोंगे यांनी अरुणा ढेरे यांच्या कविता सादर केल्या. प्रास्ताविक डॉ. अविनाश रोडे यांनी केले.संचालन आणि आभार प्रदर्शन शुभदा फडणवीस यांनी केले.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनAruna Dhereअरुणा ढेरे