शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

नागपूर जिल्ह्यात यंदा भरपूर पाऊस; कोरोनानंतर आता पुराची धास्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 10:19 IST

Nagpur News यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य अतिवृष्टी गृहित धरून प्रशासनाने उपाययोजना आखल्या आहेत. पथकांची निश्चिती केली असून, मान्सूनपूर्व आढावा बैठकीतून सर्व यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देबचावकार्यासाठी चार पथके नदीकाठावरील गावांमध्ये आपत्कालीन निवाऱ्याची निश्चिती

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य अतिवृष्टी गृहित धरून प्रशासनाने उपाययोजना आखल्या आहेत. पथकांची निश्चिती केली असून, मान्सूनपूर्व आढावा बैठकीतून सर्व यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत.

संभाव्य पूरग्रस्त गावांची यादी तयार केली असून मार्ग, निवाऱ्यासाठी शाळांच्या इमारती निश्चित केल्या आहेत. नाल्यावरील पाण्याखाली जाणाऱ्या पुलांवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बोर्ड लावण्यात आले आहेत. सिंचन विभागाकडून सर्व प्रकल्पांचे ऑडिट केले आहे. पूर परिस्थितीच्या काळात मदतीसाठी साहित्याची जुळवाजुळव झाली आहे. एनडीआरएन, आर्मी टीम, मनपाचे बचाव पथक या सर्वांचा समन्वय राखण्यात आला आहे.

कंट्रोल रूम स्थापन करण्यात आला आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची यासाठी संपूर्ण मदत घेतली जाणार आहे.

प्रशासनाची काय तयारी?

फायर फायटर - नाही (मनपाकडे आहे)

रेस्क्यू व्हॅन - नाही (मनपाकडे आहे)

फायबर बोटी - २२

लाईफ जॅकेट - २००

कटर - १५

जिल्ह्यातील नद्या : ८

नद्याशेजारील गावे : ३४०

पूरबाधित होणारे तालुके : ६

...

जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान : १,००७ मिमी

अग्निशमन दल सज्ज

महानगरपालिकेचे अग्निशमन दल सज्ज आहे. वाहन, फायर फायटर, रेस्क्यू व्हॅन तसेच उंच उमारतीमध्ये अडकून पडलेल्यांना सुखरूप वाचविण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणाही महानगरपालिकेकडे उपलब्ध आहे. वर्षभरापूर्वीच ती मनपाच्या सेवेत दाखल झाली असून, तिचे प्रात्यक्षिकही यशस्वी झाले आहे.

पूरबाधित क्षेत्र

जिल्ह्यातील तीन तालुके पुराच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आहेत. तसेच मौदा, पारशिवनी, कामठी, कुही, भिवापूर या तालुक्यांसोबत सावनेर तालुक्यातील काही गावांचीही यादृष्टीने संवेदनशील यादीत नोंद आहे. जिल्ह्यातील ३४० गावे नदीच्या काठावर आहेत. त्यातील १२० गावे शहरी वस्तीचा भाग आहेत. या ठिकाणी पुराची परिस्थिती उद्भवल्यास निवारा म्हणून शाळांच्या इमारती निश्चित केल्या आहेत. पूर परिस्थितीच्या काळात जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शहरात १४० धोकादायक इमारती

नागपूर शहरात अलीकडेच करण्यात आलेल्या पाहणीमध्ये १४० इमारती धोकादायक असल्याचे आढळून आल्या. त्या निर्लेखित करण्यासाठी संबंधित मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. काही इमारतींसंदर्भात मनपा स्वत: पुढाकार घेऊन पाडण्याची कारवाई करीत आहे. शहरात धोकादायक झाडे कमी असली तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला याचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे.

संभाव्य पूरग्रस्त गावांची निश्चिती केली असून, आपत्कालीन परिस्थितीसाठी नियोजन केले आहे. तालुकास्तरावर मॉक ड्रील घेऊन धडे दिले जात आहेत. बचावकार्याच्या दृष्टीने चार चमू सज्ज आहेत. संपर्कासाठी एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आहे.

- अंकुश गावंडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, नागपूर

...

टॅग्स :floodपूर